Plan B : बंडखोर, अपक्षांवर भाजपाची नजर; 'प्लान बी'साठी फडणवीसांचे ६ शिलेदार सक्रिय

मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी (दि. २३ नोव्हेंबर) जाहीर होईल. गेल्या पाच वर्षांत राज्यात घडलेल्या अभूतपूर्व घडामोडी पाहता यंदा मतदारराजा कोणाला कौल देणार याबद्दल उत्सुकता आहे. निकालाला अवघे काही तास राहिलेले आहेत. बहुतांश एक्झिट पोल्सनी राज्यात महायुतीचेच सरकार कायम राहील, असा कौल दिला आहे. पण तरीही महायुती बहुमतापासून दूर राहिल्यास भाजपाने 'प्लान बी' (Plan B) रेडी केला आहे. अपक्ष आणि बंडखोरांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी भाजपाच्या राज्य नेतृत्त्वाने सहा नेत्यांवर दिली आहे. विशेष म्हणजे यातल्या निम्म्या नेत्यांनी एकनाथ शिंदेंच्या बंडात महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे.


महायुती आणि महाविकास आघाडीत तीन प्रमुख पक्ष असल्याने यंदा इच्छुकांचा आकडा मोठा होता. त्यामुळे अनेक ठिकाणी बंडखोरी झाली. काही ठिकाणी बंडखोरांमुळे अधिकृत उमेदवार पराभूत होण्याची शक्यता आहेत. काही बंडखोर तगडे असल्याने विशिष्टपूर्ण परिस्थितीत त्यांच्या विजयाची शक्यता वाढलेली आहे. अशा बंडखोरांवर आणि विजयाची शक्यता अधिक असलेल्या अपक्षांसाठी भाजपाने मोठी फिल्डींग लावली आहे.



सरकार स्थापनेसाठी फडणवीसांची जोरदार फिल्डींग


विजयाची शक्यता अधिक असलेल्या अपक्ष आणि बंडखोरांशी संपर्क ठेवण्याची जबाबदारी भाजपाच्या नेत्यांवर आहे. मंत्री रविंद्र चव्हाण, विधान परिषदेतील गटनेते प्रविण दरेकर, आमदार संजय कुटे, नितेश राणे, निरंजन डावखरे, मोहित कंबोज यांना अपक्ष, बंडखोरांवर करडी नजर ठेवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. हे सगळेच नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आणि निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे सरकार स्थापनेसाठी फडणवीस जोरदार फिल्डींग लावताना दिसत आहेत.


बंडखोर, अपक्षांवर करडी नजर ठेवण्यासाठी निवडण्यात आलेल्या सहा नेत्यांपैकी तिघांनी अडीच वर्षांपूर्वी एकनाथ शिंदेंच्या बंडात महत्त्वाची भूमिका बजावली होती. विधान परिषदेची निवडणूक झाल्यानंतर शिंदेंसह अनेक आमदार सूरतच्या दिशेनं रवाना झाले. ते सूरतमध्ये असताना आमदार संजय कुटे, रविंद्र चव्हाण, मोहित कंबोज यांनी त्यांची भेट घेत यशस्वी बोलणी केली होती. आता याच नेत्यांकडे भाजपाने पुन्हा एकदा सत्तेसाठी जुळवाजुळव करण्याची जबाबदारी दिली आहे.

Comments
Add Comment

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार

Rajya Sabha Election 2026: राज्यसभा निवडणुकीचा अर्ज भरायला फक्त सहा दिवस उरले, शरद पवार राज्यसभा लढवणार की नाही?

मुंबई: येत्या १६ मार्चला राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ३७ जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील

Maharashtra Village: राज्य सरकारकडून सहा ग्रामपंचायतींचा सन्मान केला जाणार; कोकणातील 'हे' गाव पहिल्या क्रमांकावर

मुंबई: गावाचा विकास हाच देशाचा विकास असं म्हटलं जातं. सध्या आपल्या देश लोकल ते ग्लोबल अशा मार्गाने काम करीत आहे.

Thane: ठाण्यात खळबळ, वेब सिरिज अभिनेत्रीच्या देहविक्रीचा व्यवसाय; पोलिसांकडून रॅकेटचा भांडाफोड

ठाणे: सिने इंडस्ट्रीत काम मिळत नसल्याकारणाने एका हिंदी वेब सिरीजमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीने पैसे

Vidarbha Railway: गोंदिया ते जबलपूर रेल्वे प्रकल्पाला केंद्र सरकारची मंजुरी

मुंबई: गोंदिया ते जबलपूर रेल्वे प्रवासाचा चेहरामोहरा बदलणार असून या मार्गाच्या दुहेरीकरणाला अखेर केंद्र