राज्यातील वाघांची संख्या वाढतेय

अमरावती: महाराष्ट्रात वाघांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वन्यजीव संस्थेच्या अहवालानुसार 2022 च्या व्याघ्र गणनेनुसार महाराष्ट्रात जवळपास ४४६ वाघ आहेत. २००६ मध्ये महाराष्ट्रात वाघांची संख्या ही १०३ इतकी होती. २०१० च्या व्याघ्रगणनेनुसार महाराष्ट्रात वाघांची संख्या ही १६८ वर पोहोचली. २०१४ मध्ये महाराष्ट्रात एकूण १९० वाघ होते. पुढील चार वर्षात वाघांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली.


२०१८ च्या व्याघ्र गणनेनुसार महाराष्ट्रात ३१२ वाघ होते. वाघांच्या संख्यावाढीचा आलेख पुढील चार वर्षे देखील कायम राहिला. २०२२ च्या व्याघ्र गणनेनुसार आज महाराष्ट्रात जवळपास ४४६ वाघ आहेत. राज्यात वाघांचे प्रमाण हे २३ टक्क्याने वाढत असल्याचे शुभ संकेत आहेत, असे महाराष्ट्र वन्यजीव मंडळाचे माजी सदस्य यादव तरटे यांनी सांगितले.


व्याघ्र संवर्धनासाठी सज्ज होण्याची गरज :- आज वाघांच्या बाबतीत जगात भारत पहिल्या क्रमांकावर आहे. त्यातही महाराष्ट्रात वाघांची संख्या सर्वाधिक असणे, ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. १९०० मध्ये भारतात एकूण ४०,००० वाघ होते. १९७१ मध्ये दुर्दैवाने भारतात केवळ १८०० वाघ उरले होते. देशाच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी वाघांच्या मोठ्या प्रमाणात खालावलेल्या संख्येची गांभीर्याने दखल घेत भारतीय वन्यजीव अधिनियम १९७२ हे कलम लागू केले. तसेच १९७३ मध्ये व्याघ्र प्रकल्प योजना जाहीर केली.


व्याघ्र प्रकल्पावर मोठी जबाबदारी : - व्याघ्र प्रकल्प योजनेमुळे वाघांसह जंगलातील इतर प्राण्यांचे संरक्षण व्हायला लागले. आता वाघांची संख्या वाढायला लागली असतानाच हे वाघ जंगलाबाहेर जाणार नाही, याबाबत व्याघ्र प्रकल्पावर मोठी जबाबदारी राहणार आहे. वाघ आणि मानवांचा संघर्ष होणार नाही, याची काळजी घेणे देखील गरजेचे आहे. वाघांची शिकार होणार नाही, याबाबत देखील व्याघ्र प्रकल्पासह वन विभागाला सज्ज राहणे अत्यंत गरजेचे आहे, असे देखील यादव तरटे म्हणाले.


वाघांची ७० टक्के संख्या भारतात :- २०१८ मध्ये संपूर्ण जगात एकूण ३८९० वाघ आढळून आले आहेत. २०१८ मध्ये भारतात वाघांची संख्या ही २९६७ इतकी होती. आज 2023 मध्ये भारतात एकूण ३१६७ वाघ आहेत. या ३ हजार १६७ वाघांपैकी ४४६ वाघ हे महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात वाघांची संख्या ही सर्वाधिक विदर्भात आहे. वाघांची संख्या आता झपाट्याने वाढत आहे. वाघांचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. व्याघ्र प्रकल्प आणि महाराष्ट्र शासन महाराष्ट्रातील वाघांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यास निश्चितपणे यशस्वी ठरेल, असा विश्वास देखील यादव तरटे यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

Yavatmal Bus Fire : यवतमाळ-भारी विमानतळ मार्गावर मिनी ट्रॅव्हल्स जळून खाक; जळत्या ट्रॅव्हल्समधून...

यवतमाळ : वर्धा येथून नांदेडच्या दिशेने प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एका मिनी ट्रॅव्हल्सला यवतमाळ शहराजवळील भारी

दीर्घ काळापासून प्रलंबित शिक्षक भरतीचा मार्ग अखेर मोकळा

-‘पवित्र’ पोर्टलद्वारेच होणार नियुक्त्या; खासगी संस्थांना ‘रोस्टर’चे बंधन, राज्यातील हजारो उमेदवारांना

पुण्यात ईदनिमित्त वाहतुकीत बदल; लष्कर परिसरातील काही रस्ते बंद

पुणे : रमजान ईदनिमित्त लष्कर भागातील इदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठणाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर

ST Bus : उत्पन्नाच्या तुलनेत 'एसटी'ला दररोज २ कोटींचा तोटा

- महसूल वाढीसाठी इंधन विक्री क्षेत्रात उतरणार; परिवहन मंत्री सरनाईक यांनी आखली विशेष योजना मुंबई : राज्याची

अस्पृश्यता आणि विषमता हा मानवतेविरुद्धचा सर्वात मोठा अपराध

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; चवदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्षानिमित्त विविध प्रकल्पांचे भूमिपूजन मुंबई :

डिझेल खरेदीतून वर्षाला २४१ कोटी रुपयांची बचत होणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली माहिती

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) आर्थिक स्थिती सक्षम करण्यासाठी पर्यायी उत्पन्न स्रोत