Devendra Fadnavis : पाण्याचा प्रश्न सुटल्यावरच शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील

महाराष्ट्रात पाणी पातळी वाढल्याची देवेंद्र फडणवीस यांची माहिती


पुणे : जोपर्यंत आम्ही पाण्याचा प्रश्न सोडवत नाही. तोपर्यंत आम्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्या संपवू शकत नाही. महाराष्ट्रात नेहमीच ५० टक्के पाण्याची कमतरता आहे आणि जलसंधारण ही एकमेव गोष्ट आहे, जी ती सोडवू शकते. २०२० मध्ये केंद्र सरकारने एक पाणी टेबल अहवाल तयार केला होता. ज्यामध्ये भारतातील सर्व राज्यांमध्ये पाण्याची पातळी खाली गेली आहे. पण महाराष्ट्र हे एकमेव राज्य होते, ज्यात पाण्याची पातळी वाढली होती, असे त्या अहवालात नमूद केले असल्याचे प्रतिपादन भाजपा नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले आहे.


जैन समाजाचे राष्ट्रीय अधिवेशन राज्याची संस्कृती राजधानी पुण्यात होत आहे. याचा मोठा आनंद होत आहे. जैन समाजाचा कार्यक्रम हा केवळ समाजाचा नाही. तर भारताच्या जीडीपीचा कार्यक्रम आहे. देशाच्या जीडीपीच्या वाढीचा रस्ता जैन समाजातून जातो, असे प्रतिपादन भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केले. पुणे येथील बिबवेवाडी येथे आयोजित बीजेएस राष्ट्रीय अधिवेशनात ते बोलत होते.



शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायची असेल, तर पाण्याचा प्रश्न सोडवावा लागेल, हे लक्षात आले असल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात ५० टक्केपेक्षा अधिक जमीनी ही कोरडवाहू आहे. सरकारी शाळेत शिक्षण चांगले दिले जाते. तर दुसरीकडे सरकारी शाळेत शिक्षण खराब असते, असे बोलले जाते. पण महाराष्ट्र त्याला अपवाद ठरला आहे. कारण अनेक मुले आज सरकारी शाळेत शिकत आहेत, असे त्यांनी सांगितले. जैन गुरूंनी समाजाला शिकवण दिली आहे. जैन समाज जेवढे कमावतो, तेवढे दान देखील तो करतो. संविधानाची मूल्य समजली तरच आपली मुले चांगली नागरिक बनू शकतात. मला या कार्यक्रमाचे आमंत्रण मिळाले होते. त्याच वेळेस मी सांगितले होते की, काहीही झाले, कितीही काम असले, तरी मी या कार्यक्रमाला येणार असल्याचे संयोजकांना सांगितले असल्याचे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यावेळी सांगितले.


Comments
Add Comment

Jalgaon Railway : रेल्वे प्रवाशांची अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली; ‘कोयंबतूर–जयपूर’ एसी एक्स्प्रेस पुन्हा धावणार; जळगावकरांना रेल्वेचा दिलासा

Jalgaon Railway : जळगाव जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोयंबतूर–जयपूर साप्ताहिक विशेष एसी

Dhule News : शिरपूर-चोपडा मार्गावर भीषण अपघात; दोन जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू

Dhule News : धुळे जिल्ह्यातुन एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील शिरपूर-चोपडा मार्गावर झालेल्या भीषण अपघातात

Tiranga Rally : भाजप प्रत्येक जिल्ह्यात काढणार 'तिरंगा रॅली'

- ९ ते १७ ऑगस्टदरम्यान आयोजन; १० ऑगस्टला मुंबईत २५ हजार तरुणांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी होणार मुंबई :

Rickshaw-Taxi Driver : 15 ऑगस्टनंतर 'या' रिक्षा-टॅक्सी चालकांवर कारवाईची शक्यता; मुदतवाढ मिळणार नाही

मुंबई : राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचे मूलभूत ज्ञान अनिवार्य करण्याच्या निर्णयाची

Ahilyanagar : शेततळ्यात बुडून दोन शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू; परिसरात हळहळ

Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात एक मन हेलावणारी घटना घडली आहे. कोपरगाव तालुक्यातील बाहदराबाद

Pune News : हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक 100 हून अधिक NSG कमांडो, नेमकं काय आहे प्रकरण?

पुणे : पुण्यातील हिंजवडी आयटी (IT Park) पार्कमध्ये बुधवारी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त आणि नॅशनल सिक्युरिटी