Shivshahi : शिवशाही बस यापुढेही सुरूच राहणार

मुंबई : एस टी महामंडळ दाखल झालेल्या वातानुकूलित शिवशाही (Shivshahi) बस सुविधांपेक्षा अपघातांमुळे जास्त चर्चेत राहिली आहेत. साडेसहा वर्षांपूर्वी महामंडळाच्या तापत झालेल्या शिवशाहीचे अपघातांचे सत्र थांबलेले नाही मात्र सध्या शिवशाही बसची संख्या ही ७९२ असून त्या बंद करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे आज एसटी महामंडळाने स्पष्ट केले .


एस टी महामंडळाने जून२०१७ मध्ये शिवशाही या वातानुकूलित बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल केल्या होत्या यात स्वमालकीच्या व भाडेतत्त्वावरील बसचा समावेश होता मात्र शिवशाही बसचे अपघातांचे प्रमाण पाहता व त्या बस गाड्यांची सध्याची अवस्था पाहता या बस गाड्या बंद करण्यासंबंधी चर्चा सुरू होत्या. मात्र सध्या एकूण ७९२ शिवशाही बसेस एसटीकडे असून सध्या ४५० बस सेवेत आहेत . त्या बसगाड्यांमध्ये कोणताही तांत्रिक दोष नसल्याने सध्या शिवशाही बस बंद करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे आज एसटी महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले .



एसटी महामंडळाने राबवलेल्या विविध उपायोजनांमुळे शिवशाहीच्या अपघातांचे प्रमाण काही प्रमाणात घटले असले तरी त्याला अजूनही पूर्णपणे आळा बसलेला नाही काही दोन दिवसापूर्वीच वर्धा येथे शिवशाही बस उलटून १४ जण मृत्यूमुखी पडले होते त्यामुळे एस टी महामंडळातील शिवशाही बस आता कायमस्वरूपी बंद होणार व त्याचे साध्या बस मध्ये रूपांतर होणार ही चर्चा होती मात्र एसटी महामंडळांने पूर्णपणे फेटाळून लावली असून या बस यापुढेही प्रवाशांसाठी सुरु राहतील असे स्पष्ट केले .

Comments
Add Comment

OBC Reservation: ओबीसी आरक्षण बचावासाठी बीडमध्ये दुसरी आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर: ओबीसी समाजाच्या आरक्षणामधली घुसखोरी थांबविली पाहीजे या साठी बीड मध्ये दुसरी आत्महत्या

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर ‘पानिपत’कार विश्वास पाटलांची निवड

पुणे: साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘पानिपत’कार

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी

कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये