Food Poisoning : विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ! चंद्रपूरमध्ये १०६ जणांना अन्नातून विषबाधा

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील सावली पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या पारडी जिल्हा परिषद शाळेत पहिली ते चौथ्या वर्गापर्यंत शिक्षण घेत असलेल्या १०६ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा (Food Poisoning) झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सदर विद्यार्थ्यांवर ग्रामीण रुग्णालय सावली व मुल उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, सदर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्य समिती गठित करण्यात आली आहे.



नेमके प्रकरण काय?


सावली तालुक्यातील पारडी येथील जिल्हा परीषद शाळेत विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा झाली. या शाळेत एकूण १२६ विद्यार्थ्यांना खिचडी देण्यात आली. या विद्यार्थ्यांनी खिचडी खाल्ल्यानंतर त्यातील १०६ विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या पोटामध्ये दुखणे सुरू झाल्याने, विद्यार्थ्यांनी घराकडे धाव घेतली. विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना पोटात दुखत असल्याचे व उलट्या झाल्याचे सांगितले असता पालकांनी त्यांना सावली ग्रामीण रुग्णालय येथे उपचाराकरिता दाखल केले. सदर विद्यार्थ्यांवर ग्रामीण रुग्णालय सावली व मुल उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.


दरम्यान, सदर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्य समिती गठित करण्यात आलेली असून सदर समिती आपला अहवाल लवकरच सादर करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. (Food Poisoning)

Comments
Add Comment

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार

Rajya Sabha Election 2026: राज्यसभा निवडणुकीचा अर्ज भरायला फक्त सहा दिवस उरले, शरद पवार राज्यसभा लढवणार की नाही?

मुंबई: येत्या १६ मार्चला राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ३७ जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील

Maharashtra Village: राज्य सरकारकडून सहा ग्रामपंचायतींचा सन्मान केला जाणार; कोकणातील 'हे' गाव पहिल्या क्रमांकावर

मुंबई: गावाचा विकास हाच देशाचा विकास असं म्हटलं जातं. सध्या आपल्या देश लोकल ते ग्लोबल अशा मार्गाने काम करीत आहे.

Thane: ठाण्यात खळबळ, वेब सिरिज अभिनेत्रीच्या देहविक्रीचा व्यवसाय; पोलिसांकडून रॅकेटचा भांडाफोड

ठाणे: सिने इंडस्ट्रीत काम मिळत नसल्याकारणाने एका हिंदी वेब सिरीजमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीने पैसे

Vidarbha Railway: गोंदिया ते जबलपूर रेल्वे प्रकल्पाला केंद्र सरकारची मंजुरी

मुंबई: गोंदिया ते जबलपूर रेल्वे प्रवासाचा चेहरामोहरा बदलणार असून या मार्गाच्या दुहेरीकरणाला अखेर केंद्र