Municipality Election : पालिका निवडणुकांचा मार्ग होणार मोकळा!

Share

वर्षाच्या सुरुवातीलाच निवडणुकीच्या तयारीची शक्यता

पुणे : महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या आहेत. ओबीसी आरक्षण आणि प्रभागरचना यासंदर्भात न्यायालयात झालेल्या याचिकांमुळे या निवडणुकांना स्थगिती मिळालेली आहे. आता राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2024) निकालावर (Election Result) या निवडणुकांचे भवितव्य ठरणार होते. महायुती किंवा महाविकास आघाडी यांना काय कौल मिळतो, यावर या निवडणुका पुढील वर्षात होणार का, हेही ठरणार असल्याचे जवळपास निश्चित होते.

त्यानुसार महायुतीला राज्यात भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीला दणदणीत यश मिळाले आहे. त्यामुळे राज्यात या तीनही पक्षांना पोषक वातावरण असल्याने पुढील सहा महिन्यांच्या आतच या निवडणुका (Municipality Election) घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अनेक महापालिकांच्या प्रभागरचना आणि जिल्हा परिषद, पंचायती समिती यांच्या गट आणि गणरचना निश्चित झालेल्या आहेत. त्यामुळे आता त्यावर पुढची निवडणुकीची प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे. ते लवकरच सुरू होईल, असे भाजपाच्या काही वरिष्ठ पदाधिकार्यांकडून सांगण्यात आले.

पुण्यात पुन्हा प्रभागरचना

पुणे महापालिकेतील तीन सदस्य प्रभागरचना यापूर्वी करण्यात आली आहे. मात्र, उरुळी देवाची आणि फुरसुंगी ही दोन गावे महापालिकेतून वगळून त्यांची स्वतंत्र महापालिका करण्यात आली आहे. त्यामुळे आता पुणे महापालिकेसाठी पुन्हा नव्याने प्रभागरचना करावी लागणार असल्याचे स्पष्ट आहे. (Municipality Election)

Recent Posts

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, २१ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…

23 minutes ago

Summer Tips : उन्हाळ्यात कशी घ्यावी डोळ्यांची काळजी, जाणून घ्या ‘या’ गोष्टी!

मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…

44 minutes ago

क्रिकेटपटूंच्या कराराची BCCI ने केली घोषणा, ३४ खेळाडूंशी करार; फक्त चार खेळाडूंचा ए+ मध्ये समावेश

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…

1 hour ago

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा २६/११ च्या हल्ल्यामागे अदृश्य हात, भाजपाच्या माधव भांडारींचा आरोप

मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…

2 hours ago

Benefits Of Watermelon : कलिंगड खा अन् हायड्रेट राहा!

ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…

2 hours ago