Skin care: थंडीत हातांच्या त्वचेची अशी घ्या काळजी

मुंबई: थंडीच्या दिवसांत आपली त्वचा कोरडी पडते. या दिवसांमध्ये हातांचा ओलावा कायम राखण्यासाठी दिवसातून अनेक वेळा मॉश्चरायजरचा वापर केला जातो.


खूप गरम पाण्याने हात धुतल्याने त्वचा अतिशय रूक्ष तसेच निर्जीव होते. यामुळे थंड अथवा कोमट पाण्याने हात धुवा. यामुळे त्वचेतील ओलावा कायम राहील.


झोपण्याच्या आधी चांगल्या प्रकारचे हँड क्रीम लावा. यामुळे हातांची त्वचा रात्रभर नरम आणि मुलायम राहील.


थंडीत बाहेर जाताना सुती अथवा लोकरीचे कपडे घाला. यामुळे त्वचेचा थंडीपासून बचाव होईल. त्वचेला आतून ओलावा देण्यासाठी स्किन केअरमध्ये व्हिटामिन ई ऑईलचा वापर करा.


आठवड्यातून एकदा हलक्या स्क्रबच्या सहाय्याने हातांची सफाई करा. यामुळे डेड स्किन निघून जाईल. त्यानंतर क्रीम लावण्यास विसरू नका.


थंडीच्या दिवसांतही हातांना सनस्क्रीन लावण्यास विसरू नका. खासकरून तुम्ही बाहेर जात असाल तर सनस्क्रीनचा वापर जरूर करा.


भरपूर पाणी प्या. यामुळे योग्य प्रमाणात शरीर हायड्रेट राहील तसेच त्वचा आतून हेल्दी राहील.

Comments
Add Comment

Shravan : श्रावणात मांसाहार का करीत नाहीत? केवळ धार्मिक कारण की आणखी काही, आयुर्वेदाचे नियम काय सांगतात?

श्रावण महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो. या दरम्यान भगवान शंकराची पूजा केली जाते. या काळात

नाचणीची भाकरी रोज खाणे योग्य आहे का? कॅलरी, प्रोटीन आणि फायद्यांची माहिती

नाचणीला सुपरफूड मानले जाते, कारण ते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, रक्तातील साखर (शुगर) नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि

अन्नाची अॅलर्जी : असहिष्णुता की संवेदनशीलता?

अनेकांना एखादा अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर शिंका येणे, श्वास घेताना घरघर होणे, अंगावर पुरळ उठणे, पोट फुगणे, जुलाब,

EAR CARE : कान स्वच्छ करताना बाळगा विशेष काळजी; टोकदार वस्तूंचा वापर ठरू शकतो घातक, तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा

शरीराची स्वच्छता राखणे जितके महत्त्वाचे आहे, तितकीच कानांची काळजी घेणे देखील अत्यंत गरजेचे असते. मात्र, कानातील

Health Care : पावसाळा आणि आरोग्याची काळजी; आरओ की उकळलेले पाणी? कोणते पिणे योग्य?

पावसाळा सुरू झाला की वातावरणात बदल होतो आणि साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागतो. या दिवसांत दूषित

Viral Cocktail : पावसाळ्यात 'व्हायरल कॉकटेल'चा धोका; कोविड, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए'ची लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष

मुंबई: पावसाळ्याच्या वातावरणात कोविड-१९, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए' हे तिन्ही विषाणू एकाच वेळी सक्रिय झाल्यामुळे