मुंबई : लालपरीप्रमाणे शिवशाही, शिवनेरी, एसी बस यासारख्या अनेक बसचा प्रवास सर्वसामान्यांसाठी सोयीचा असतो. परंतु याच प्रवासाबद्दल एसटी महामंडळ मोठा निर्णय घेणार आहे. लालपरीनंतर प्रवाशांच्या सेवेत दाखल झालेली शिवशाहीचा (Shivshahi Bus) प्रवास कायमचा थांबणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एसटी बसचे वाढत्या अपघाताचे प्रकरण पाहता राज्य परिवहन महामंडळ (MSRTC) शिवशाही बसची सेवा थांबविण्याच्या तयारीत आहे. नुकतेच शिवशाही बसचे गोंदियामध्ये भीषण अपघात झाला. यामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला असून याआधीही शिवशाही बसचे अनेक अपघात झाले होते. शिवशाही बसचे होणारे अपघात पाहता त्यात तांत्रिक दोष असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, अपघाताचे वारंवार तक्रारी वाढल्याने एसटी प्रशासनाच्या वाहतूक विभागाने शिवशाहीला सेवेतून काढून टाकण्याचा प्रस्ताव दिला. त्यामुळे येत्या काही महिन्यातच शिवशाहीचा प्रवास संपणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सध्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात एकूण ८९२ शिवशाही बस आहेत. त्यापैकी ५०० बस धावत असून उर्वरित ३९२ बस कार्यशाळेत विविध कारणांसाठी दाखल झाल्या आहेत. शिवशाही बस या एसी बस होत्या. मात्र आता त्याचे लालपरीत रुपांतर करण्यासाठी वातानुकूलित यंत्रणा काढण्यात येणार असून काही आवश्यक बदल केले जाणार आहेत. शिवशाहीचे रूपांतर साध्या बसमध्ये केले जाणार आहे.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…