Municipality Election : पालिका निवडणुकांचा मार्ग होणार मोकळा!

वर्षाच्या सुरुवातीलाच निवडणुकीच्या तयारीची शक्यता


पुणे : महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या आहेत. ओबीसी आरक्षण आणि प्रभागरचना यासंदर्भात न्यायालयात झालेल्या याचिकांमुळे या निवडणुकांना स्थगिती मिळालेली आहे. आता राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2024) निकालावर (Election Result) या निवडणुकांचे भवितव्य ठरणार होते. महायुती किंवा महाविकास आघाडी यांना काय कौल मिळतो, यावर या निवडणुका पुढील वर्षात होणार का, हेही ठरणार असल्याचे जवळपास निश्चित होते.



त्यानुसार महायुतीला राज्यात भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीला दणदणीत यश मिळाले आहे. त्यामुळे राज्यात या तीनही पक्षांना पोषक वातावरण असल्याने पुढील सहा महिन्यांच्या आतच या निवडणुका (Municipality Election) घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


अनेक महापालिकांच्या प्रभागरचना आणि जिल्हा परिषद, पंचायती समिती यांच्या गट आणि गणरचना निश्चित झालेल्या आहेत. त्यामुळे आता त्यावर पुढची निवडणुकीची प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे. ते लवकरच सुरू होईल, असे भाजपाच्या काही वरिष्ठ पदाधिकार्यांकडून सांगण्यात आले.



पुण्यात पुन्हा प्रभागरचना


पुणे महापालिकेतील तीन सदस्य प्रभागरचना यापूर्वी करण्यात आली आहे. मात्र, उरुळी देवाची आणि फुरसुंगी ही दोन गावे महापालिकेतून वगळून त्यांची स्वतंत्र महापालिका करण्यात आली आहे. त्यामुळे आता पुणे महापालिकेसाठी पुन्हा नव्याने प्रभागरचना करावी लागणार असल्याचे स्पष्ट आहे. (Municipality Election)

Comments
Add Comment

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे