माध्यमांचे लक्ष वेधण्यासाठी राहुल यांचा संभल दौरा, भाजपची टीका

नवी दिल्ली : राहुल गांधींचा संभल दौरा म्हणजे केवळ माध्यमांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न असल्याची टीका भाजपने केली आहे. दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत भाजप प्रवक्ता डॉ. सुधांशू त्रिवेदी यांनी ही टीका केलीय.

राहुल गांधी आणि प्रियंका वाड्रा यांनी बुधवारी हिंसाचारग्रस्त संभल शहराला भेट देण्याची योजना आखली होती. नियोजीत कार्यक्रमानुसार राहुल गांधी आणि प्रियंका वाड्रा सकाळी 10.15 वाजता दिल्लीहून निघाले. हे लोक दुपारी 1 वाजेपर्यंत संभल येथे पोहचण्याची शक्यता होती. त्यांच्यासोबत उत्तरप्रदेशातील काँग्रेस खासदारांचा एक गट देखील होता. राहुल गांधी आणि प्रियंका वाड्रा यांना दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस-वेवरच्या गाझीपूर सीमेवर रोखण्यात आले. त्यांना संभलला जाण्यासाठी मनाई करण्यात आली. त्यामुळे राहुल आणि प्रियंका यांना परत यावे लागले.

त्यानंतर दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत सुधांशू त्रिवेदी म्हणाले की, राहुल गांधींचा संभल दौरा केवळ दिखावा आहे. काँग्रेस आपल्या राजकीय नाईलाजामुळे असे करत असल्याचा दावा त्रिवेदी यांनी केला. तसेच संसदेत विरोधक एकत्र नाहीत. हिवाळी अधिवेशनात विरोधकांमध्ये एकमत नाही. अधिवेशनात इंडी आघाडी तुटली असून यासाठी काँग्रेस जबाबदार आहे, असाही आरोप त्रिवेदींनी केला.

Comments
Add Comment

Delhi Earthquake : ‘दिल्ली-एनसीआर’सह उत्तर भारतात ५.९ तीव्रतेचा भूकंप

- भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तान - तजाकिस्तान सीमेवर दिल्ली-एनसीआर आणि संपूर्ण उत्तर भारतात शुक्रवारी (३ एप्रिल)

आयएनएस ‘अरिदमन’ आणि ‘तारगिरी’ नौदलात दाखल

विशाखापट्टणम : आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणम येथे आयोजित नेत्रदीपक सोहळ्यात स्वदेशी बनावटीची आयएनएस अरिदमन ही

West Bengal : पश्चिम बंगाल : मालदा हिंसाचाराच्या सूत्रधाराला अटक

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील कालियाचक इथल्या हिंसाचाराचा सूत्रधार आणि एआयएमआयएम नेते

जन विश्वास विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर; वाहतूक कोंडी, ड्रायव्हिंग लायसन्सच्या नूतनीकरणात होणारा विलंब हे आता गुन्हे नाहीत

नवी दिल्ली : संसदेच्या दोन्ही सभागृहांनी जन विश्वास विधेयकाला मंजुरी दिली. राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली की

संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते विशाखापट्टणममध्ये अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीचे आणि स्टेल्थ फ्रिगेटचे जलावतरण

विशाखापट्टणम : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज (शुक्रवार ३ एप्रिल २०२६) विशाखापट्टणममध्ये

PM Kisan Yojana 23rd Instalment: पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता 'या' महिन्यात मिळण्याची शक्यता

मुंबई: भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे लाखो लोक शेती करतात. त्यांच्यापैकी अनेकांना शेतीतून फारसे उत्पन्न