रासायनिक वायू पसरविल्याप्रकरणी कंपनीविरोधात गुन्हा

  56

बदलापूर : बदलापुरात रासायनिक वायूमुळे रस्त्यावर धुके पसरण्यास व नागरिकांना झालेल्या त्रासास एमआयडीसीतील एका कंपनीचा हलगर्जीपणा कारणीभूत ठरल्याचे समोर आले आहे. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी कंपनीतील टेक्निशियन व सुपरवायजर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. बदलापूर शहराच्या पूर्व भागात खरवई ते शिरगाव औद्योगिक वसाहत पसरली आहे. गेल्या काही वर्षात या औद्योगिक वसाहतीच्या शेजारी मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले आहे. या कंपन्यांमधून अनेकदा रासायनिक वायू सोडण्याच्या तक्रारी आसपासचे रहिवासी करतात. हिवाळ्यात रासायनिक वायूचा हा त्रास अधिक जाणवतो.



बुधवारी रात्रीही नऊच्या सुमारास खरवई, शिरगाव, दत्तवाडी या औद्योगिक वसाहती शेजारच्या परिसरामध्ये रहिवाशांना डोळे चुरचुरणे आणि श्वसनाचा त्रास जाणवला. तर बदलापूर कर्जत राज्यमार्गावर धुके पसरल्यासारखी परिस्थिती होती. एखाद्या कंपनीने धूर सोडल्याने झाला आहे की वायुगळतीमुळे, हे कळायला मार्ग नव्हता. अखेर एमआयडीसीतील टिनको या कंपनीत दोन कामगार रसायनावर प्रक्रिया करताना नायट्रोजन डायऑक्साईड मोठ्या प्रमाणात तयार होऊन पसरल्याने हा प्रकार झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.


त्यानुसार पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत कंपनीचा टेक्निशियन नित्यानंद बोरा व सुपर वायजर प्रशांत शाहू यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांनी
दिली आहे.

Comments
Add Comment

दिवा ते सीएसएमटी जलद लोकल सुरू करा

शिवसेना खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांची रेल्वे प्रशासनाकडे मागणी लोकल १५ डब्ब्यांमध्ये परावर्तित करणे  पाचवी,

Mumbai Local Train Accident : महत्त्वाची अपडेट...अपघातात लोकल ट्रेनमधून खाली पडून 'इतके' जण जखमी, मृतांची ओळख पटली

मुंबई : आज (सोमवार) सकाळी ९.२०च्या वाजताच्या सुमारास कसारा ते सीएसएमटी या धावत्या फास्ट लोकल ट्रेनमधून जवळपास

Mumbai Railway Accident: अपघातानंतर मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; लोकल ट्रेनला ऑटोमॅटिक दरवाजे बसवणार

मुंबई उपनगरीय लोकलच्या डब्यांचे केले जाणार रीडिझाईनिंग ठाणे: मध्य रेल्वेमार्गावर आज सकाळी झालेल्या भीषण

Mumbai Train Accident: मध्य रेल्वे मार्गावर भीषण अपघात! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, ६ जणांचा मृत्यू

दोन लोकलमधील प्रवासी एकमेकांना घासल्याने भयंकर घटना ठाणे: मध्य रेल्वेमार्गावर आज ९ जून रोजी सकाळी एक मोठा अपघात

जिल्हा रुग्णालयात पोषणयुक्त आहाराविषयी जनजागृती

ठाणे : ‘व्यायाम हे शरीरासाठी ज्ञान असेल, तर सकस आहार हे चांगले संस्कार आहेत,’ या विचारातून ठाण्यातील वि.सा. सामान्य

ठाणे-अहिल्यानगरमध्ये उबाठा गटाला खिंडार

शहापुरातील सुमारे ७०० कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश उच्चशिक्षित तरुण राजकारणात येणं ही काळाची गरज ठाणे  :