Ind vs Aus : जसप्रीत बुमराहला कसोटीत मोठा इतिहास रचण्याची संधी

मुंबई: पर्थच्या मैदानावर झालेल्या बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियानं शानदार विजय मिळवला. आता ॲडलेड येथे ६ डिसेंबरपासून दुसऱ्या कसोटीला सुरुवात होणार आहे. ही कसोटी गुलाबी चेंडूने खेळली जाईल. या सामन्यात भारतीय संघाला २०२० च्या पिंक बॉल कसोटीतील पराभवाचा बदला घेण्याची संधी असेल.

या सामन्यात टीम इंडियाचा उपकर्णधार आणि स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहकडे(jasprit bumrah) मोठा इतिहास रचण्याची संधी आहे. जसप्रीत बुमराहनं २०२४ मध्ये आतापर्यंत १० कसोटी सामने खेळले, ज्याच्या २० डावात गोलंदाजी करताना त्यानं ४९ बळी घेतले आहेत. या दरम्यान त्याची सरासरी १५.२४ आणि स्ट्राईक रेट ३० एवढा राहिला. जसप्रीत बुमराह ५० कसोटी विकेटपासून फक्त एक पाऊल दूर आहे. त्यानं यावर्षी कसोटीमध्ये ४९ विकेट घेतल्या आहे. दुसऱ्या सामन्यात बुमराहनं एक विकेट घेताच तो २०२४ मध्ये ५० कसोटी विकेट घेणारा जगातील पहिला गोलंदाज बनेल. या लिस्टमध्ये भारताचा रविचंद्रन अश्विन दुसऱ्या क्रमांकावर असून त्यानं २०२४ मध्ये ४६ कसोटी विकेट घेतल्या आहेत.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २०२०-२१ दौऱ्यात झालेल्या पिंक बॉल कसोटीत भारतीय संघाचा दारुण पराभव झाला होता. या कसोटीच्या पहिल्या डावात टीम इंडिया अवघ्या ३६ धावांवर ऑलआऊट झाली होती, जो भारताचा कसोटी क्रिकेटमधील सर्वात कमी स्कोर आहे. त्यामुळे आता ॲडलेड येथे खेळल्या जाणाऱ्या कसोटीत भारताला पराभवाचा बदला घेण्याची संधी मिळणार आहे.

Comments
Add Comment

बांगलादेशने अफगाणिस्तानला हरवून टी-२० मालिका जिंकली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशने दुसऱ्या टी-२० सामन्यात अफगाणिस्तानचा दोन विकेट्सने पराभव करून तीन

महिला विश्वचषक : पावसामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका सामना रद्द

कोलंबो (वृत्तसंस्था): शनिवारी कोलंबो येथे श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला विश्वचषक सामना रद्द करावा

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी गिलकडे नेतृत्व; रोहित शर्माचा खेळाडू म्हणून संघात सहभाग

वनडे आणि टेस्टसाठी शुभमन गिल तर टी २० साठी सूर्यकुमार यादव करणार भारताचे नेतृत्व मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक

IND vs WI: तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडिजचा खेळ खल्लास, भारताचा एक डाव आणि १४० धावांनी विजय

अहमदाबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीचा निर्णय तिसऱ्याच दिवशी लागला.

IND vs WI: भारताने ४४८वर पहिला डाव केला घोषित, २८६ धावांची घेतली आघाडी

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला तिसऱ्या दिवशी नाट्यमय

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ध्रुव जुरेलचं पहिलं शतक! 'गन सॅल्यूट' करत केले सेलिब्रेशन

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा युवा यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव