Mumbai News : लालबागमध्ये निसर्गावर आधारित विवेकानंद व्याख्यानमालेचे आयोजन!

निसर्ग अभ्यासकांचे निसर्गाकडून सर्वांनी महानता घेण्याचे आवाहन


मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थी उत्कर्ष मंडळातर्फे नाते जोडू निसर्गाशी (Environment) या संकल्पनेवर आधारित व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. यंदाही लालबागमध्ये निसर्गावर आधारित विवेकानंद व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. ६७वी विवेकानंद व्याख्यानमाला यावर्षी मंगळवार (ता. २६) ते शनिवार (ता. ३०) या कालावधीत लालबाग येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण (गरमखाडा) येथे दररोज रात्री साडेआठ वाजता आयोजित केली आहे.



यावर्षी 'नाते जोडू निसर्गाशी' या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित निरनिराळ्या रंजक आणि माहितीपूर्ण विषयावर तज्ज्ञ मंडळी मार्गदर्शन करणार आहेत. याबाबत माहिती देताना, 'निसर्गाकडून महानता घेण्याची आवश्यकता असून तो कोणालाही शिक्षा करीत नाही परंतु त्याच्या विरुद्ध वागल्यास त्याचे परिणाम दिसतात' असे निसर्ग अभ्यासक किरण पुरंदरे यांनी म्हटले.



कचऱ्याचे वर्गीकरण करणे महत्त्वाचे


शून्य कचरा व्यवस्थापन या विषयावर बोलताना निसर्गप्रेमी कौस्तुभ ताम्हनकर म्हणाले की, कचऱ्याचे वर्गीकरण करायला हवे आणि त्याचप्रमाणे सर्वांनी ते आचरणात आणणे आवश्यक आहे तरच शून्य कचरा व्यवस्थापन ही संकल्पना यशस्वी होईल.



मुंग्यांच्या १५ हजाराहून अधिक जाती अस्तित्वात


आतापर्यंत सर्वांना लाल, काळ्या, चावणाऱ्या, कामकरी मुंग्या माहित आहेत. परंतु मुंग्यांच्या १५ हजाराहून अधिक जाती असून त्यांना शास्त्रीय नावे असून मुंग्या या एकमेकांना सहकार्य करून परिस्थिती जुळवून घेऊन काम करतात येणाऱ्या परिस्थितीवर मात करून पुढे वाटचाल करतात असे नूतन कर्णिक यांनी सांगितले.

Comments
Add Comment

ठाणे ते बोरिवली प्रवास होणार अवघ्या १५ मिनिटांत; दुहेरी बोगदा प्रकल्पाचे काम वेगात

मुंबई : देशातील सर्वात मोठा आणि सर्वात लांब शहरी बोगदा रस्ते मार्ग म्हणजे ठाणे ते बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प

वडाळा ते कासारवडवली मेट्रो ४ मार्गिकेच्या कामाला वेग; भांडुप जंक्शनवर एका रात्रीत ४५० टन वजनाचा बसवला स्टील स्पॅन

मुंबई : केवळ एका रात्रीत मुंबईत महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) अभियंता पथकाने भांडुप ते सोनापूर

घाटकोपर-वर्सोवा मेट्रो होणार सहा डब्यांची; प्रवाशांची होणार गर्दीतून सुटका

३२ अतिरिक्त डबे खरेदीसाठी निविदा काढण्याची तयारी सुरू मुंबई : मुंबईकरांचा मेट्रो प्रवास आता लवकरच गर्दीमुक्त

आमरण उपोषण मागे; जैन मुनींच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी सरकारला १५ दिवसांची मुदत

दादर कबुतरखाना पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी निलेशचंद्र विजय यांचा निर्वाणीचा इशारा; लोढा-नार्वेकरांची

ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचे निधन

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील खलनायिका म्हणून अविस्मरणीय छाप पाडणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचे

Coastal Road : २४ तास खुला, पण 'सुरक्षित' नाही! वरळी-वांद्रे सी लिंक दरम्यान पथदिवे बंद; मुंबईकर प्रशासनावर नाराज

मुंबई : मुंबईतील कोस्टल रोड (Coastal Road) वाहतुकीसाठी २४ तास खुला (24 Hours Open) झाल्यानंतर त्यावर वाहनांची वर्दळ मोठ्या