Ind vs Aus : जसप्रीत बुमराहला कसोटीत मोठा इतिहास रचण्याची संधी

मुंबई: पर्थच्या मैदानावर झालेल्या बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियानं शानदार विजय मिळवला. आता ॲडलेड येथे ६ डिसेंबरपासून दुसऱ्या कसोटीला सुरुवात होणार आहे. ही कसोटी गुलाबी चेंडूने खेळली जाईल. या सामन्यात भारतीय संघाला २०२० च्या पिंक बॉल कसोटीतील पराभवाचा बदला घेण्याची संधी असेल.

या सामन्यात टीम इंडियाचा उपकर्णधार आणि स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहकडे(jasprit bumrah) मोठा इतिहास रचण्याची संधी आहे. जसप्रीत बुमराहनं २०२४ मध्ये आतापर्यंत १० कसोटी सामने खेळले, ज्याच्या २० डावात गोलंदाजी करताना त्यानं ४९ बळी घेतले आहेत. या दरम्यान त्याची सरासरी १५.२४ आणि स्ट्राईक रेट ३० एवढा राहिला. जसप्रीत बुमराह ५० कसोटी विकेटपासून फक्त एक पाऊल दूर आहे. त्यानं यावर्षी कसोटीमध्ये ४९ विकेट घेतल्या आहे. दुसऱ्या सामन्यात बुमराहनं एक विकेट घेताच तो २०२४ मध्ये ५० कसोटी विकेट घेणारा जगातील पहिला गोलंदाज बनेल. या लिस्टमध्ये भारताचा रविचंद्रन अश्विन दुसऱ्या क्रमांकावर असून त्यानं २०२४ मध्ये ४६ कसोटी विकेट घेतल्या आहेत.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २०२०-२१ दौऱ्यात झालेल्या पिंक बॉल कसोटीत भारतीय संघाचा दारुण पराभव झाला होता. या कसोटीच्या पहिल्या डावात टीम इंडिया अवघ्या ३६ धावांवर ऑलआऊट झाली होती, जो भारताचा कसोटी क्रिकेटमधील सर्वात कमी स्कोर आहे. त्यामुळे आता ॲडलेड येथे खेळल्या जाणाऱ्या कसोटीत भारताला पराभवाचा बदला घेण्याची संधी मिळणार आहे.

Comments
Add Comment

टी-२० सामन्याची तिकीट विक्री सुरू असताना चाहत्यांवर लाठीचार्ज

कटक : भारतात क्रिकेट केवळ एक खेळ नसून तो धर्म आहे. या शब्दाची सत्यता पुन्हा एकदा ओडिशातील कटक शहरात सिद्ध झाली. ९

विराटचा दोन डावातील सलग ११ शतकांचा विक्रम

मुंबई  :  विराट कोहलीने त्याचे ५३वे एकदिवसीय शतक झळकावले आहे. रायपूरमध्ये सुरू असलेल्या दक्षिण

आयसीसी क्रमवारीत कोहलीची विराट भरारी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच

दक्षिण आफ्रिकेच्या टी - २० मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर

फिटनेसवर ठरणार शुभमन गिलचा निर्णय नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० मालिकेसाठी आता भारताचा संघ जाहीर

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने साधली बरोबरी

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना दक्षिण

रायपूर ODI : द. आफ्रिकेपुढे ३५९ धावांचे लक्ष्य

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना