Jindal Company : जिंदाल कंपनीतील वायुगळतीमुळे बाधित १९ विद्यार्थ्यांना पुन्हा रुग्णालयात हलविले

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड येथील जिंदाल पोर्ट कंपनीत झालेल्या वायुगळतीमुळे बाधित झालेल्या विद्यार्थ्यांना जिल्हा रूग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले होते. त्यापैकी १९ विद्यार्थ्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. विद्यार्थ्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोमवारी दुपारनंतर दोन प्रोढांनाही त्रास होऊ लागला, त्यांनाही खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. दुर्घटना घडल्यानंतर ७२ तासांनी त्याचे विपरीत परिणाम दिसू लागले आहेत.




जिंदाल कंपनीत १२ डिसेंबर रोजी एलपीजी वायुगळती झाली. कंपनीच्या शेजारीच असलेल्या नांदिवडे माध्यमिक विद्यामंदिर जयगड शाळेतील ६५ विद्यार्थ्यांना याचा त्रास झाला. विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांनी या विद्यार्थ्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. उपचार घेऊन विद्यार्थी घरी परतल्यानंतर त्यांना पुन्हा त्रास होऊ लागला. काही विद्यार्थ्यांच्या छातीत दुखू लागले तर काहींच्या पोटात दुखण्यास सुरुवात झाली.अशा १९ विद्यार्थ्यांना पुन्हा खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.७२ तासानंतर प्रोढांनाही त्रास होऊ लागला त्यांनाही रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

यावेळी खासगी रुग्णालयाच्या आवारात पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालक महिला चांगल्याच संतप्त झाल्या होत्या. त्यांनी जिल्हा रूग्णालयात आमच्या मुलांवर उपचारच झाले नाहीत फक्त सलाईन लावली त्यामुळे मुलांना होणारा त्रास वाढला असल्याचं सांगितलं. या कंपनीमुळे अशा घटना वारंवार घडणार असतील तर ही कंपनीचं बंद करावी, अशी मागणी संतप्त महिलांनी केली आहे.या जिंदाल कंपनीत दुर्घटना घडल्यानंतर ७२ तासांनी या वायू गळतीचे वाईट परिणाम दिसू लागल्याने आता या भागातील नागरिकांमध्ये भितिचं वातावरण पसरलं आहे.

Comments
Add Comment

Anganewadi Jatra 2026 : भराडी देवीचा 'कौल' मिळाला! लाखो भाविकांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; आंगणेवाडी जत्रेची तारीख अखेर ठरली!

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि कोकणातील सर्वात महत्त्वाची यात्रा समजल्या जाणाऱ्या मालवण

Eknath Shinde : शिंदेंकडून निलेश राणेंचं तोंडभरून कौतुक! "इलाका किसी का भी हो, धमाका निलेश राणेच करणार"; मालवण हा सेनेचाच बालेकिल्ला

मालवणमध्ये झालेल्या एका जाहीर सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदार निलेश राणे यांचे

मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव येथे धुक्यामुळे भीषण अपघात

शिवशाही बस, ट्रकमध्ये धडक; १ ठार, ११ जखमी प्रमोद जाधव माणगाव : मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे.

संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार; पहिल्या टप्प्यातील संकल्पचित्राचे सादरीकरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक

जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठी आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून मोठ्या प्रमाणात काजू निर्यात व्हावी यासाठी संबधित विभागांनी

Narayan Rane : 'कोण आदित्य ठाकरे?' "बाळासाहेबांनंतर शिवसेना राहिली नाही! नारायण राणेंचा उद्धव गटावर हल्लाबोल

चिपळूण : भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज चिपळूण दौऱ्यादरम्यान शिउबाठा नेतृत्वावर अत्यंत कडक शब्दांत टीका