Ratnagiri : रत्नागिरीत महानमन लोककलेच्या निर्मितीला प्रारंभ

रत्नागिरी: रत्नागिरीत गेल्यावर्षी भरविण्यात आलेल्या नमन महोत्सवाला उत्तम प्रतिसाद मिळाला. अनेक स्थानिक कलाकारांना एक मोठे व्यासपीठसुद्धा मिळाले होते. रत्नागिरी आणि परिसरात होणाऱ्या या ‘नमन खेळे’ या लोककलेला उत्तम भविष्य आहे. अशा येथील या मंडळातील कलावंताच्या एकत्रित सहभागातून महानमनाची मुहूर्तमेढ यावर्षीही उभारी घेण्यास सज्ज होत आहे.



रत्नागिरी तालुका कोकण नमन कलामंचाच्या वतीने या महानमन निर्मितीचा प्रारंभ झाला. त्यावेळी अध्यक्ष प्रभाकर ऊर्फ पी. टी. कांबळे, उपाध्यक्ष अरुण कळंबटे, संस्थापक अध्यक्ष श्रीधर खापरे, सुरेश होरंबे, विश्वनाथ गावडे, धनावडे, श्रीकांत बोंबले तसेच संस्थेचे इतर पदाधिकारी आणि सदस्य, कार्यकारिणी सदस्य व कलावंत उपस्थित होते. या कलाकृतीसाठी सर्व पदाधिकारी, सदस्य मेहनत घेत आहेत.

कोणत्याही कलेला राजसत्तेचे पाठबळ मिळाले की ती कला आणि कलाकार बहरतात. कोकण ही कलेची, कलाकारांची भूमी आहे. या लोककलेच्या माध्यमातून समाजप्रबोधनपर भाष्य, काल्पनिक, पौराणिक, ऐतिहासिक कथांच्या आधारे एक चित्तथरारक वगनाट्य सादर करीत नमनाचा सांगावा केला जातो. यातूनच रंगभूमीची सेवा केली जाते. महानमन निर्मितीतून कलाकार व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयास आहे.
Comments
Add Comment

या वर्षीही हापूसची चव उशिराच; आंबा बागायतदार चिंतेत !

लांबलेल्या पावसाचा कोकणातील आंबा उत्पादनावर परिणाम रत्नागिरी (वार्ताहर) : यंदा पावसाने मुक्काम वाढविला आहे. या

माणगावकरांची वाहतूक कोंडीतून सुटका

माणगाव-इंदापूर बायपासचे काम सुरू माणगाव (वार्ताहर): मुंबई-गोवा महामार्ग गेली अनेक वर्ष रखडला आहे. या रखडलेल्या

सिंधुदुर्ग -शिरोडा वेळागर समुद्रात नऊ पर्यटक बुडाले

तिघांचे मृतदेह हाती लागले असून, अन्य एकाचा शोध सुरू आहे शिरोडा : सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सिंधुदुर्ग -शिरोडा

संघाच्या शिस्तबद्ध संचलनात मंत्री नितेश राणे सहभागी; स्वयंसेवकांसोबत साजरा केला विजयादशमी उत्सव

देवगड (जि. सिंधुदुर्ग) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्ष पूर्ण झाल्याच्या ऐतिहासिक प्रसंगी मंत्री नितेश राणे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्ते होणार खड्डेमुक्त, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून निधी मंजूर

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खड्डे बुजून रस्त्यांची डागडुजी करावी, रस्ते सुस्थितीत व्हावे,

करूळ घाटात कोसळली दरड, वाहतूक काही काळ ठप्प

वैभववाडी: तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे करुळ घाटात दरड कोसळल्याने शुक्रवारी सायंकाळी या