CM Eknath Shinde : महायुतीच्या विजयानंतर लाडक्या बहिणींचे पुढील हप्त्याकडे लक्ष; कधी मिळणार?

Share

निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी केले भाष्य, म्हणाले…

मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल (Assembly Election Result 2024) लागला असून यामध्ये महायुती (Mahayuti Government) सरकारचा विजय झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी काढलेली ‘माझी लाडकी बहीण योजना‘ (Mazi Ladki Bahin Yojana) चांगलीच वरचढ ठरल्याचे दिसून आले. दरम्यान, महायुती पुन्हा एकदा सत्तेत आल्यास लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिली जाणारी रक्कम वाढवणार असल्याचे महायुतीच्या जाहीरनाम्यात म्हटले होते. त्यानुसार महायुती सरकारला बहुमत मिळाले असून लवकरच महायुती सत्तास्थापन करणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचे लक्ष आता पुढी हप्त्याकडे लागले आहे. याचदरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे.

निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेनेच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित करताना मुख्यमंत्रि शिंदे म्हणाले की, ‘महिलांना आता १५०० ऐवजी २१०० रुपये दिले जाणार आहेत. महिलांनी मतदानावेळी जो निर्णय घेतला तो अतिशय यशस्वी झाला आहे आणि आम्हाला खूप मोठा विजय मिळाला आहे. लाडकी बहीण योजना सुपरहिट झाली असून यामुळे विरोधकांच्या छातीत धडकी भरल्याचे दिसून येत आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

दरम्यान, “एकनाथ शिंदे पुढील पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री झालेच पाहिजेत”, “महिलांचा आशीर्वाद असणार, एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार”, “इडा पिडा टळू दे, लाडक्या भावाचं राज्य येऊ दे”, अशा घोषणा शिवसेना महिला कार्यकर्त्यांनी दिल्या.

Recent Posts

Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला आपल्या राशीनुसार खरेदी करा या गोष्टी, मिळतील भरपूर लाभ

मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…

11 minutes ago

LSG vs DC, IPL 2025: ऋषभ पंत घरच्या मैदानावर दिल्लीला रोखणार?

मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…

31 minutes ago

Heat wave: उष्णतेच्या लाटेपासून असा करा बचाव…जाणून घ्या या टिप्स

मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…

1 hour ago

कोकण रेल्वेने प्रवास करण्याआधी हे जरूर वाचा…

कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…

2 hours ago

‘चला वाचू या! सुट्टीतील वाचनालय’, मुंबई महानगरपालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम

येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…

2 hours ago

चंद्रपूर: येत्या २४ एप्रिल पर्यंत उष्णतेचा ‘येलो अलर्ट’

चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…

3 hours ago