Jasprit Bumrah : बर्थडे बॉय बुमराहची कमाल, एक विकेट घेताच रचला इतिहास

  102

मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा दुसरा सामना आजपासून अॅडलेडच्या मैदानावर सुरू झाला आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माने पिंक बॉल कसोटीत टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला.


या सामन्यात भारतीय संघाचा पहिला डाव केवळ १८० धावांवर आटोपला. नितीश रेड्डी ४२ धावांसह टॉप स्कोरर राहिला. तर मिचेल स्टार्क ऑस्ट्रेलियाकडून सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ६ विकेट मिळवल्या. २ स्कॉट बोलँड आणि कर्णधार पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी २ विकेट मिळवल्या.


ऑस्ट्रेलियाचा संघ जेव्हा दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात फलंदाजीसाठी उतरला तेव्हा जसप्रीत बुमराहने उस्मान ख्वाजाला १३ धावांवर बाद केले. बुमराहची या वर्षातील ५०वी विकेट आहे. या वर्षात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंपैकी तो एक आहे. बुमराहशिविय इतर कोणत्याही गोलंदाजाने या वर्षी ५० कसोटी विकेट घेत हा इतिहास रचलेला नाही.


खास बाब म्हणजे आज जसप्रीत बुमराहचा(Jasprit Bumrah )वाढदिवस आहे. तो ३१ वर्षांचा झाला आहे.तसेच तो एका स्पेशल क्लबमध्येही सामील झाला आहे. कपिल देव आणि झहीर खान यात आहेत. बुमराह वगळता झहीर खानने २००२मध्ये ५१ कसोटी विकेट घेतल्या होत्या.

Comments
Add Comment

मोहम्मद सिराज आयसीसी क्रमवारीत १५ व्या स्थानावर

इंग्लंड मालिकेमुळे सिराजची १२ स्थानाची झेप नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल येथील पाचव्या आणि शेवटच्या

आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा लवकरच, गिल, जायसवाल आणि सुदर्शनला संधी मिळण्याची शक्यता

मुंबई : बीसीसीआय ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात आशिया कप २०२५ साठी भारतीय संघाची घोषणा करण्याची शक्यता आहे. यशस्वी

भारतात परतल्यावर मोहम्मद सिराजचे भव्य स्वागत

हैदराबाद : इंग्लंडमधील जबरदस्त प्रदर्शनानंतर स्टार गोलंदाज मोहम्मद सिराज बुधवार(दि.६) रोजी हैदराबादमध्ये परतले

भारत, विंडीज-आफ्रिकेसोबत कसोटी मालिका खेळणार

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार सामने नवी दिल्ली : भारताने इंग्लंडसोबत पाच कसोटी सामन्यांची मालिका बरोबरीत

नोवाक जोकोविचची ‘सिनसिनाटी ओपन’मधून माघार

नवी दिल्ली : ग्रँडस्लॅम विजेता नोवाक जोकोविचला आगामी यूएस ओपनपूर्वी आणखी एक धक्का बसला आहे. त्याने सिनसिनाटी

Team india: इंग्लंड मालिका संपली, आता पुढे टीम इंडियाचे असणार हे वेळापत्रक

मुंबई: इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ २०२५ च्या उर्वरित वर्षासाठी सज्ज झाला