IPL 2025: अमरावतीच्या जितेशला आयपीएल लिलावात मिळाले ११ कोटी, या संघाने केले खरेदी

अमरावती : अमरावतीचा धडाकेबाज यष्टिरक्षक फलंदाज जितेश शर्माला २०२५(IPL 2025) मध्ये होणाऱ्या आयपीएल क्रिकेट मोसमासाठी झालेल्या लिलावात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (आरसीबी) ११ कोटी रुपयांमध्ये खरेदी केले. त्यामुळे अमरावतीच्या क्रिकेट वर्तुळात आनंदाची लाट पसरली असून, यामुळे इतर उदयोन्मुख क्रिकेटपटूंना प्रोत्साहन मिळाल्याशिवाय राहणार नाही.


जितेश शर्मा आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या संघात होता. त्याचप्रमाणे त्याने भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह घरगुती क्रिकेटमध्येही आक्रमक फटकेबाजी केली आहे. सोबतच यष्टिरक्षक म्हणूनही त्याची कामगिरी ही देखणी राहिली आहे. त्याने घेतलेले झेल हे उत्तम ठरले आहेत.


याआधी तीन आयपीएल मोसमांमध्ये पंजाब किंगने त्याला २० लाख रुपयांमध्ये खरेदी केले होते. परंतु, त्याची आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय क्रिकेटमधील उत्तम कामगिरी बघता त्याला अचानक ११ कोटी रुपये भाव मिळाला आहे. याआधी अन्य कोणत्याही अमरावतीकर क्रिकेटपटूला अशाप्रकारे आयपीएलमध्ये भाव मिळाला नव्हता, हे विशेष.

Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत