देशातील ९९४ संपत्तींवर वक्फचा अवैध ताबा, केंद्राची संसदेत माहिती

नवी दिल्ली: देशभरातली एकूण ९९४ संपत्तींवर वक्फने अवैधरित्या अतिक्रमण केले असल्याची माहिती सोमवारी केंद्र सरकारने संसदेत दिली. यामध्ये एकट्या तामिळनाडूमध्ये सर्वाधिक ७३४ अशा संपत्ती आहेत. भारतीय कम्युनिस्ट पक्ष(मार्क्सवादी)चे नेते जॉन ब्रिटास यांच्या प्रश्नावर उत्तर देताना अल्पसंख्याक मंत्रालयाने ही माहिती दिली. देशात वक्फच्या अधिनियमांतर्गत ८७२,३५२ स्थावर आणि १६,७१३ स्थावर नसलेल्या मालमत्ता नोंदणीकृत आहेत.



केंद्राने संसदेत दिली माहिती


अल्पसंख्यांक मंत्रालयाचे मंत्री किरेन रिजीजू यांनी एका प्रश्नावरील उत्तरादरम्यान सांगितले, माहितीनुसार ९९४ संपत्तींवर वक्फने अवैधरित्या ताबा घेतल्याची माहिती मिळाली आहे. देशभरातली एकूण ९९४ संपत्तींपैकी तामिळनाडूमध्ये सर्वाधिक ७३४ संपत्ती आहेत ज्यांच्यावर वक्फचा अवैधरित्या ताबा आहे. यानंतर आंध्र प्रदेशात १५२, पंजाबम्ध्ये ६३, उत्तराखंडमध्ये ११ आणि जम्मू-काश्मीरमध्ये १० अशा संपत्ती आहेत.



२०१९ नंतर वक्फला एकही जमीन मिळालेली नाही


केंद्रीय नागरी तसेच शहरी मंत्रालयाने सोमवारी राज्यसभेत सांगितले की केंद्र सरकारद्वारे २०१९ नंतर वक्फ बोर्डाला कोणतीही जमीन देण्यात आलेली नाही. २०१९ पासून आतापर्यंत केंद्र आणि राज्य सरकारकडून वक्फ बोर्डाला दिलेल्या जमीनीबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मंत्रालयाने सांगितले की राज्य सरकारांनी दिलेल्या जमिनीबाबतचा कोणताही डेटा नाही आहे. दरम्यान, जोपर्यंत नागरी आणि शहरी बाबतीतील मंत्रालयाचा सवाल आहे तर २०१९ नंतर भारत सरकारकडून वक्फ बोर्डाला कोणतीही जमीन उपलब्ध करण्यात आलेली नाही.

Comments
Add Comment

Indian Student in America: कॅलिफोर्नियामध्ये बेपत्ता झालेल्या भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह सहा दिवसांनी सापडला

बंगळुरू: अमेरिकेतील कॅलिफोर्निया या राज्यात बेपत्ता झालेल्या २२ वर्षीय भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला

Krishna Heritage Tower : भारतात उभे राहणार ४३० फुटांचे सर्वात उंच आध्यात्मिक स्थळ; लवकरच साकारणार 'हरे कृष्ण हेरिटेज टॉवर'

हैदराबाद : आपले गजबजलेले रस्ते, शतकानुशतके जुने वास्तूशिल्प आणि लज्जतदार खाद्यसंस्कृतीसाठी प्रसिद्ध असलेले

Assam Emergency Landing Highway: पंतप्रधान मोदींच्या हस्ते देशातील पहिल्या विशेष 'इमर्जन्शी लँडिंग' सुविधेची सुरुवात

आसाम: यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आसाममध्ये राजकारण तापले आहे. राजकीय पक्षांकडून निवडणुकीची जोरदार

Startup India FoF 2.0 : मोदी सरकारचा 'मास्टरस्ट्रोक'! स्टार्टअप्ससाठी १०,००० कोटींचा 'फंड ऑफ फंड्स २.०' मंजूर; टर्नओव्हरची मर्यादाही वाढवली

नवी दिल्ली : भारतीय स्टार्टअप्सना जागतिक स्तरावर नेण्यासाठी आणि स्वदेशी गुंतवणुकीला बळ देण्यासाठी केंद्र

Kumar Bhaskar Verma Bridge: आसाममधील ब्रह्मपुत्रेवरील ६ पदरी पुलाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

आसाम: यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आसाममध्ये राजकारण तापले आहे. राजकीय पक्षांकडून निवडणुकीची जोरदार

Narendra Modi: पुलवामा हल्ल्याला ६ वर्षे पूर्ण; मोदींनी वाहिली शहीद जवानांना श्रद्धांजली

मुंबई: पुलवामा हल्ल्याला आज सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. याच निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी x वर एक भावूक