रासायनिक वायू पसरविल्याप्रकरणी कंपनीविरोधात गुन्हा

  74

बदलापूर : बदलापुरात रासायनिक वायूमुळे रस्त्यावर धुके पसरण्यास व नागरिकांना झालेल्या त्रासास एमआयडीसीतील एका कंपनीचा हलगर्जीपणा कारणीभूत ठरल्याचे समोर आले आहे. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी कंपनीतील टेक्निशियन व सुपरवायजर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. बदलापूर शहराच्या पूर्व भागात खरवई ते शिरगाव औद्योगिक वसाहत पसरली आहे. गेल्या काही वर्षात या औद्योगिक वसाहतीच्या शेजारी मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले आहे. या कंपन्यांमधून अनेकदा रासायनिक वायू सोडण्याच्या तक्रारी आसपासचे रहिवासी करतात. हिवाळ्यात रासायनिक वायूचा हा त्रास अधिक जाणवतो.



बुधवारी रात्रीही नऊच्या सुमारास खरवई, शिरगाव, दत्तवाडी या औद्योगिक वसाहती शेजारच्या परिसरामध्ये रहिवाशांना डोळे चुरचुरणे आणि श्वसनाचा त्रास जाणवला. तर बदलापूर कर्जत राज्यमार्गावर धुके पसरल्यासारखी परिस्थिती होती. एखाद्या कंपनीने धूर सोडल्याने झाला आहे की वायुगळतीमुळे, हे कळायला मार्ग नव्हता. अखेर एमआयडीसीतील टिनको या कंपनीत दोन कामगार रसायनावर प्रक्रिया करताना नायट्रोजन डायऑक्साईड मोठ्या प्रमाणात तयार होऊन पसरल्याने हा प्रकार झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.


त्यानुसार पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत कंपनीचा टेक्निशियन नित्यानंद बोरा व सुपर वायजर प्रशांत शाहू यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांनी
दिली आहे.

Comments
Add Comment

खाडी बुजवली, मासेमारी संपली…!

कोळी समाजाच्या उपजीविकेवर ‘विकासा’चे काळे वादळ ठाणे  : ठाणे जिल्ह्यातील पारंपरिक मासेमारी करणाऱ्या कोळी

बदलापूरकरांवर पाणीकपातीचे संकट

बदलापूर : दरवर्षीच्या तुलनेत यंदा मान्सून वेळेअगोदर दाखल झाल्याने पाणीटंचाईचा सामना बदलापूरकरांना करावा

Eknath Shinde: ठाणे आणि परिसरातील वाहतूक कोंडी तातडीने दूर करा: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले निर्देश

ठाणे परिसरातील वाहतूक कोंडी मुक्त करण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश  ठाणे: ठाणे आणि परिसरातील वाहतूक

कल्याणमध्ये कोकण वसाहतीच्या पुनर्विकासासाठी आमरण उपोषण

चौदा वर्षे उलटूनही बाधित सदनिकाधारकांची फरफट थांबेना कल्याण : सुमारे चौदा वर्षे उलटूनही कल्याण पश्चिमेतील कोकण

उबाठा गटाचे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश

रामदास कांबळे यांची युवासेना कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती जाहीर ठाणे: मुंबई महानगरपालिकेतील सायन कोळीवाडा

भारत महासत्ता न होण्यासाठी तरुणाईला अंमली पदार्थांच्या आहारी लोटण्याचा परकीय शक्तींचा डाव

आयआरएस समीर वानखेडे यांचे वक्तव्य कल्याण  : ''आपला भारत देश हा महासत्ता होण्याच्या दिशेने अतिशय विश्वासाने आणि