Ministry Expansion : ठरलं तर! मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूरलाचं होणार

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर राज्य सरकार स्थापन झाल्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. १६ डिसेंबरपूर्वी आम्ही मंत्रिमंडळ विस्तार करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यापूर्वीच म्हटलं होतं. त्यानुसार राजभवनात महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार शनिवारी होण्याची शक्यता असून शपथविधीच्या तयारीची लगबग सुरू असल्याचे वृत्त आले होते. मात्र, आता थेट नागपूरलाच (Nagpur) महायुती सरकाच्या मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आमदारांची सोय व्हावी, या उद्देशाने शनिवार ऐवजी रविवारी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, तिन्ही पक्षातील बडे नेते आपल्या मंत्रिपदासाठी आग्रही आहेत. मात्र, यंदा भाजपकडून नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.



महायुती सरकारच्या मंत्रिपदाच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब झाला असून लवकरच नवीन मंत्री शपथ घेणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे १०, शिवसेनेचे १२ आणि भाजपचे २१ मंत्री शपथ घेणार आहेत. यामध्ये कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपदाचा समावेश आहे. मात्र, ऐनवेळी या नावांवर शिक्कामोर्तब होऊन अधिकृतपणे ती जाहीर केली जाऊ शकतात. त्यामध्ये, काहीसे बदलही होण्याची शक्यता आहे. मात्र, नव्या मंत्र्यांचा शपथविधी आता नागपूरला होणार असल्याचं समजतंय.




आमदारांच्या सोईसाठी शपथविधी १५ तारखेला नागपुरात होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. १६ तारखेपासून विधीमंडळाचं अधिवेशन असल्यामुळे १५ तारखेला नागपुरात शपथविधी होऊ शकतो, अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे, मुंबईतील राजभवन ऐवजी आता नागपुरातच तयारीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, नागपुरमध्ये पहिल्यांदाच मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये