मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थी उत्कर्ष मंडळातर्फे नाते जोडू निसर्गाशी (Environment) या संकल्पनेवर आधारित व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. यंदाही लालबागमध्ये निसर्गावर आधारित विवेकानंद व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. ६७वी विवेकानंद व्याख्यानमाला यावर्षी मंगळवार (ता. २६) ते शनिवार (ता. ३०) या कालावधीत लालबाग येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण (गरमखाडा) येथे दररोज रात्री साडेआठ वाजता आयोजित केली आहे.
यावर्षी ‘नाते जोडू निसर्गाशी’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित निरनिराळ्या रंजक आणि माहितीपूर्ण विषयावर तज्ज्ञ मंडळी मार्गदर्शन करणार आहेत. याबाबत माहिती देताना, ‘निसर्गाकडून महानता घेण्याची आवश्यकता असून तो कोणालाही शिक्षा करीत नाही परंतु त्याच्या विरुद्ध वागल्यास त्याचे परिणाम दिसतात’ असे निसर्ग अभ्यासक किरण पुरंदरे यांनी म्हटले.
शून्य कचरा व्यवस्थापन या विषयावर बोलताना निसर्गप्रेमी कौस्तुभ ताम्हनकर म्हणाले की, कचऱ्याचे वर्गीकरण करायला हवे आणि त्याचप्रमाणे सर्वांनी ते आचरणात आणणे आवश्यक आहे तरच शून्य कचरा व्यवस्थापन ही संकल्पना यशस्वी होईल.
आतापर्यंत सर्वांना लाल, काळ्या, चावणाऱ्या, कामकरी मुंग्या माहित आहेत. परंतु मुंग्यांच्या १५ हजाराहून अधिक जाती असून त्यांना शास्त्रीय नावे असून मुंग्या या एकमेकांना सहकार्य करून परिस्थिती जुळवून घेऊन काम करतात येणाऱ्या परिस्थितीवर मात करून पुढे वाटचाल करतात असे नूतन कर्णिक यांनी सांगितले.
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…