Shivshahi Bus : आता शिवशाही बसचा प्रवास कायमचा थांबणार!

एसटी महामंडळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत


मुंबई : लालपरीप्रमाणे शिवशाही, शिवनेरी, एसी बस यासारख्या अनेक बसचा प्रवास सर्वसामान्यांसाठी सोयीचा असतो. परंतु याच प्रवासाबद्दल एसटी महामंडळ मोठा निर्णय घेणार आहे. लालपरीनंतर प्रवाशांच्या सेवेत दाखल झालेली शिवशाहीचा (Shivshahi Bus) प्रवास कायमचा थांबणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, एसटी बसचे वाढत्या अपघाताचे प्रकरण पाहता राज्य परिवहन महामंडळ (MSRTC) शिवशाही बसची सेवा थांबविण्याच्या तयारीत आहे. नुकतेच शिवशाही बसचे गोंदियामध्ये भीषण अपघात झाला. यामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला असून याआधीही शिवशाही बसचे अनेक अपघात झाले होते. शिवशाही बसचे होणारे अपघात पाहता त्यात तांत्रिक दोष असल्याचे समोर आले आहे.


दरम्यान, अपघाताचे वारंवार तक्रारी वाढल्याने एसटी प्रशासनाच्या वाहतूक विभागाने शिवशाहीला सेवेतून काढून टाकण्याचा प्रस्ताव दिला. त्यामुळे येत्या काही महिन्यातच शिवशाहीचा प्रवास संपणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.



शिवशाहीचे लालपरीत रुपांतर


सध्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात एकूण ८९२ शिवशाही बस आहेत. त्यापैकी ५०० बस धावत असून उर्वरित ३९२ बस कार्यशाळेत विविध कारणांसाठी दाखल झाल्या आहेत. शिवशाही बस या एसी बस होत्या. मात्र आता त्याचे लालपरीत रुपांतर करण्यासाठी वातानुकूलित यंत्रणा काढण्यात येणार असून काही आवश्यक बदल केले जाणार आहेत. शिवशाहीचे रूपांतर साध्या बसमध्ये केले जाणार आहे.

Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे