Devendra Fadnavis : मुंबईकरांचा होणार आरामदायी प्रवास! वाढणार ३००लोकल फेऱ्या

वसईमध्ये उभारणार मेगा रेल्वे टर्मिनल; देवेंद्र फडणवीस यांची माहिती


मुंबई : मुंबईकरांचा लोकल (Mumbai Local) प्रवास सुलभ व आरामदायी होण्यासाठी रेल्वे प्रशासन नेहमीच कार्यरत असते. प्रवाशांचा कोंडीमुक्त प्रवास होण्यासाठी देखील सणासुदीच्या काळात रेल्वेकडून जादा लोकल सोडण्यात येतात. अशातच आता प्रवाशांचा दररोजचा प्रवासही गर्दिमुक्त होणार आहे. मुंबईच्या मध्य (Central Railway) आणि पश्चिम रेल्वे (Western Railway) मार्गावरून जादा लोकल फेऱ्या सोडण्यात येणार आहेत. (Local Update)



लोकल प्रवाशांची दिवसागणिक वाढती लोकसंख्या पाहता केंद्र सरकारने ३०० नव्या लोकल फेऱ्या सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच वसईमध्ये मेगा रेल्वे टर्मिनल देखील उभारले जाणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास आरामदायी आणि सुलभ होणार आहे. त्याचबरोबर एमएमआर प्रदेशातील कनेक्टिव्हिटी, व्यापार आणि रहदारीलाही चालना मिळणार आहे, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले आहे.



केंद्र सरकारची भेट


समृद्ध आणि विकसित महाराष्ट्राच्या दिशेने पाऊल टाकत केंद्र सरकारने (Central Government) तीन मोठ्या योजनांना मंजुरी दिली आहे. यामध्ये बंदरे जोडणीला बळ देण्यासाठी पूर्वांचल ते मुंबई कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहे. तसेच मध्य रेल्वेच्या परळ, एलटीटी, कल्याण आणि पनवेल आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल आणि वांद्रे स्थानकांची प्रवासी क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. जोगेश्वरीमध्ये नवे टर्मिनस आणि वसईमध्ये मोठे रेल्वे टर्मिनस उभारण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

पक्षप्रतिमा जपण्यासाठी अजित पवार संघापासून चार हात दूरच!

मुंबई  : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सोमवारी पार पडला. हा कार्यक्रम

पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक

मुंबई : पश्चिम रेल्वेवर दि. २५ ते २६ ऑक्टोबरच्या मध्यरात्री वसई रोड आणि भाईंदर स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर

Mumbai Megablock : मेगा 'ब्लॉक डे' मुंबईकरांना सतावणार! 'लाईफलाईन' लोकलची दुरुस्ती; कोणत्या मार्गांवर सेवा पूर्णपणे बंद राहणार?

मुंबई : मुंबईची लाईफलाइन (Mumbai Lifeline) असलेली उपनगरीय रेल्वे (Suburban Railway) लाखो प्रवाशांना घेऊन अविरत धावत असते. या लोकलच्या

यंदाच्या छठ पुजेत विरोधही होणार मावळ, काय आहे कारण...

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी यंदा छठ पुजेच्या निमित्ताने

महापालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी १९,३१७ नवीन टॅबची खरेदी

मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेले टॅब आता जुने झाल्याने नव्याने

पाऊस पडल्यामुळे मुंबईची हवा झाली एकदम 'स्वच्छ'!

मुंबई : मुंबईत रात्री झालेल्या पावसामुळे मुंबईकरांना काही दिवसांपासूनच्या उष्णतेपासून आणि प्रदूषणापासून थोडा