CM Eknath Shinde : महायुतीच्या विजयानंतर लाडक्या बहिणींचे पुढील हप्त्याकडे लक्ष; कधी मिळणार?

निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी केले भाष्य, म्हणाले...


मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल (Assembly Election Result 2024) लागला असून यामध्ये महायुती (Mahayuti Government) सरकारचा विजय झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी काढलेली 'माझी लाडकी बहीण योजना' (Mazi Ladki Bahin Yojana) चांगलीच वरचढ ठरल्याचे दिसून आले. दरम्यान, महायुती पुन्हा एकदा सत्तेत आल्यास लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिली जाणारी रक्कम वाढवणार असल्याचे महायुतीच्या जाहीरनाम्यात म्हटले होते. त्यानुसार महायुती सरकारला बहुमत मिळाले असून लवकरच महायुती सत्तास्थापन करणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचे लक्ष आता पुढी हप्त्याकडे लागले आहे. याचदरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे.



निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेनेच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित करताना मुख्यमंत्रि शिंदे म्हणाले की, 'महिलांना आता १५०० ऐवजी २१०० रुपये दिले जाणार आहेत. महिलांनी मतदानावेळी जो निर्णय घेतला तो अतिशय यशस्वी झाला आहे आणि आम्हाला खूप मोठा विजय मिळाला आहे. लाडकी बहीण योजना सुपरहिट झाली असून यामुळे विरोधकांच्या छातीत धडकी भरल्याचे दिसून येत आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.


दरम्यान, “एकनाथ शिंदे पुढील पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री झालेच पाहिजेत”, “महिलांचा आशीर्वाद असणार, एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार”, “इडा पिडा टळू दे, लाडक्या भावाचं राज्य येऊ दे”, अशा घोषणा शिवसेना महिला कार्यकर्त्यांनी दिल्या.

Comments
Add Comment

Ahilyanagar: लग्नाच्या आमिषाने तरुणीचे लैंगिक शोषण; श्रीरामपूरात गुन्हा दाखल

श्रीरामपूर: लग्नाचे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरुणीचे दीर्घकाळ लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अक्षय विश्वनाथ गवळी

बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा पुढाकार

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, भारत पेट्रोलियम

Nitesh Rane: मंत्री नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला राष्ट्रीय सागरी दिन

मुंबई: भारताच्या आर्थिक महासत्तेकडे होणाऱ्या वाटचालीत सागरी क्षेत्राचा वाटा मोलाचा असून, बंदरांच्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कोयना महोत्सवाची यशस्वी सांगता

सातारा: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अग्रस्थानी नेण्याचा निर्धार व्यक्त करत पर्यटन, शेती आणि रोजगार

मुख्यमंत्र्यांच्या पाठबळामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पर्यावरणीय पुनरुज्जीवन प्रकल्पाला मिळाली चालना

मुंबई: जैवविविधतेने समृद्ध अशा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील जागेचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन

‘पीएनजी’ क्षेत्रातील नागरिकांना ३० जूननंतर ‘एलपीजी’ गॅस पुरवठा बंद; पर्यायी इंधन म्हणून केरोसीनचे वाटप होणार

मुंबई: राज्यातील ज्या शहरी भागांमध्ये पाइपद्वारे गॅस (पीएनजी) जोडणीची सुविधा उपलब्ध आहे, तिथे नागरिकांनी पीएनजी