Assembly Election Result : जिंकणार कोण? सर्वांनीच बुडवले पाण्यात देव!

महायुती-मविआ अलर्ट! गुप्त बैठका वाढल्या, हॉटेलही बूक झाले, पुढे काय?


मुंबई : विधानसभा निवडणुकीचे (Assembly Election 2024) मतदान (Voting) पार पडले असून निकाल लागण्यास काही तास शिल्लक राहिले आहेत. मतदान सुरळीतपणे पार पडल्यानंतर मतमोजणीही सुरळीतपणे पार पडण्यासाठी निवडणूक आयोग (Election Commision) व महापालिकेने (Municipality) चोख नियोजन केले आहे. तसेच निकालाआधीच अनेक विभागाकडून एक्झिट पोल (Exit Poll) जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये काही विभागाने महायुती (Mahayuti) तर काही संस्थांनी मविआचं (Maha Vikas Aghadi) सरकार येईल असा अंदाज व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही गट अलर्ट मोडवर आले आहेत.



एक्झिट पोलनुसार दाखवल्या जाणाऱ्या मतदानाची टक्केवारी पाहता ऐनवेळी कसलीही बंडखोरी होऊ नये याची पुरेपुर काळजी दोन्ही आघाडीतील नेते मंडळींकडून केली जात आहे. निकालादरम्यान, दगाफटका होऊ नये यासाठी राजकीय पक्षांकडून खास विमाने आणि हॉटेल्स बुक करण्यात आली आहेत.



काँग्रेसकडून विशेष विमानाची व्यवस्था


वाढत्या मतदारांनी टक्केवारी पाहता काँग्रेसकडून (Congress) विशेष विमानाची व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच जर काठावरचं बहुमत मिळाल्यास सत्तास्थापनेसाठी प्लॅन बी तयार करण्यात येत आहे.


त्याचबरोबर निकालाच्या दुसऱ्याच दिवशी आमदारांना मुंबईत बोलावण्यात आले आहे. तसेच विजयी झालेले बंडखोर आणि अपक्ष आमदारांना मुंबईत आणण्यासाठी या मंडळींची राहण्याची व्यवस्था फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये करण्यात आली आहे.


दरम्यान, भाजपाने (BJP) सॉफीटेल हॉटेल तर ठाकरे गटाने (UBT Group) ग्रँड हयात हॉटेलमधील खोल्या बुक केल्याची माहिती मिळाली आहे. अपक्ष आमदारांना आपल्याकडे घेण्यासाठी त्या त्या विभागातील मोठ्या नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच वरिष्ठ नेते मंडळींच्या एका मागोमाग एक बैठका सुरू झाल्या आहेत. त्यामुळे उद्या विधानसभा निकालाचे वातावरणात काय रंगणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Comments
Add Comment

नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेला इन्क्यूबेशन सेंटर म्हणून मान्यता

मुंबई: विदर्भातील नवउद्योग (स्टार्टअप) परिसंस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत,

नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; कृषीमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून, नमो

‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक’ विधानपरिषदेत मंजूर

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून चर्चेत असलेले आणि अत्यंत कडक तरतुदी असलेले ‘महाराष्ट्र

सिंधुदुर्गच्या विकासाला बुस्टर; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १०० टक्के 'व्हिजीएफ'ला मंजुरी

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला आणि अर्थव्यवस्थेला मोठी गती देणारा निर्णय मंगळवारी राज्य

नंदूरबार,छत्रपती संभाजीनगरमधील गैरव्यवहारासाठी 'एसआयटी स्थापन; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधान परिषदेत घोषणा

​मुंबई: नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर येथील भूसंपादन गैरव्यवहार आणि छत्रपती संभाजीनगरमधील ब्रिजवाडी येथील ५४

रब्बी हंगामातील 'ई-पीक पाहणी'ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

- ४५ टक्के शेतकरी अजूनही प्रक्रियेबाहेर; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील रब्बी