IPL 2025: अमरावतीच्या जितेशला आयपीएल लिलावात मिळाले ११ कोटी, या संघाने केले खरेदी

अमरावती : अमरावतीचा धडाकेबाज यष्टिरक्षक फलंदाज जितेश शर्माला २०२५(IPL 2025) मध्ये होणाऱ्या आयपीएल क्रिकेट मोसमासाठी झालेल्या लिलावात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (आरसीबी) ११ कोटी रुपयांमध्ये खरेदी केले. त्यामुळे अमरावतीच्या क्रिकेट वर्तुळात आनंदाची लाट पसरली असून, यामुळे इतर उदयोन्मुख क्रिकेटपटूंना प्रोत्साहन मिळाल्याशिवाय राहणार नाही.


जितेश शर्मा आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या संघात होता. त्याचप्रमाणे त्याने भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह घरगुती क्रिकेटमध्येही आक्रमक फटकेबाजी केली आहे. सोबतच यष्टिरक्षक म्हणूनही त्याची कामगिरी ही देखणी राहिली आहे. त्याने घेतलेले झेल हे उत्तम ठरले आहेत.


याआधी तीन आयपीएल मोसमांमध्ये पंजाब किंगने त्याला २० लाख रुपयांमध्ये खरेदी केले होते. परंतु, त्याची आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय क्रिकेटमधील उत्तम कामगिरी बघता त्याला अचानक ११ कोटी रुपये भाव मिळाला आहे. याआधी अन्य कोणत्याही अमरावतीकर क्रिकेटपटूला अशाप्रकारे आयपीएलमध्ये भाव मिळाला नव्हता, हे विशेष.

Comments
Add Comment

WPL 2026 Final: स्मृती मनधानाच्या आरसीबीची विजयी घोडदौड सुरूच; दुसऱ्यांदा पटकावलं WPL चं जेतेपद

वडोदरा: चार आठवड्यांच्या लढतीनंतर, महिला प्रीमियर लीग २०२६ चा गुरुवार ५ फेब्रुवारी रोजी वडोदरा येथील बीसीए

राष्ट्रीय खोखोपटू सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेत प्रमुख अधिकारी (प्र) म्हणून नियुक्ती

मुंबई : राष्ट्रीय खोखोपटू तथा क्रीडा प्रसारक श्री. सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेच्या दुकाने व आस्थापना

WPL 2026 Final: बंगळूरची विजयी घोडदौड दिल्ली थांबवू शकणार का?

वडोदरा: चार आठवड्यांच्या लढतीनंतर, महिला प्रीमियर लीग २०२६ आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. रॉयल चॅलेंजर्स

IND vs PAK : "आयसीसीचे मुख्यालय भारतात असते तर बॉम्बने उडवले असते..."; पाकिस्तानी अभिनेत्याचे वादग्रस्त विधान

रविवारी (१ फेब्रुवारी) पाकिस्तान सरकारने जाहीर केले की त्यांचा संघ २०२६ च्या टी२० विश्वचषकासाठी मैदानात उतरेल,

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन निवडणुकीची स्थगिती कायम, रोहित पवारांच्या अडचणीत वाढ

नवी दिल्ली  : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि आमदार रोहित पवार यांना सर्वोच्च न्यायालयाने जोरदार

IND vs PAK : पाकिस्तान नेहमीप्रमाणे "यू-टर्न" घेईल; सुनील गावस्कर यांची पाकिस्तानवर टीका

मुंबई: टी-२० विश्वचषकापूर्वी पाकिस्तान सरकारने भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे.