CM Devendra Fadnavis : शब्दांचे पक्के! कोपर्डी दुर्घटनेतील पीडितेच्या बहिणीच्या लग्नात मुख्यमंत्र्यांची हजेरी

कोपर्डी : आठ वर्षांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी गावात मनाला हेलावणारी घटना घडली होती. एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. परंतु यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनकडून तिच्या बहिणीच्या लग्नाबद्दल चिंता व्यक्त केली होती. तेव्हा 'तिच्या लग्नाची जबाबदारी मी घेतो आणि त्या लग्नालाही मी आवर्जून येईन', असा शब्द देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी दिला होता. त्यामुळे दिलेला शब्द पाळत आज मुख्यमंत्र्यांनी कोपर्डी दुर्घटनेतील पीडितेच्या बहिणीच्या लग्नात हजेरी लावली.



शब्दांचे पक्के, असे आमचे नेते -प्रवीण दरेकर


भाजपा नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी याबाबत फेसबुक आणि एक्सवर (आधीचे ट्विटर) पोस्ट केली आहे. यामध्ये 'शब्दांचे पक्के... असे आहेत आमचे नेते...आज तो दिवस उगवला आणि आमचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्या लग्नसोहळ्याला हजेरी लावत आपला शब्द पाळला. वधू-वराला भरभरून आशिर्वाद दिले. नेता असावा तर असा, दिलेला शब्द पाळणारा'. या लग्नात मंगलाष्टक म्हणण्याची संधी मला लाभली, कुटुंबीयांनी ती संधी मला दिली, त्याबद्दल मी मनापासून त्यांचा आभारी आहे. सुजय विखे पाटील, राम शिंदे हे सुद्धा यावेळी उपस्थित होते, असं प्रवीण दरेकर म्हणाले.



देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?


विवाहाचे निमंत्रण होतं, त्यामुळे कोपर्डीत आलो. वधू -वराला शुभेच्छा दिल्या. आज दोन कुटुंब एकत्र येत आहेत. सर्वजण वधू -वराला आर्शीवाद देण्यासाठी या विवाह सोहळ्याला आले आहेत. मी वधू वराला शुभेच्छा देतो असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.

Comments
Add Comment

Nanded Mumbai Flight : प्रतीक्षा संपली! नांदेड-मुंबई, गोवा विमानसेवेचा 'मुहूर्त' ठरला, मुंबई, गोव्याचा प्रवास तासाभरात; पहिलं उड्डाण कधी?

नांदेड : नांदेडमधील प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. बहुप्रतीक्षित नांदेड-मुंबई (Nanded-Mumbai) आणि नांदेड-गोवा

राज्यातील 'या' पाच समुद्रकिनाऱ्यांना मिळणार 'ब्लू फ्लॅग'? नामांकनासाठी किनाऱ्यांचे सुरक्षा ऑडीट होणार लवकरच पूर्ण

महाराष्ट्र: राज्यातील पाच समुद्रकिनाऱ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'ब्ल्यू फ्लॅग'साठी प्रायोगिक तत्त्वावर

कल्याण-डोंबिवलीला फटाक्यांच्या आतषबाजीमुळे प्रदूषणाचा विळखा

केडीएमसीतील नागरिक श्वसनाच्या आजाराने त्रस्त कल्याण (प्रतिनिधी) : नुकताच दिवाळी सण सर्वत्र मोठ्या उत्साहात

परतीच्या पावसाने भातपिके उद्ध्वस्त, बळीराजा आर्थिक अडचणीत

रायगड : रायगड जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले

मुदखेडमध्ये संतप्त शेतकऱ्याचा तहसीलदारांच्या गाडीवर हल्ला: पोलिसांनी घेतले ताब्यात

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे एका संतप्त शेतकऱ्याने तहसीलदारांच्या वाहनाची काच फोडल्याची घटना घडली,

नेरळ–माथेरान मिनी ट्रेन’ पुन्हा रुळावर!

पर्यटकांसाठी ऐतिहासिक रेल्वे सेवा १ नोव्हेंबरपासून रायगड : महाराष्ट्रातील प्रसिद्ध