CM Eknath Shinde : महायुतीच्या विजयानंतर लाडक्या बहिणींचे पुढील हप्त्याकडे लक्ष; कधी मिळणार?

निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी केले भाष्य, म्हणाले...


मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल (Assembly Election Result 2024) लागला असून यामध्ये महायुती (Mahayuti Government) सरकारचा विजय झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी काढलेली 'माझी लाडकी बहीण योजना' (Mazi Ladki Bahin Yojana) चांगलीच वरचढ ठरल्याचे दिसून आले. दरम्यान, महायुती पुन्हा एकदा सत्तेत आल्यास लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिली जाणारी रक्कम वाढवणार असल्याचे महायुतीच्या जाहीरनाम्यात म्हटले होते. त्यानुसार महायुती सरकारला बहुमत मिळाले असून लवकरच महायुती सत्तास्थापन करणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचे लक्ष आता पुढी हप्त्याकडे लागले आहे. याचदरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे.



निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेनेच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित करताना मुख्यमंत्रि शिंदे म्हणाले की, 'महिलांना आता १५०० ऐवजी २१०० रुपये दिले जाणार आहेत. महिलांनी मतदानावेळी जो निर्णय घेतला तो अतिशय यशस्वी झाला आहे आणि आम्हाला खूप मोठा विजय मिळाला आहे. लाडकी बहीण योजना सुपरहिट झाली असून यामुळे विरोधकांच्या छातीत धडकी भरल्याचे दिसून येत आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.


दरम्यान, “एकनाथ शिंदे पुढील पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री झालेच पाहिजेत”, “महिलांचा आशीर्वाद असणार, एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार”, “इडा पिडा टळू दे, लाडक्या भावाचं राज्य येऊ दे”, अशा घोषणा शिवसेना महिला कार्यकर्त्यांनी दिल्या.

Comments
Add Comment

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद