Pandharpur : पंढरपूर विठ्ठल मंदिर परिसरात काॅरिडाॅर तयार करण्याच्या पुन्हा हालचाली

सोलापूर : देशभरातून लाखोंच्या संख्येने विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी पंढरपुरातील विठ्ठल मंदिर परिसरात काॅरिडाॅर तयार करण्याच्या पुन्हा हालचाली सुरु झाल्या आहेत. केंद्रीय अर्थमंत्री व भाजप नेत्या निर्मला सीतारामन यांनी विधीमंडळ गटनेता निवडीप्रसंगी तसे सुतोवाचही केले आहे. त्यामुळे मंदिर परिसरात काॅरिडाॅर तयार करण्याच्या हाचचाली वेगाने सुरु केल्या आहेत.




राज्यात महायुतीचे सरकार बहुमताने आल्यानंतर आता अनेक वर्षापासूनची वारकऱ्यांची काॅरिडाॅरची मागणी या निमित्ताने पूर्ण होणार आहे. राज्य सरकारच्या या भूमिकेचे वारकरी संप्रदायामधून स्वागत ही केले जात आहे. आषाढी, कार्तिकीला पंढरपुरात मोठी यात्रा भरते, यावेळी लाखो भाविकांची मंदिर परिसरात गर्दी होते. अन्य वेळीही दर्शनासाठी आलेल्या भाविकांची गर्दी असते. विठ्ठल दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना चांगल्या सोयीसुविधा मिळाव्यात, विनात्रास विठ्ठलाचे दर्शन घेता यावे, विठ्ठल मंदिर परिसरात होणाऱ्या गर्दी नियंत्रित करता यावी यासाठी राज्य सरकारने मंदिर परिसरात काॅरिडाॅर तयार करण्याचा आराखडा तयार केला आहे, मध्यंतरी यावरती काम देखील सुरु झाले होते. परंतु, स्थानिक दुकानदारांनी याला विरोध केला आहे. त्यानंतर काॅरिडाॅरची चर्चा थांबली होती.

Comments
Add Comment

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी

कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या