Ind vs Aus : जसप्रीत बुमराहला कसोटीत मोठा इतिहास रचण्याची संधी

मुंबई: पर्थच्या मैदानावर झालेल्या बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियानं शानदार विजय मिळवला. आता ॲडलेड येथे ६ डिसेंबरपासून दुसऱ्या कसोटीला सुरुवात होणार आहे. ही कसोटी गुलाबी चेंडूने खेळली जाईल. या सामन्यात भारतीय संघाला २०२० च्या पिंक बॉल कसोटीतील पराभवाचा बदला घेण्याची संधी असेल.

या सामन्यात टीम इंडियाचा उपकर्णधार आणि स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहकडे(jasprit bumrah) मोठा इतिहास रचण्याची संधी आहे. जसप्रीत बुमराहनं २०२४ मध्ये आतापर्यंत १० कसोटी सामने खेळले, ज्याच्या २० डावात गोलंदाजी करताना त्यानं ४९ बळी घेतले आहेत. या दरम्यान त्याची सरासरी १५.२४ आणि स्ट्राईक रेट ३० एवढा राहिला. जसप्रीत बुमराह ५० कसोटी विकेटपासून फक्त एक पाऊल दूर आहे. त्यानं यावर्षी कसोटीमध्ये ४९ विकेट घेतल्या आहे. दुसऱ्या सामन्यात बुमराहनं एक विकेट घेताच तो २०२४ मध्ये ५० कसोटी विकेट घेणारा जगातील पहिला गोलंदाज बनेल. या लिस्टमध्ये भारताचा रविचंद्रन अश्विन दुसऱ्या क्रमांकावर असून त्यानं २०२४ मध्ये ४६ कसोटी विकेट घेतल्या आहेत.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २०२०-२१ दौऱ्यात झालेल्या पिंक बॉल कसोटीत भारतीय संघाचा दारुण पराभव झाला होता. या कसोटीच्या पहिल्या डावात टीम इंडिया अवघ्या ३६ धावांवर ऑलआऊट झाली होती, जो भारताचा कसोटी क्रिकेटमधील सर्वात कमी स्कोर आहे. त्यामुळे आता ॲडलेड येथे खेळल्या जाणाऱ्या कसोटीत भारताला पराभवाचा बदला घेण्याची संधी मिळणार आहे.

Comments
Add Comment

हरमनप्रीत कौर आणि तो ऐतिहासिक विक्रम: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी 'त्या' १७१ धावांची चर्चा!

नवी दिल्ली : आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या

WC Semi-Final: पहिल्यांदाच वनडे वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहोचली दक्षिण आफ्रिका, इंग्लंडला १२५ धावांनी हरवले

मुंबई : आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकप २०२५ मध्ये मोठा उलटफेर झाला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला टी२० सामना पावसामुळे रद्द : दुसरा सामना ३१ ऑक्टोबरला!

ऑस्ट्रेलिया : मनुका ओव्हल मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जाणारा पहिला टी२० सामना अखेर सततच्या

टी२० मध्ये पुन्हा पावसाचे विघ्न: २० ऐवजी १८ षटकांचा सामना !

कॅनबेरा : कॅनबेरातील मनुका ओव्हल स्टेडियमवर सुरू असलेल्या भारत–ऑस्ट्रेलिया पहिल्या टी२० सामन्यात पुन्हा एकदा

भारताला मोठा धक्का: दुखापतीमुळे नितीश कुमार रेड्डी तीन T20 सामन्यांमधून बाहेर!

कॅनबेरा : भारतीय क्रिकेट संघासाठी धोक्याची घंटा वाजवणारी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने बुधवारी दिलेल्या

७ महिन्यांच्या गर्भवती सोनिकाने जिंकले वेटलिफ्टिंग स्पर्धेत कांस्य पदक

दिल्ली : आयुष्यात काहीही अशक्य नाही, फक्त जिद्द असायला हवी. दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल सोनिका यादव यांनी हे खरे