रासायनिक वायू पसरविल्याप्रकरणी कंपनीविरोधात गुन्हा

बदलापूर : बदलापुरात रासायनिक वायूमुळे रस्त्यावर धुके पसरण्यास व नागरिकांना झालेल्या त्रासास एमआयडीसीतील एका कंपनीचा हलगर्जीपणा कारणीभूत ठरल्याचे समोर आले आहे. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी कंपनीतील टेक्निशियन व सुपरवायजर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. बदलापूर शहराच्या पूर्व भागात खरवई ते शिरगाव औद्योगिक वसाहत पसरली आहे. गेल्या काही वर्षात या औद्योगिक वसाहतीच्या शेजारी मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले आहे. या कंपन्यांमधून अनेकदा रासायनिक वायू सोडण्याच्या तक्रारी आसपासचे रहिवासी करतात. हिवाळ्यात रासायनिक वायूचा हा त्रास अधिक जाणवतो.



बुधवारी रात्रीही नऊच्या सुमारास खरवई, शिरगाव, दत्तवाडी या औद्योगिक वसाहती शेजारच्या परिसरामध्ये रहिवाशांना डोळे चुरचुरणे आणि श्वसनाचा त्रास जाणवला. तर बदलापूर कर्जत राज्यमार्गावर धुके पसरल्यासारखी परिस्थिती होती. एखाद्या कंपनीने धूर सोडल्याने झाला आहे की वायुगळतीमुळे, हे कळायला मार्ग नव्हता. अखेर एमआयडीसीतील टिनको या कंपनीत दोन कामगार रसायनावर प्रक्रिया करताना नायट्रोजन डायऑक्साईड मोठ्या प्रमाणात तयार होऊन पसरल्याने हा प्रकार झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.


त्यानुसार पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत कंपनीचा टेक्निशियन नित्यानंद बोरा व सुपर वायजर प्रशांत शाहू यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांनी
दिली आहे.

Comments
Add Comment

ठाणे आणि विरार बुलेट ट्रेन स्थानक होणार स्मार्ट; एमएमआरडीएचा मास्टर प्लॅन

प्रवाशांना अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध ठाणे : मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील महाराष्ट्रातील ठाणे

पाणीटंचाई विरोधात पीएनटी कॉलनीतील नागरिकांचा कडोंमपा मुख्यालयावर मोर्चा

२५ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील डोंबिवली पूर्वेतील नांदिवली

मीरा-भाईंदरमधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापौर सक्रिय

भाईंदर : शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेली वाहतूक कोंडीची समस्या, त्यामुळे सामान्य नागरिकांना होणारा त्रास तसेच

श्रद्धेच्या सान्निध्यातील शाश्वततेचा भव्य संकल्प ‘निसर्गायण’

टिटवाळा ठरणार पर्यावरण –पर्यटनाचे नवे केंद्र कल्याण : श्रद्धा, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरणीय जबाबदारी यांचा

कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांचा पुन्हा हल्ला; ७ वर्षांच्या मुलाचा मृत्यू, परिसरात संताप

कल्याण : काही दिवसांपूर्वीच कुत्र्याच्या चाव्यानंतर भीतीतून एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली होती.

भटका कुत्रा चावला अन् तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

कल्याण : दहशतवादी संघटनांप्रमाणेच आता भटक्या कुत्रांचीही दहशत अनेक शहरात वाऱ्यासारखी परसरत आहेत. अनेक