Assembly Election Result : जिंकणार कोण? सर्वांनीच बुडवले पाण्यात देव!

महायुती-मविआ अलर्ट! गुप्त बैठका वाढल्या, हॉटेलही बूक झाले, पुढे काय?


मुंबई : विधानसभा निवडणुकीचे (Assembly Election 2024) मतदान (Voting) पार पडले असून निकाल लागण्यास काही तास शिल्लक राहिले आहेत. मतदान सुरळीतपणे पार पडल्यानंतर मतमोजणीही सुरळीतपणे पार पडण्यासाठी निवडणूक आयोग (Election Commision) व महापालिकेने (Municipality) चोख नियोजन केले आहे. तसेच निकालाआधीच अनेक विभागाकडून एक्झिट पोल (Exit Poll) जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये काही विभागाने महायुती (Mahayuti) तर काही संस्थांनी मविआचं (Maha Vikas Aghadi) सरकार येईल असा अंदाज व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही गट अलर्ट मोडवर आले आहेत.



एक्झिट पोलनुसार दाखवल्या जाणाऱ्या मतदानाची टक्केवारी पाहता ऐनवेळी कसलीही बंडखोरी होऊ नये याची पुरेपुर काळजी दोन्ही आघाडीतील नेते मंडळींकडून केली जात आहे. निकालादरम्यान, दगाफटका होऊ नये यासाठी राजकीय पक्षांकडून खास विमाने आणि हॉटेल्स बुक करण्यात आली आहेत.



काँग्रेसकडून विशेष विमानाची व्यवस्था


वाढत्या मतदारांनी टक्केवारी पाहता काँग्रेसकडून (Congress) विशेष विमानाची व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच जर काठावरचं बहुमत मिळाल्यास सत्तास्थापनेसाठी प्लॅन बी तयार करण्यात येत आहे.


त्याचबरोबर निकालाच्या दुसऱ्याच दिवशी आमदारांना मुंबईत बोलावण्यात आले आहे. तसेच विजयी झालेले बंडखोर आणि अपक्ष आमदारांना मुंबईत आणण्यासाठी या मंडळींची राहण्याची व्यवस्था फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये करण्यात आली आहे.


दरम्यान, भाजपाने (BJP) सॉफीटेल हॉटेल तर ठाकरे गटाने (UBT Group) ग्रँड हयात हॉटेलमधील खोल्या बुक केल्याची माहिती मिळाली आहे. अपक्ष आमदारांना आपल्याकडे घेण्यासाठी त्या त्या विभागातील मोठ्या नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच वरिष्ठ नेते मंडळींच्या एका मागोमाग एक बैठका सुरू झाल्या आहेत. त्यामुळे उद्या विधानसभा निकालाचे वातावरणात काय रंगणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Comments
Add Comment

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात

संक्रांतीच्या उत्सवाला गालबोट; अहिल्यानगर जिल्ह्यात पतंग उडवताना चिमुकल्याचा....

अहिल्यानगर : मकर संक्रांतीच्या दिवशी आनंद आणि उत्साहाचं वातावरण असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यात एक हृदयद्रावक

मराठी भाषेबाबतचा भाजपाचा दृष्टीकोन व्यापक -प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

विरोधकांची मराठी भाषेबाबतची भूमिका नकारात्मक मुंबई :  भाजपाचे मराठी म्हणजे मराठी व्याकरणातल्या अनेकवचन

ताम्हिणी घाटातील सिक्रेट पॉईंटवर खून आरोपी २४ तासात पोलिसांच्या ताब्यात

माणगाव : ताम्हिणी घाटात सणसवाडी बेडगाव हद्दीत सिक्रेट पॉइंटकडे जाणाऱ्या रस्त्याशेजारी अनोळखी इसमाचा मृतदेह