Devendra Fadnavis : मुंबईकरांचा होणार आरामदायी प्रवास! वाढणार ३००लोकल फेऱ्या

वसईमध्ये उभारणार मेगा रेल्वे टर्मिनल; देवेंद्र फडणवीस यांची माहिती


मुंबई : मुंबईकरांचा लोकल (Mumbai Local) प्रवास सुलभ व आरामदायी होण्यासाठी रेल्वे प्रशासन नेहमीच कार्यरत असते. प्रवाशांचा कोंडीमुक्त प्रवास होण्यासाठी देखील सणासुदीच्या काळात रेल्वेकडून जादा लोकल सोडण्यात येतात. अशातच आता प्रवाशांचा दररोजचा प्रवासही गर्दिमुक्त होणार आहे. मुंबईच्या मध्य (Central Railway) आणि पश्चिम रेल्वे (Western Railway) मार्गावरून जादा लोकल फेऱ्या सोडण्यात येणार आहेत. (Local Update)



लोकल प्रवाशांची दिवसागणिक वाढती लोकसंख्या पाहता केंद्र सरकारने ३०० नव्या लोकल फेऱ्या सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच वसईमध्ये मेगा रेल्वे टर्मिनल देखील उभारले जाणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास आरामदायी आणि सुलभ होणार आहे. त्याचबरोबर एमएमआर प्रदेशातील कनेक्टिव्हिटी, व्यापार आणि रहदारीलाही चालना मिळणार आहे, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले आहे.



केंद्र सरकारची भेट


समृद्ध आणि विकसित महाराष्ट्राच्या दिशेने पाऊल टाकत केंद्र सरकारने (Central Government) तीन मोठ्या योजनांना मंजुरी दिली आहे. यामध्ये बंदरे जोडणीला बळ देण्यासाठी पूर्वांचल ते मुंबई कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहे. तसेच मध्य रेल्वेच्या परळ, एलटीटी, कल्याण आणि पनवेल आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल आणि वांद्रे स्थानकांची प्रवासी क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. जोगेश्वरीमध्ये नवे टर्मिनस आणि वसईमध्ये मोठे रेल्वे टर्मिनस उभारण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

महापुरुषांची नावे संक्षिप्त घेणाऱ्यांवर कारवाई करा; शिवसेना नगरसेवकांची मागणी

मुंबई: मुंबई महापालिकेच्या वतीने जोगेश्वरी रुग्णालयाचे नामकरण हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब

महापालिका शाळांमधील न्युट्रीबार वादात; मध्यान्ह भोजनात इस्कॉनच्या खिचडीची झाली मागणी

मुंबई: मुंबई महापालिका शाळांमधील मुलांना पोषक आहारांतर्गत देण्यात येणाऱ्या न्युट्रीबारच्या वाटपाबाबत आता

मुंबईतील टँकर माफियांची लॉबी नष्ट करा; महापालिका सभागृहात सर्वच नगरसेवकांची एकमुखी मागणी

मुंबई: मुंबईत सध्या पाण्याची काही भागांमध्ये समस्या निर्माण झाली असून ही टंचाई फक्त आणि फक्त टँकर माफियांसाठी

मुंबईचा पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्ग पावसाळ्यापूर्वी समतल करा; उपमहापौरांची आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी

मुंबई: मुंबई महानगरातील रस्त्यांची स्थिती अधिक सुधारण्यासाठी पश्चिम व पूर्व द्रुतगती महामार्ग तसेच प्रमुख

महापालिकेच्यावतीने मुंबई क्लीन लीग स्पर्धा; स्वच्छता विषयक स्पर्धेच्या नोंदणीचा अक्षय कुमार यांच्या उपस्थितीत शुभारंभ

मुंबई: मुंबई अधिक स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याच्या अनुषंगाने, महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने

मुंबई वॉटर मेट्रो जलवाहतूक प्रकल्पाला गती देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

मुंबई : "मुंबई महानगर प्रदेशात जलप्रवासी वाहतुकीसाठी वॉटर मेट्रो प्रकल्प तीन टप्प्यात कार्यान्वित करण्यात