Maharashtra Cabinet Expansion: आमदार नितेश राणे यांनी घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ

मुंबई: राज्यात आज मंत्रिमंडळाचा विस्तार(Maharashtra Cabinet Expansion) नागपुर येथे पार पडला. या हिवाळी अधिवेशनात भाजपकडून एकूण १९ मंत्र्‍यांनी शपथ घेतली. यामध्ये कणकणवली मतदार संघाचे आमदार नितेश नारायण राणे यांनीही कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली.


आज नागपूर विधानभवन येथे पार पडलेल्या शपथविधी समारंभात राज्यपाल श्री. सी. पी. राधाकृष्णन जी यांच्या हस्ते नितेश राणे यांना मंत्रिपदाची शपथ घेतली. हिंदुत्वाचे विचार आणखी भक्कम करण्यासाठी तसेच महाराष्ट्रातील व माझ्या विधानसभेतील जनतेची सेवा करण्यासाठी मंत्रिपदाचा उपयोग करणार असल्याचे नितेशजी राणे म्हणाले. नितेश राणे यांच्या रूपाने राज्यातील मंत्रिमंडळामध्ये तरूण चेहरा मिळाला आहे.


 


निवडणुकीत सलग तिसरा विजय


नितेश राणे सलग तिसऱ्यांदा कणकवली मतदार संघातून निवडून आले आहेत. नितेश राणे २०१४मध्ये पहिल्यांदा कणकवली मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंत २०१९मध्येही त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यातही त्यांनी विजय मिळवला होता. त्यानंतर २०२४मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत कणकवली मतदारसंघातून विजय मिळवत हॅटट्रिक साधली.

Comments
Add Comment

मराठा सेवा संघाच्या नकुल भोईरची हत्या, पत्नीला अटक

पुणे: पुणे जिल्ह्यातील चिंचवड परिसरात मध्यरात्री घडलेल्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. मराठा सेवा संघ आणि

पुणेकरांसाठी पुन्हा त्रासदायक बातमी; भिडे पूल पुन्हा बंद, नववर्षातच खुला होण्याची शक्यता

पुणे : पुणेकरांच्या दैनंदिन प्रवासातील एक महत्त्वाचा दुवा असलेला बाबाराव भिडे पूल पुन्हा एकदा वाहतुकीसाठी बंद

Maharashtra Rain Updates : पावसाचा जोर कायम! आज कुठे-कुठे कोसळणार वादळी पाऊस? २५ ते २८ ऑक्टोबर दरम्यान हवामान खात्याचा मोठा इशारा

मुंबई : सध्या दिवसभर जाणवणाऱ्या 'ऑक्टोबर हीट' (October Heat) मुळे नागरिक हैराण झाले असून, राज्यात उकाडा चांगलाच वाढला आहे.

Phaltan Doctor death case : ब्रेकिंग! फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात प्रशांत बनकर अखेर अटक

सातारा : साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील (Phaltan Sub District Hospital) महिला डॉक्टरच्या आत्महत्या (Suicide) प्रकरणात आता एक

वैमानिकाच्या सतर्कतेमुळे मोठे संकट टळले! नागपूरहून उड्डाण केलेल्या विमानाला धडकला पक्षी...

नागपूर: नागपूरहून दिल्लीला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानावरील मोठे संकट टळले. विमानाने उड्डाण करताच

राज्यातील बांगलादेशी घुसखोरांना दणका! राज्य सरकारचे मोठे पाऊल, रेशनकार्ड पडताळणीचे आदेश

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी वाढत चालली आहे. याकरता राज्यभरात