Maharashtra Cabinet Expansion: आमदार नितेश राणे यांनी घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ

मुंबई: राज्यात आज मंत्रिमंडळाचा विस्तार(Maharashtra Cabinet Expansion) नागपुर येथे पार पडला. या हिवाळी अधिवेशनात भाजपकडून एकूण १९ मंत्र्‍यांनी शपथ घेतली. यामध्ये कणकणवली मतदार संघाचे आमदार नितेश नारायण राणे यांनीही कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली.


आज नागपूर विधानभवन येथे पार पडलेल्या शपथविधी समारंभात राज्यपाल श्री. सी. पी. राधाकृष्णन जी यांच्या हस्ते नितेश राणे यांना मंत्रिपदाची शपथ घेतली. हिंदुत्वाचे विचार आणखी भक्कम करण्यासाठी तसेच महाराष्ट्रातील व माझ्या विधानसभेतील जनतेची सेवा करण्यासाठी मंत्रिपदाचा उपयोग करणार असल्याचे नितेशजी राणे म्हणाले. नितेश राणे यांच्या रूपाने राज्यातील मंत्रिमंडळामध्ये तरूण चेहरा मिळाला आहे.


 


निवडणुकीत सलग तिसरा विजय


नितेश राणे सलग तिसऱ्यांदा कणकवली मतदार संघातून निवडून आले आहेत. नितेश राणे २०१४मध्ये पहिल्यांदा कणकवली मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंत २०१९मध्येही त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यातही त्यांनी विजय मिळवला होता. त्यानंतर २०२४मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत कणकवली मतदारसंघातून विजय मिळवत हॅटट्रिक साधली.

Comments
Add Comment

नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेला इन्क्यूबेशन सेंटर म्हणून मान्यता

मुंबई: विदर्भातील नवउद्योग (स्टार्टअप) परिसंस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत,

नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; कृषीमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून, नमो

‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक’ विधानपरिषदेत मंजूर

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून चर्चेत असलेले आणि अत्यंत कडक तरतुदी असलेले ‘महाराष्ट्र

सिंधुदुर्गच्या विकासाला बुस्टर; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १०० टक्के 'व्हिजीएफ'ला मंजुरी

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला आणि अर्थव्यवस्थेला मोठी गती देणारा निर्णय मंगळवारी राज्य

नंदूरबार,छत्रपती संभाजीनगरमधील गैरव्यवहारासाठी 'एसआयटी स्थापन; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधान परिषदेत घोषणा

​मुंबई: नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर येथील भूसंपादन गैरव्यवहार आणि छत्रपती संभाजीनगरमधील ब्रिजवाडी येथील ५४

रब्बी हंगामातील 'ई-पीक पाहणी'ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

- ४५ टक्के शेतकरी अजूनही प्रक्रियेबाहेर; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील रब्बी