Mumabi-Pune Express Way: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वारजे पुलाजवळ गॅस टँकर पलटी; साताऱ्याच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प

  77

पुणे: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वारजे पुलाजवळ चर्चच्या बाजूला आज सकाळी गॅस टँकर पलटी झाल्याची दुर्घटना घडली. मुंबईहून साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या या टँकरला अचानक तोल गमावल्यामुळे हा अपघात घडला. अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली असून वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.



अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा घटनास्थळी पोहोचली. गॅस टँकरमधून गळती होण्याचा धोका असल्यामुळे सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत. अपघातस्थळी विशेष टीम पाठवून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.अपघातामुळे मुंबईकडून साताऱ्याच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यामुळे अनेक प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. वारजे पुलाजवळून पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली असून, वाहनचालकांना पोलीस सूचना देत आहेत.
Comments
Add Comment

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

ST : राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर (भंगार केंद्र) एसटीच्या जागेवर उभारले जाणार, 'एसटी'साठी उत्पन्नाचा नवा स्त्रोत...

मुंबई : एसटी विभागीतल जुनी वाहने  स्क्रॅप करून त्याचे सुटे भाग पुन्हा वापरात येणार नाहीत, अशा पद्धतीने त्यांची

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या