Devendra Fadanvis : मोठी बातमी ! शपथविधीआधी फडणवीसांचा शरद पवारांना फोन

बारामती : महायुती सरकारचा शपथविधी सोहळा आज पार पडणार आहे. राज्यात जोरदार राजकारण रंगले आहे. विधानसभा निवडणूकीचा निकाल पूर्णपणे महायुतीच्या बाजूने लागला. यानंतर अखेर १२ दिवसांनंतर महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. आज सायंकाळी आझाद मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. त्याचबरोबर भाजपचे पक्षश्रेष्ठी देखील सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रातील राजकीय संस्कृतीप्रमाणे विरोधातील नेत्यांना देखील शपथविधीचे आमंत्रण देण्यात आले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना फोन केला आहे. संसदेचं अधिवेशन सुरू असल्यामुळे शरद पवार शपथविधीला उपस्थित राहणार नसल्याचं शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना कळवलं. विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे.




उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण


आज महायुतीचा शपथविधी सोहळा दिमाखात पार पडणार आहे. यासाठी जय्यत तयारी सुरु असून ३ नेते शपथ घेणार आहेत. यामध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्याचबरोबर एकनाथ शिंदे हे देखील उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची चर्चा आहे. आता फक्त या ३ नेत्यांचा शपथविधी होणार आहे. राजशिष्टाचारनुसार, या सोहळ्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांना देखील आमंत्रण देण्यात आले आहे. यामध्ये ठाकरे गटाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यसभा खासदार व माजी मुख्यमंत्री शरद पवार आणि मनसे नेते राज ठाकरे व वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना आमंत्रण देण्यात आले आहे.



महायुतीच्या शपथविधी सोहळ्याचे जेष्ठ नेते शरद पवार यांना आमंत्रण देण्यात आले आहे. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी सोहळ्यापूर्वी फोन देखील केला आहे. फडणवीसांनी आमंत्रणासाठी शरद पवारांना फोन केला होता. मात्र शरद पवार व सुप्रिया सुळे हे शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचं समोर आले आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे हे देखील सोहळ्याला जाणार नसल्याचं समोर आलं आहे. त्याचबरोबर राज ठाकरे यांनी शपथविधी सोहळ्याला वैयक्तिक कारणांमुळे उपस्थित राहू शकत नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता महायुतीच्या नेत्याव्यतिरिक्त कोणते नेते उपस्थित राहणार याची सर्वांनाचं उत्सुकता लागली आहे.

Comments
Add Comment

‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार'मुळे भागली ११ हजार गावांची तहान

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना; ७७ लाख टँकर क्षमतेचा पाणीसाठा पुनर्संचयित, ७.७३ कोटी घनमीटर गाळ

अभ्यास न झाल्याने विद्यार्थाने चोरली प्रश्नपत्रिका, थेट...

मुंबई: राज्यात दहावी- बारावी बोर्ड परिक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरु असल्याचे समोर येत आहे. एकीकडे

Gudi Padwa 2026 : नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी दिल्या गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षा निमित्त राज्यातील

भविष्य सांगता सांगता जमवली अवाढव्य संपत्ती, अशोक खरातचं साम्राज्य कुठे आणि किती?

अहिल्यानगर: महिलांचे शोषण करणाऱ्या आणि स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्या

Gudi Padwa 2026 Muhurat: गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे?, जाणून घ्या मुहूर्त, पूजा आणि विधी

मुंबई: हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला अतिशय महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस चैत्र शुद्ध

महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..!, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

मुंबई: 'महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..' या आकांक्षेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी