Abu Azmi : tata bye bye खतम! उबाठावर आरोप करत समाजवादीचा महाविकास आघाडीला राम राम

मुंबई : यंदा विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाला. त्यानंतर आता महाविकास आघाडीमध्ये असलेल्या मित्र पक्षाने महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. विधिमंडळाचं विशेष अधिवेशन सुरु आहे. महाविकास आघाडीला अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असणाऱ्या समाजवादी पार्टीने आघाडीची साथ सोडली आहे. शिवाजीनगर- मानखुर्द विधानसभा मतदारसंघाचे आमदार अबू आझमी यांनी ही घोषणा केली आहे. तसंच यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव का झाला? यावरही अबू आझमी यांनी खुलासा केला आहे.



अबु आझमी काय म्हणाले?


महाविकास आघाडीमध्ये एकजूट नव्हती. या निवडणुकीत कोणत्याही प्रकारचा समन्वय महाविकास आघाडीमध्ये पाहायला मिळाल नाही. कोणत्याही निवडणुकीला आघाडी म्हणून सामोरं जात असताना एकवाक्यता गरजेची आहे. कोणत्याही पक्षाचा नेता निवडणूक लढत असेल तर त्याला आपला नेता- उमेदवार समजलं गेलं पाहिजे. पण कोणत्याही प्रकारचा समन्वय नव्हता, असं अबु आझमी म्हणालेत.


यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी पराभूत का झाली? यावर भाष्य करताना आझमी म्हणाले, महाविकास आघाडीचे नेते एकमेकांच्या उमेदवारांच्या मंचावर प्रचारासाठी दिसले नाहीत. खूप कमी वेळा हे चित्र पाहायला मिळालं. जागा वाटपावेळीसुद्धा आघाडीत रस्सीखेच पाहायला मिळाली. याचमुळे महाविकास आघाडीचा पराभव झाला, असं अबू आझमी यांनी सांगितलं.


शिवसेनेच्या आणि विशेष करून उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवर अबू आझमी यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. विधानसभेची निवडणूक हरल्यानंतर त्यांनी असं म्हटलं की आमचा हिंदुत्वाचा मुद्दा कायम असेल. उद्धव ठाकरे यांनी सर्व धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालण्याचा विचार मांडला नाही. त्यामुळे आमचा त्या भूमिकेला विरोध आहे. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ठरवायचं की त्यांना शिवसेनेसोबत राहायचं की नाही, असं अबू आझमी म्हणाले आहेत.



अबु आझमी यांनी घेतली आमदारकीची शपथ


महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणुकीतील निकालावर संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नवनिर्वाचित आमदारांनी आमदारकीची शपथ घेतली नाही. पण अबू आझमी यांनी मात्र विधानसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत आता फाटाफूट झाली आहे. अबू आझमी आणि भिवंडी पूर्व मतदारसंघाचे आमदार रईस शेख हे महाविकास आघाडीतून बाहेर पडल्याने महाविकास आघाडीचं संख्याबळ २ ने कमी झालं आहे.


Comments
Add Comment

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आता कर्करोग उपचार केंद्र! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना

मुंबई: सध्या कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले असून, यामुळे दरवर्षी अनेक लोकं मृत्युमुखी पडत असल्याच्या घटना वाढत

साठवून ठेवलेला कांदा खराब होत असल्याने शेतकरी चिंतेत

धुळे : धुळे तालुक्यातील नगाव येथील शेतकरी दिनेश पाटील यांनी साधारण २० ते २५ क्विंटल कांदा हा उकिरड्यावर फेकला

रामटेक चित्रनगरीसाठी ६० एकर जमिनीचे येत्या १५ दिवसात हस्तांतरण : ॲड आशिष शेलार

रामटेक चित्रनगरी व संरक्षित स्मारक संवर्धनातून विकास व वारसा जपण्यात येईल : वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड.आशिष

Pune Crime News : नोटीस फाडली, पोलिसांवर कुत्र्यांचा हल्ला, वादग्रस्त IAS अधिकारी खेडकर कुटुंबाचा खतरनाक खेळ उघडकीस

पुणे : बडतर्फ प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या घरावर पुन्हा एकदा पोलिसांनी नोटीस लावली आहे.

राज्यात टीईटी परीक्षा २३ नोव्हेंबरला

पुणे : इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गात अध्यापनासाठी अनिवार्य असलेली शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात घुमणार डरकाळी

 ताडोबा आणि पेंचमधून आठ वाघांचे टप्प्याटप्प्याने स्थलांतर सातारा : देशातील प्रमुख पाच व्याघ्र अभयारण्यांपैकी