Food Poisoning : विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ! चंद्रपूरमध्ये १०६ जणांना अन्नातून विषबाधा

  73

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील सावली पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या पारडी जिल्हा परिषद शाळेत पहिली ते चौथ्या वर्गापर्यंत शिक्षण घेत असलेल्या १०६ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा (Food Poisoning) झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सदर विद्यार्थ्यांवर ग्रामीण रुग्णालय सावली व मुल उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, सदर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्य समिती गठित करण्यात आली आहे.



नेमके प्रकरण काय?


सावली तालुक्यातील पारडी येथील जिल्हा परीषद शाळेत विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा झाली. या शाळेत एकूण १२६ विद्यार्थ्यांना खिचडी देण्यात आली. या विद्यार्थ्यांनी खिचडी खाल्ल्यानंतर त्यातील १०६ विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या पोटामध्ये दुखणे सुरू झाल्याने, विद्यार्थ्यांनी घराकडे धाव घेतली. विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना पोटात दुखत असल्याचे व उलट्या झाल्याचे सांगितले असता पालकांनी त्यांना सावली ग्रामीण रुग्णालय येथे उपचाराकरिता दाखल केले. सदर विद्यार्थ्यांवर ग्रामीण रुग्णालय सावली व मुल उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.


दरम्यान, सदर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्य समिती गठित करण्यात आलेली असून सदर समिती आपला अहवाल लवकरच सादर करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. (Food Poisoning)

Comments
Add Comment

सिंधुदुर्ग : कार ऑन रेल सेवेने पाचपैकी चार वाहने नांदगावला उतरली

सिंधुदुर्ग : कोकण रेल्वेची पहिली कार ऑन ट्रेन कोलाड (जि. रायगड) स्थानकावरून निघाली आणि रात्री नांदगाव (जि.

आता २९ ऑगस्टला फाईट, चलो मुंबई; जरांगेंचा इशारा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर येतोय, असा इशारा मनोज जरांगे यांनी

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

गणपतीआधी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची तातडीची बैठक, भाजपचं मिशन बीएमसी सुरू

येणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी भाजपने आतापासून कंबर कसली आहे. मुंबई महापालिका निवडणूक ही राज्याच्या

साई बाबांचा प्रसाद महागला! दरवाढीमुळे जनसामान्यांमध्ये नाराजी

अहिल्यानगर: शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला दररोज लाखों भाविक शिर्डीत येतात. साईबाबांचे दर्शन घेऊन घरी

अजित पवारांच्या जिल्ह्यातच लाडकी बहीण योजनेचे सर्वाधिक बोगस लाभार्थी

राज्य सरकारची 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेचा गैरफायदा घेतलेल्या बोगस लाभार्त्यांच्या संख्येत वाढ