Food Poisoning : विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ! चंद्रपूरमध्ये १०६ जणांना अन्नातून विषबाधा

  58

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील सावली पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या पारडी जिल्हा परिषद शाळेत पहिली ते चौथ्या वर्गापर्यंत शिक्षण घेत असलेल्या १०६ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा (Food Poisoning) झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सदर विद्यार्थ्यांवर ग्रामीण रुग्णालय सावली व मुल उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, सदर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्य समिती गठित करण्यात आली आहे.



नेमके प्रकरण काय?


सावली तालुक्यातील पारडी येथील जिल्हा परीषद शाळेत विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा झाली. या शाळेत एकूण १२६ विद्यार्थ्यांना खिचडी देण्यात आली. या विद्यार्थ्यांनी खिचडी खाल्ल्यानंतर त्यातील १०६ विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या पोटामध्ये दुखणे सुरू झाल्याने, विद्यार्थ्यांनी घराकडे धाव घेतली. विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना पोटात दुखत असल्याचे व उलट्या झाल्याचे सांगितले असता पालकांनी त्यांना सावली ग्रामीण रुग्णालय येथे उपचाराकरिता दाखल केले. सदर विद्यार्थ्यांवर ग्रामीण रुग्णालय सावली व मुल उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.


दरम्यान, सदर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्य समिती गठित करण्यात आलेली असून सदर समिती आपला अहवाल लवकरच सादर करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. (Food Poisoning)

Comments
Add Comment

ST : राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर (भंगार केंद्र) एसटीच्या जागेवर उभारले जाणार, एसटी साठी उत्पन्नाचा नवा स्त्रोत निर्माण करणार...

मुंबई : एसटी विभागीतल जुनी वाहने  स्क्रॅप करून त्याचे सुटे भाग पुन्हा वापरात येणार नाहीत, अशा पद्धतीने त्यांची

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना