Onion Rate: कांद्याला तीन हजारापेक्षा कमी भाव

सोलापूर: सोलापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत ३५३ गाड्या कांद्याची आवक झाली होती. यंदा आवक कमी असूनही सरासरी भाव अडीच हजार ते २८०० रुपयांपर्यंतच स्थिर आहे. २० क्विंटल कांदा अक्षरश: ५०० रुपये दराने विकला गेला आहे. यावर्षी पावसामुळे हजारो शेतकऱ्यांचा कांदा जागेवरच खराब झाला तर अनेक शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळालेले नाही.



सततचा पाऊस व सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने कांदा खराब झाल्याच्या शेतकऱ्यांच्या व्यथा आहेत. आज १० क्विंटल कांद्याला प्रतिक्विंटल साडेसहा हजार रुपयांचा दर मिळाला आहे. गुरुवारी सोलापूर बाजार समितीत एकूण ३५ हजार ३०७ क्विंटल (७० हजार ६१४ पिशवी) कांदा विक्रीसाठी आला होता. त्यातील ३५ हजार २७७ क्विंटल कांदा सरासरी दोन हजार ८०० रुपये दराने विकला गेला आहे.गतवर्षी याच हंगामात दररोज सोलापूर बाजार समितीत ७०० ते ८०० गाड्यांची आवक होती. परंतु, निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळाला नसल्याचा फटका त्यांना सहन करावा लागला. आता निर्यातबंदी नसताना देखील भावात वधारणा झालेली नाही. दरम्यान, शेतकरी गडबड करून ओला कांदा विक्रीसाठी आणत असल्यानेही भाव वाढत नसल्याचे बाजार समितीतील अधिकाऱ्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी वाळलेला कांदा आणावा, त्याला चांगला दर मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

Crime News : आधी कार आता दुचाकी जळून खाक, अहिल्यानगरात काय घडतंय ? CCTV तील 'ते' दृश्य पाहून संशय बळावला

Crime News :  अहिल्यानगर शहरात वाहनांना लक्ष्य करून आग लावण्याच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Jalgaon : भीषण अपघातामुळे वाटेतच काळाची झडप, १ वर्षाच्या चिमुकलीसह चौघांचा हृदयद्रावक अंत

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील वरणगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गावरील (Mumbai-Nagpur Highway) बायपासवर थरारक अशी भीषण रस्ते अपघाताची

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52

Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या (Attack) घटना सातत्याने समोर येत असताना आता

Yavatmal Murder Case : ‘गिफ्ट लवकरच पाठवतो’... स्टेटस ठेवला अन् घरात घुसून सपासप वार; तरुणाची निर्घृण हत्या

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आणखी एका हत्येची घटना समोर आली

Navi Mumbai Airport Shivaji Maharaj Statue : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा भव्य पुतळा! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १२ फूट उंच कांस्य अर्धपुतळ्याचे अनावरण

नवी मुंबई : महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य १२ फूट उंच कांस्य