Nilesh Rane : ...तर उद्या कुणाला तरी कायदा हातात घ्यावा लागेल

गोहत्येवरून आमदार निलेश राणे आक्रमक


नागपूर : महाराष्ट्रात गोहत्या थांबली पाहिजे. गोहत्येचा व्यापार थांबवला जात नाही आणि या लोकांवर कारवाई केली नाही तर उद्या कुणाला तरी कायदा हातात घ्यावा लागेल अशी परिस्थिती आहे, असे सांगत आमदार निलेश राणे यांनी महाराष्ट्रात गोहत्या बंदी आणावी अशी मागणी विधानसभेत केली आहे.


राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत आमदार निलेश राणेंनी हा मुद्दा मांडला. ते म्हणाले की, महाराष्ट्रात गोहत्या थांबली पाहिजे. राज्यपालांच्या अभिभाषणात जरी याचा उल्लेख नसला तरी माझ्या मतदारसंघात, रत्नागिरी आणि बाजूच्या जिल्ह्यात हे उघड चालले आहे. ज्यांचे रॅकेट आहे ते उघड धंदे करतात. आंदोलने्य्य्य्य केली तरी हे थांबत नाही. अनेक आंदोलने झाली. आंदोलनात गुन्हे झाले; परंतु गोहत्या थांबत नाही. गोहत्येचा व्यापार थांबवला जात नाही. या लोकांवर कारवाई केली नाही तर उद्या कुणाला तरी कायदा हातात घ्यावा लागेल अशी परिस्थिती आहे. आपले सरकार बहुमतात आहे. आज हिंदुत्वाचे सरकार आहे. त्यामुळे आज आपण आपल्या गोमातेचे संरक्षण करू शकलो नाही, तर आपण कुठल्या सरकारकडे ही मागणी करणार आहोत? त्यामुळे गोहत्या थांबली पाहिजे. ही तस्करी थांबली पाहिजे व जे याला जबाबदार आहेत त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.



दरम्यान, राजकोट किल्ल्यावर जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, त्याचा उल्लेख या सभागृहात केला. जेव्हा पुतळा कोसळला, त्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी आमची तेव्हाही होती आणि आजही आहे. माझ्या अगोदर याच मतदारसंघातील प्रतिनिधी होते ते १५ मिनिटांत तिथे पोहोचले, हा पुतळा पडला की पाडला याची चौकशी व्हावी. त्यांच्या सहकाऱ्यांचे सीडीआर चेक करावेत. छत्रपती शिवाजी महाराज हा आमच्या आस्थेचा विषय आहे. त्यात कुठेही तडजोड करणार नाही. हे जाणूनबुजून केले असेल तर त्यांना सोडू नका असे सांगत आमदार निलेश राणेंनी अप्रत्यक्षपणे माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर निशाणा साधला.

Comments
Add Comment

लातूर जिल्ह्यात भीषण अपघातात वाघोली येथील बहिण-भावाचा जागीच मृत्यू

लातूर : लातूर जिल्ह्यातील राष्ट्रिय महामार्गावर भीषण अपघातात बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला आहे.औसा–निलंगा

पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत विमानतळाचे होणार उद्घाटन; नवी मुंबईत वाहतुकीत बदल

रायगड : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नवी मुंबई

शेतकऱ्यांसाठी मंत्री महाजनांचा मोठा निर्णय, सुपूर्द केला वर्षभराचा ‘पगार’

जळगाव : मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठी मंत्री गिरीश महाजन यांनी

अमरावती महानगरपालिकेला ई-बस डेपो-व चार्जींग सुविधेसाठी बडनेरा येथील जमीन

अमरावती : अमरावती महापालिकेला केंद्र शासन पुरस्कृत पी.एम.ई बस योजनेतून मिळालेल्या ई-बस डेपो व चार्जींग

दिवाळीच्या सुट्टीत फिरण्याचे नियोजन करताय ? 'या' चार जागांना नक्की भेट द्या

मुंबई : पावसाळ्यातली हिरवळ अनुभवल्यानंतर आता गुलाबी थंडीची चाहुल सर्वांना लागली आहे. त्यामुळे छान थंड हवेच्या

अतिवृष्टीग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्यांकडून तब्बल ३१,६२८ कोटींची मदत; २५३ तालुक्यांना सरसकट मदत देणार

'खरडून गेलेल्या जमिनीला' मिळणार हेक्टरी ३.४७ लाखांची मदत; शेतकरी, घरे आणि जनावरांसाठी भरीव निधी मुंबई: