CM Devendra Fadanvis : वृक्षतोड कायद्याविषयी सुधारणा विधेयकाला मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती !

नागपूर : ‘महाराष्ट्र झाडे तोडण्याविषयी (नियमन) अधिनियम १९६४’ सुधारणा विधेयकाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली आहे. शासनाच्या वतीने मंत्री उदय सामंत यांनी हे सुधारणा विधेयक विधानसभेत मांडले होते. या विधेयकामध्ये झाड तोडल्यास यापूर्वी १ सहस्र रुपये असलेली दंडाची रक्कम थेट ५० पट वाढवून ५० सहस्र रुपये इतकी करण्यात आल्यामुळे कोकणातील आमदार भास्कर जाधव आणि शेखर निकम यांनी आक्षेप नोंदवून विधेयकाविषयी पुनर्विचार करण्याची मागणी केली. ही मागणी मान्य करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विधेयकाला स्थगिती दिली.


वर्ष १९६४ च्या कायद्याप्रमाणे एखादे झाड अनधिकृतपणे तोडल्यास १ सहस्र रुपये दंड होता. सुधारणा विधेयकाद्वारे करण्यात येणारा ५० सहस्र रुपये दंड शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांमध्ये असणार का ? हे विधेयकात स्पष्ट नाही. कोकणामध्ये वनविभागाची भूमी अल्प आहे. बहुतांश भूमी खासगी मालकीची आहे. इथली बहुतांश झाडे निसर्गनिर्मित आहेत. स्थानिक लोकांच्या उपजीविकेचे साधन म्हणून लोक लाकूड तोडून पैसे मिळवतात.



कोकणातील लोक कायदेशीरपणे शासनाला नेहमी सहकार्य करतात. त्यामुळे ग्रामीण भागातही दंडाची रक्कम ५० सहस्र रुपये झाल्यास त्याचा कोकणातील नागरिकांना मोठा फटका बसले, असे या विधेयकाविषयी भास्कर जाधव म्हणाले. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विधेयकाला तुर्तास स्थगित देऊन सभागृहातील सर्वांची चर्चा करून याविषयी निर्णय घेऊ, असे म्हटले.

Comments
Add Comment

मुंबई-विजयदुर्ग 'रोरो' सेवेचा आजपासून श्रीगणेशा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई: कोकणची लाल माती आणि अथांग अरबी समुद्र यांचे नाते आता अधिक घट्ट होणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून ज्या

Narayan Rane : "आमच्यात कटुता असली तरी जिव्हाळा कायम!" भास्कर जाधवांनी व्यक्त केली राणे साहेबांबद्दलची कृतज्ञता;

'त्या' घटनेनंतर जुन्या आठवणींना उजाळा चिपळूण : राजकारणात एकमेकांवर तुटून पडणारे नेते, वैयक्तिक आयुष्यात

फोंडाघाटचा ‘किऱ्याचा आंबा’ होणार जमीनदोस्त

कणकवली : फोंडाघाट, हवेलीनगर येथील शेकडो वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक अधिष्ठान आणि मार्गदर्शक आख्यायिका, तसेच

कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

उद्यापर्यंत ब्लॉक रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले असून पुढील

‘वलसाड हापूस’ या नावाने स्वतंत्र मानांकनांसाठी गुजरात प्रयत्नशील

मुंबई : हापूस आंबा म्हटले की, कोकण किनारपट्टीवर उत्पादित होणारा गोड, चविष्ट आणि सुवासिक आंबा सर्वांच्या

Anganewadi Jatra 2026 : भराडी देवीचा 'कौल' मिळाला! लाखो भाविकांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; आंगणेवाडी जत्रेची तारीख अखेर ठरली!

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि कोकणातील सर्वात महत्त्वाची यात्रा समजल्या जाणाऱ्या मालवण