IPL Mega Auction 2025: MS धोनीचा खास भिडू मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात

IPL Mega Auction 2025: आयपीएल 2025 मेगा लिलाव सौदी अरेबियातील जेद्दाह येथे २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी पार पडला. एकपेक्षा एक वरचढ पैशांची बोली लावत अनेक टीम्सने आपल्याकडे चांगले खेळाडू सामावून घेतले. त्यापैकी काही खेळाडूंवर बोली लावली गेली नाही तर काही खेळाडूंवर जास्त किंमतीची बोली लावण्यात आली. आयपीएलच्या मेगा लिलावात (IPL Mega Auction 2025) चेन्नई सुपर किंग्जने आतापर्यंत सॅम कुरन, रविचंद्रन अश्विन, रचिन रवींद्र आणि डेव्हॉन कॉनवे यांच्यासह अनेक जुन्या खेळाडूंना परत घेतले आहे. परंतु चेन्नई सुपर किंग्सचा वेगवान गोलंदाज दीपक चहरला पुन्हा संघात घेताना चेन्नई सुपर किंग्सचा डाव फसला. दीपक चहरला मुंबई इंडियन्सने आपल्या ताफ्यात सामील करुन घेतले आहे.



आयपीएल २०२५ मेगा लिलावाच्या पहिल्या दिवशी, सर्व १० संघांनी मिळून ४६७.९५ कोटी रुपये खर्च केले. त्यामुळे दुसऱ्या दिवशी अनेक संघाकडे फारच कमी पैसे शिल्लक राहिले. असे असतानाही दुसऱ्या दिवशी अनेक भारतीय खेळाडूंवर मोठी बोली लावण्यात आली. भुवनेश्वर कुमारला आरसीबीने १०.७५ कोटी रुपयांना विकत घेतले याशिवाय भारतीय वेगवान गोलंदाजांवरही मोठ्या प्रमाणात पैशांचा वर्षाव केला.

Comments
Add Comment

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची यशस्वी सांगता, टीम इंडिया पुढील मालिका कुठे खेळणार ?

कोलकाता : भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची यशस्वी सांगता झाली. भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्धची टी ट्वेंटी मालिका

पावसामुळे पाचवा सामना रद्द, भारताने टी-२० मालिका २-१ ने जिंकली

कॅनबेरा : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा टी-२० सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. भारताच्या

आयसीसीच्या बैठकीत बीसीसीआयने मांडला आशिया कपचा मुद्दा, समस्येवर मार्ग काढण्यासाठी समितीची स्थापना

मुंबई : भारताने आशिया चषक २०२५ जिंकला पण विजेत्या भारतीय क्रिकेट संघाला ट्रॉफी मिळाली नाही. भारतीय संघाने आशियाई

ब्रिस्बेनच्या गाबावर रंगणार अखेरचा T20 सामना, भारत मारणार का बाजी ?

ब्रिस्बेन : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतील पाचवा अर्थात

पावसाच्या खेळात भारताचा दणदणीत विजय! पाकिस्तानला अवघ्या २ धावांनी लोळवले

मोंग कोक : भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ जेव्हा जेव्हा आमनेसामने येतात, त्यावेळी क्रिकेट चाहत्यांना रोमांचक

विश्वविजेत्या महिला क्रिकेट संघाचा विजय देशातील मुलींसाठी प्रेरणादायी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारताला विश्वचषक जिंकून देणाऱ्या महिला क्रिकेट संघाचा विजय क्रीडा क्षेत्रात येणाऱ्या अनेक मुलींसाठी