रासायनिक वायू पसरविल्याप्रकरणी कंपनीविरोधात गुन्हा

बदलापूर : बदलापुरात रासायनिक वायूमुळे रस्त्यावर धुके पसरण्यास व नागरिकांना झालेल्या त्रासास एमआयडीसीतील एका कंपनीचा हलगर्जीपणा कारणीभूत ठरल्याचे समोर आले आहे. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी कंपनीतील टेक्निशियन व सुपरवायजर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. बदलापूर शहराच्या पूर्व भागात खरवई ते शिरगाव औद्योगिक वसाहत पसरली आहे. गेल्या काही वर्षात या औद्योगिक वसाहतीच्या शेजारी मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले आहे. या कंपन्यांमधून अनेकदा रासायनिक वायू सोडण्याच्या तक्रारी आसपासचे रहिवासी करतात. हिवाळ्यात रासायनिक वायूचा हा त्रास अधिक जाणवतो.



बुधवारी रात्रीही नऊच्या सुमारास खरवई, शिरगाव, दत्तवाडी या औद्योगिक वसाहती शेजारच्या परिसरामध्ये रहिवाशांना डोळे चुरचुरणे आणि श्वसनाचा त्रास जाणवला. तर बदलापूर कर्जत राज्यमार्गावर धुके पसरल्यासारखी परिस्थिती होती. एखाद्या कंपनीने धूर सोडल्याने झाला आहे की वायुगळतीमुळे, हे कळायला मार्ग नव्हता. अखेर एमआयडीसीतील टिनको या कंपनीत दोन कामगार रसायनावर प्रक्रिया करताना नायट्रोजन डायऑक्साईड मोठ्या प्रमाणात तयार होऊन पसरल्याने हा प्रकार झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.


त्यानुसार पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत कंपनीचा टेक्निशियन नित्यानंद बोरा व सुपर वायजर प्रशांत शाहू यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांनी
दिली आहे.

Comments
Add Comment

मीरा भाईंदर होणार देशातील पहिले फ्री वायफाय शहर

भाईंदर (वार्ताहर) : मीरा-भाईंदर शहरातील नागरिकांना विनामूल्य वायफाय सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. १५ डिसेंबर

डोंबिवलीत मनसेला खिंडार!

दोन माजी नगरसेवक व नगरसेविका भाजपमध्ये डोंबिवली  : मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष आणि डोंबिवली पश्चिमेतील

जलमापक सहा महिन्यांपासून बंद; पाणीपुरवठा खंडित होणार

नादुरुस्त जलमापक बदलण्यासाठी पालिकेची मोहीम भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेकडून शहरातील जलमापक जर सहा

प्रचार तोफा थंडावण्यापूर्वी मतदानाच्या तारखांमध्ये केला बदल, निवडणूक अधिकाऱ्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण

ठाणे: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील निवडणूकीच्या प्रचार तोफा आज थंडावणार आहेत.

बाल हक्क आयोगाचे कडोंमपा अधिकाऱ्यांवर चौकशीचे आदेश

ड्रेनेजमध्ये पडून बालक मृत्यूप्रकरण कल्याण  : कल्याण-डोंबिवली पालिकेच्या निष्काळजीपणामुळे डोंबिवली येथे

भिवंडीत विकासकाकडून १०० कोटींचा घोटाळा?

फसवणूक झालेल्या कुटुंबाचे आ. संजय केळकर यांना साकडे ठाणे  : भिवंडीजवळील खारबाव येथे सुरू असलेल्या इमारत