IPL Mega Auction 2025: MS धोनीचा खास भिडू मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात

IPL Mega Auction 2025: आयपीएल 2025 मेगा लिलाव सौदी अरेबियातील जेद्दाह येथे २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी पार पडला. एकपेक्षा एक वरचढ पैशांची बोली लावत अनेक टीम्सने आपल्याकडे चांगले खेळाडू सामावून घेतले. त्यापैकी काही खेळाडूंवर बोली लावली गेली नाही तर काही खेळाडूंवर जास्त किंमतीची बोली लावण्यात आली. आयपीएलच्या मेगा लिलावात (IPL Mega Auction 2025) चेन्नई सुपर किंग्जने आतापर्यंत सॅम कुरन, रविचंद्रन अश्विन, रचिन रवींद्र आणि डेव्हॉन कॉनवे यांच्यासह अनेक जुन्या खेळाडूंना परत घेतले आहे. परंतु चेन्नई सुपर किंग्सचा वेगवान गोलंदाज दीपक चहरला पुन्हा संघात घेताना चेन्नई सुपर किंग्सचा डाव फसला. दीपक चहरला मुंबई इंडियन्सने आपल्या ताफ्यात सामील करुन घेतले आहे.



आयपीएल २०२५ मेगा लिलावाच्या पहिल्या दिवशी, सर्व १० संघांनी मिळून ४६७.९५ कोटी रुपये खर्च केले. त्यामुळे दुसऱ्या दिवशी अनेक संघाकडे फारच कमी पैसे शिल्लक राहिले. असे असतानाही दुसऱ्या दिवशी अनेक भारतीय खेळाडूंवर मोठी बोली लावण्यात आली. भुवनेश्वर कुमारला आरसीबीने १०.७५ कोटी रुपयांना विकत घेतले याशिवाय भारतीय वेगवान गोलंदाजांवरही मोठ्या प्रमाणात पैशांचा वर्षाव केला.

Comments
Add Comment

अपोलो टायर्स टीम इंडियाचा नवीन स्पॉन्सर; प्रत्येक सामन्यासाठी बीसीसीआयला देणार ४.५ कोटी रुपये

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय क्रिकेट संघासाठी नवीन जर्सी स्पॉन्सर म्हणून अपोलो

युवराज सिंगनं काय केलं... ? ईडीनं विचारला जाब

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याला बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅप 1xBet प्रकरणात ईडीने समन्स बजावले आहे.

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या