Ministry Expansion : ठरलं तर! मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूरलाचं होणार

  145

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर राज्य सरकार स्थापन झाल्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. १६ डिसेंबरपूर्वी आम्ही मंत्रिमंडळ विस्तार करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यापूर्वीच म्हटलं होतं. त्यानुसार राजभवनात महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार शनिवारी होण्याची शक्यता असून शपथविधीच्या तयारीची लगबग सुरू असल्याचे वृत्त आले होते. मात्र, आता थेट नागपूरलाच (Nagpur) महायुती सरकाच्या मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आमदारांची सोय व्हावी, या उद्देशाने शनिवार ऐवजी रविवारी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, तिन्ही पक्षातील बडे नेते आपल्या मंत्रिपदासाठी आग्रही आहेत. मात्र, यंदा भाजपकडून नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.



महायुती सरकारच्या मंत्रिपदाच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब झाला असून लवकरच नवीन मंत्री शपथ घेणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे १०, शिवसेनेचे १२ आणि भाजपचे २१ मंत्री शपथ घेणार आहेत. यामध्ये कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपदाचा समावेश आहे. मात्र, ऐनवेळी या नावांवर शिक्कामोर्तब होऊन अधिकृतपणे ती जाहीर केली जाऊ शकतात. त्यामध्ये, काहीसे बदलही होण्याची शक्यता आहे. मात्र, नव्या मंत्र्यांचा शपथविधी आता नागपूरला होणार असल्याचं समजतंय.




आमदारांच्या सोईसाठी शपथविधी १५ तारखेला नागपुरात होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. १६ तारखेपासून विधीमंडळाचं अधिवेशन असल्यामुळे १५ तारखेला नागपुरात शपथविधी होऊ शकतो, अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे, मुंबईतील राजभवन ऐवजी आता नागपुरातच तयारीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, नागपुरमध्ये पहिल्यांदाच मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो.

Comments
Add Comment

कोकण रेल्वे मुंबई-मडगाव मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी मुंबई मडगाव मार्गावर धावणार आहे. या गाडीचे आरक्षण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती