Assembly election 2024: मविआला विरोधी पक्षनेते पदही नाही

मुंबई: विधानसभा निवडणुकीत(Assembly election 2024) महायुतीचा अभूतपूर्व आणि निर्विवाद एकतर्फी विजय झाला. महायुतीला २३६ जागा मिळाल्या. तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांची धुळधाण झाली. मविआला केवळ ४९ जागांवर समाधान मानावे लागणार आहे. यामध्ये ठाकरे गटाला २०, काँग्रेसला १५ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला १० आणि मित्रपक्षाला चार जागाच जिंकता आल्या.


महाविकास आघाडीच्या या अपयशामुळे शरद पवार, संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी यांची पुढील राज्यसभेचा कार्यकाळ देखील मिळणार नाही. महाराष्ट्रातून राज्यसभेत जाण्यासाठी सामान्यपणे ४३ चा कोटा निर्धारित होतो. त्यानुसार महाविकास आघाडीत तेही एका नावावर सहमती झाल्यास केवळ एक राज्यसभा सदस्य निवडून आणता येईल असं समोर आलं आहे.


शरद पवारांच्या जागेवरही राष्ट्रवादीला राज्यसभेवर कुणाला पाठवता येणार नाही. शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस या तीनही पक्षांना एकत्रित मिळून एकच खासदार निवडून देता येणार आहे. त्यामुळे यंदा विधानसभेत विरोधी पक्षनेता तर नसेलच, पण आता मविआचे (इंडी आघाडी) राज्यसभेतील संख्याबळही कमी होणार आहे.


राज्यात विरोधी पक्षनेते पदासाठी आवश्यक २८+१ = २९ सदस्यांची संख्या सध्या कोणत्याच विरोधी पक्षाकडे नाही. सत्ता स्थापन करताना एकत्रित येऊन संख्याबळ सादर कराव लागतं. मात्र पक्षनेता निवडताना किमान एका पक्षाकडे २९ सदस्य असणं गरजेचं आहे. सध्या विरोधी पक्षातील कोणताच पक्ष अपेक्षित संख्याबळ गाठत नाही.

Comments
Add Comment

Dhule News : शिरपूर-चोपडा मार्गावर भीषण अपघात; दोन जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू

Dhule News : धुळे जिल्ह्यातुन एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील शिरपूर-चोपडा मार्गावर झालेल्या भीषण अपघातात

Tiranga Rally : भाजप प्रत्येक जिल्ह्यात काढणार 'तिरंगा रॅली'

- ९ ते १७ ऑगस्टदरम्यान आयोजन; १० ऑगस्टला मुंबईत २५ हजार तरुणांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी होणार मुंबई :

Rickshaw-Taxi Driver : 15 ऑगस्टनंतर 'या' रिक्षा-टॅक्सी चालकांवर कारवाईची शक्यता; मुदतवाढ मिळणार नाही

मुंबई : राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचे मूलभूत ज्ञान अनिवार्य करण्याच्या निर्णयाची

Ahilyanagar : शेततळ्यात बुडून दोन शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू; परिसरात हळहळ

Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात एक मन हेलावणारी घटना घडली आहे. कोपरगाव तालुक्यातील बाहदराबाद

Pune News : हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक 100 हून अधिक NSG कमांडो, नेमकं काय आहे प्रकरण?

पुणे : पुण्यातील हिंजवडी आयटी (IT Park) पार्कमध्ये बुधवारी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त आणि नॅशनल सिक्युरिटी

Agriculture Department : कृषी निविष्ठा घोटाळ्याप्रकरणी १५ अधिकाऱ्यांचे निलंबन

- कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा दणका; विभागीय चौकशीचे आदेश मुंबई : धाराशिव जिल्ह्यातील कृषी विभागात राष्ट्रीय