CM Eknath Shinde : महायुतीच्या विजयानंतर लाडक्या बहिणींचे पुढील हप्त्याकडे लक्ष; कधी मिळणार?

  100

निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी केले भाष्य, म्हणाले...


मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल (Assembly Election Result 2024) लागला असून यामध्ये महायुती (Mahayuti Government) सरकारचा विजय झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी काढलेली 'माझी लाडकी बहीण योजना' (Mazi Ladki Bahin Yojana) चांगलीच वरचढ ठरल्याचे दिसून आले. दरम्यान, महायुती पुन्हा एकदा सत्तेत आल्यास लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिली जाणारी रक्कम वाढवणार असल्याचे महायुतीच्या जाहीरनाम्यात म्हटले होते. त्यानुसार महायुती सरकारला बहुमत मिळाले असून लवकरच महायुती सत्तास्थापन करणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचे लक्ष आता पुढी हप्त्याकडे लागले आहे. याचदरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे.



निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेनेच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित करताना मुख्यमंत्रि शिंदे म्हणाले की, 'महिलांना आता १५०० ऐवजी २१०० रुपये दिले जाणार आहेत. महिलांनी मतदानावेळी जो निर्णय घेतला तो अतिशय यशस्वी झाला आहे आणि आम्हाला खूप मोठा विजय मिळाला आहे. लाडकी बहीण योजना सुपरहिट झाली असून यामुळे विरोधकांच्या छातीत धडकी भरल्याचे दिसून येत आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.


दरम्यान, “एकनाथ शिंदे पुढील पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री झालेच पाहिजेत”, “महिलांचा आशीर्वाद असणार, एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार”, “इडा पिडा टळू दे, लाडक्या भावाचं राज्य येऊ दे”, अशा घोषणा शिवसेना महिला कार्यकर्त्यांनी दिल्या.

Comments
Add Comment

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

ST : राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर (भंगार केंद्र) एसटीच्या जागेवर उभारले जाणार, 'एसटी'साठी उत्पन्नाचा नवा स्त्रोत...

मुंबई : एसटी विभागीतल जुनी वाहने  स्क्रॅप करून त्याचे सुटे भाग पुन्हा वापरात येणार नाहीत, अशा पद्धतीने त्यांची

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या