Jasprit Bumrah : बर्थडे बॉय बुमराहची कमाल, एक विकेट घेताच रचला इतिहास

  79

मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा दुसरा सामना आजपासून अॅडलेडच्या मैदानावर सुरू झाला आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माने पिंक बॉल कसोटीत टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला.


या सामन्यात भारतीय संघाचा पहिला डाव केवळ १८० धावांवर आटोपला. नितीश रेड्डी ४२ धावांसह टॉप स्कोरर राहिला. तर मिचेल स्टार्क ऑस्ट्रेलियाकडून सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ६ विकेट मिळवल्या. २ स्कॉट बोलँड आणि कर्णधार पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी २ विकेट मिळवल्या.


ऑस्ट्रेलियाचा संघ जेव्हा दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात फलंदाजीसाठी उतरला तेव्हा जसप्रीत बुमराहने उस्मान ख्वाजाला १३ धावांवर बाद केले. बुमराहची या वर्षातील ५०वी विकेट आहे. या वर्षात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंपैकी तो एक आहे. बुमराहशिविय इतर कोणत्याही गोलंदाजाने या वर्षी ५० कसोटी विकेट घेत हा इतिहास रचलेला नाही.


खास बाब म्हणजे आज जसप्रीत बुमराहचा(Jasprit Bumrah )वाढदिवस आहे. तो ३१ वर्षांचा झाला आहे.तसेच तो एका स्पेशल क्लबमध्येही सामील झाला आहे. कपिल देव आणि झहीर खान यात आहेत. बुमराह वगळता झहीर खानने २००२मध्ये ५१ कसोटी विकेट घेतल्या होत्या.

Comments
Add Comment

French Open 2025 जिंकण्याचे जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले, उपांत्य फेरीत पराभव

पॅरिस : फ्रेंच ओपन २०२५ टेनिस स्पर्धा जिंकण्याचे सर्बियाच्या नोवाक जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले. टेनिसच्या

Shubhman Gill : १८ वर्षानंतर शुभमन गिल रचणार इंग्लंडमध्ये इतिहास?

नवी दिल्ली : टीम इंडियाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिलला इंग्लंड दौऱ्यामध्ये मोठ्या अग्निपरीक्षेला सामोर जावे

Bangalore Stampede : चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहलीवरही गुन्हा दाखल

बंगळुरू: बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयी परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात स्टार

फिरकी गोलंदाज पियुष चावलाची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज पियुष चावलाने क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे.

गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना

मुंबई : रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना

ENG vs IND: जर गर्दीवर नियंत्रण ठेवता येत नसेल तर..., बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कोच गंभीरची प्रतिक्रिया

मुंबई: आयपीएल २०२५ संपल्यानंतर टीम इंडिया २० जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होत असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी