Devendra Fadnavis : मुंबईकरांचा होणार आरामदायी प्रवास! वाढणार ३००लोकल फेऱ्या

वसईमध्ये उभारणार मेगा रेल्वे टर्मिनल; देवेंद्र फडणवीस यांची माहिती


मुंबई : मुंबईकरांचा लोकल (Mumbai Local) प्रवास सुलभ व आरामदायी होण्यासाठी रेल्वे प्रशासन नेहमीच कार्यरत असते. प्रवाशांचा कोंडीमुक्त प्रवास होण्यासाठी देखील सणासुदीच्या काळात रेल्वेकडून जादा लोकल सोडण्यात येतात. अशातच आता प्रवाशांचा दररोजचा प्रवासही गर्दिमुक्त होणार आहे. मुंबईच्या मध्य (Central Railway) आणि पश्चिम रेल्वे (Western Railway) मार्गावरून जादा लोकल फेऱ्या सोडण्यात येणार आहेत. (Local Update)



लोकल प्रवाशांची दिवसागणिक वाढती लोकसंख्या पाहता केंद्र सरकारने ३०० नव्या लोकल फेऱ्या सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच वसईमध्ये मेगा रेल्वे टर्मिनल देखील उभारले जाणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास आरामदायी आणि सुलभ होणार आहे. त्याचबरोबर एमएमआर प्रदेशातील कनेक्टिव्हिटी, व्यापार आणि रहदारीलाही चालना मिळणार आहे, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले आहे.



केंद्र सरकारची भेट


समृद्ध आणि विकसित महाराष्ट्राच्या दिशेने पाऊल टाकत केंद्र सरकारने (Central Government) तीन मोठ्या योजनांना मंजुरी दिली आहे. यामध्ये बंदरे जोडणीला बळ देण्यासाठी पूर्वांचल ते मुंबई कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहे. तसेच मध्य रेल्वेच्या परळ, एलटीटी, कल्याण आणि पनवेल आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल आणि वांद्रे स्थानकांची प्रवासी क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. जोगेश्वरीमध्ये नवे टर्मिनस आणि वसईमध्ये मोठे रेल्वे टर्मिनस उभारण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

गोरेगाव मुलुंड पश्चिमेतील उड्डाणपूल प्रकल्पाला गती, मुंबई मेट्रो ४च्या खालून जाणार पूल

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : तानसा जलवाहिनी ते नाहूर रेल्वे पूल येथपर्यंतचा १.८९ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल

महापालिकेच्या आपला दवाखान्यामध्येही मुख कर्करोगाची तपासणी

गर्भाशय मुख आणि स्तन कर्करोगाचे दवाखान्यांसह प्रसुतीगृहांमध्ये तपासणी शिबीर मुंबई (विशेष प्रतिनिधी)

गोरेगावात लिफ्टमध्ये हायड्रोजन फुग्यांचा स्फोट; तीन जण थोडक्यात बचावले

मुंबई : मुंबईतील गोरेगाव परिसरात हायड्रोजन गॅस भरलेल्या फुग्यांमुळे मोठा धोका निर्माण झाल्याची घटना समोर आली

भारतीय कृषी क्षेत्रावर तसा विपरीत परिणाम होऊ नये

अंदाजपत्रकातून विकासाला गती येण्यासाठी आणखी काही ठोस पावलांची अपेक्षा बारामती : केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत

शक्तीपीठ महामार्गाच्या आराखड्यात बदल

राज्य सरकारचा निर्णय; कागल आणि हातकणंगलेचा भाग वगळला मुंबई : राज्यातील साडेतीन शक्तीपीठांना जोडणाऱ्या

Pune Mumbai Expressway News : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर गॅस गळतीमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला, पहाटेपर्यंत बचावकार्य सुरू

मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मंगळवारी संध्याकाळी ५ वाजेपासून सुरू झालेला वाहतुकीचा खोळंबा तब्बल १२