Assembly Election Result : जिंकणार कोण? सर्वांनीच बुडवले पाण्यात देव!

महायुती-मविआ अलर्ट! गुप्त बैठका वाढल्या, हॉटेलही बूक झाले, पुढे काय?


मुंबई : विधानसभा निवडणुकीचे (Assembly Election 2024) मतदान (Voting) पार पडले असून निकाल लागण्यास काही तास शिल्लक राहिले आहेत. मतदान सुरळीतपणे पार पडल्यानंतर मतमोजणीही सुरळीतपणे पार पडण्यासाठी निवडणूक आयोग (Election Commision) व महापालिकेने (Municipality) चोख नियोजन केले आहे. तसेच निकालाआधीच अनेक विभागाकडून एक्झिट पोल (Exit Poll) जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये काही विभागाने महायुती (Mahayuti) तर काही संस्थांनी मविआचं (Maha Vikas Aghadi) सरकार येईल असा अंदाज व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही गट अलर्ट मोडवर आले आहेत.



एक्झिट पोलनुसार दाखवल्या जाणाऱ्या मतदानाची टक्केवारी पाहता ऐनवेळी कसलीही बंडखोरी होऊ नये याची पुरेपुर काळजी दोन्ही आघाडीतील नेते मंडळींकडून केली जात आहे. निकालादरम्यान, दगाफटका होऊ नये यासाठी राजकीय पक्षांकडून खास विमाने आणि हॉटेल्स बुक करण्यात आली आहेत.



काँग्रेसकडून विशेष विमानाची व्यवस्था


वाढत्या मतदारांनी टक्केवारी पाहता काँग्रेसकडून (Congress) विशेष विमानाची व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच जर काठावरचं बहुमत मिळाल्यास सत्तास्थापनेसाठी प्लॅन बी तयार करण्यात येत आहे.


त्याचबरोबर निकालाच्या दुसऱ्याच दिवशी आमदारांना मुंबईत बोलावण्यात आले आहे. तसेच विजयी झालेले बंडखोर आणि अपक्ष आमदारांना मुंबईत आणण्यासाठी या मंडळींची राहण्याची व्यवस्था फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये करण्यात आली आहे.


दरम्यान, भाजपाने (BJP) सॉफीटेल हॉटेल तर ठाकरे गटाने (UBT Group) ग्रँड हयात हॉटेलमधील खोल्या बुक केल्याची माहिती मिळाली आहे. अपक्ष आमदारांना आपल्याकडे घेण्यासाठी त्या त्या विभागातील मोठ्या नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच वरिष्ठ नेते मंडळींच्या एका मागोमाग एक बैठका सुरू झाल्या आहेत. त्यामुळे उद्या विधानसभा निकालाचे वातावरणात काय रंगणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Comments
Add Comment

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद