Jalgaon Accident : मतदानाची ड्युटी शेवटची ठरली! इलेक्शन कामातून परतताना शिक्षकाचा मृत्यू

जळगाव : काल राज्यभरात विधानसभा निवडणुकीचे (Assembly Election 2024) मतदान (Voting) पार पडले. अशावेळी प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षक इलेक्शन ड्यूटीमध्ये (Election Duty) व्यस्त असतात. मात्र त्याचदरम्यान जळगाव जिल्ह्यात (Jalgaon) एक दुर्दैवी घटना घडली आहे. जळगाव जिल्ह्यात मतदान कर्तव्यावर असलेल्या एका शिक्षकाचा इलेक्शन ड्यूटीहून परतताना भीषण अपघात (Jalgaon Accident) झाला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला असून परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मीकांत वासुदेव पाटील (४९) उपशिक्षक अनवर्दे बुधगांव हे इलेक्शन ड्यूटीवरुन त्यांच्या बभळाज तालुका शिरपूर मूळगावी जात होते. मात्र यादरम्यान सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास त्यांच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला. घटनेनंतर स्थानिकांनी त्यांना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.


दरम्यान, लक्ष्मीकांत पाटील यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून घटनेची माहिती मिळताच जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

Thane-CSMT : ठाणे ते सीएसएमटी प्रवास सुसाट! १५० कोटींच्या नव्या समांतर पुलामुळे 'शीव'ची कोंडी फुटणार; मार्ग कसा असेल?

मुंबई : मुंबईतील सर्वात गजबजलेल्या आणि वाहतूककोंडीसाठी ओळखल्या जाणाऱ्या शीव (Sion) परिसरातील प्रवाशांसाठी एक

Special Trains :नांदेडसाठी विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा; दिल्ली, मुंबई आणि चंदीगडवरून धावणार विशेष गाड्या

‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे २४ आणि २५

पुण्यात डिजिटल अरेस्टची धमकी देत, ज्येष्ठ नागरिकाची कोटींची फसवणूक

पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये सायबर गुन्हेगारांनी ‘डिजिटल अरेस्ट’चा धाक दाखवत एका ज्येष्ठ नागरिकाला कोट्यवधींचा

नाशिक महापौरपदासाठी राजकीय हालचालींना वेग; भाजपमधील तीन प्रभावी चेहरे चर्चेत

नाशिक : महानगरपालिका निवडणुकीनंतर नाशिकच्या सत्तावर्तुळात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. स्पष्ट संख्याबळासह

Amrit Bharat Express Train Routes : मुंबईकरांची चांदी! 'अमृत भारत एक्सप्रेस'ने लांब पल्ल्याचा प्रवास होणार स्वस्त; जाणून घ्या कुठे-कुठे थांबणार गाडी?

मुंबई : भारतीय रेल्वेने सर्वसामान्यांच्या प्रवासासाठी सुरू केलेल्या 'अमृत भारत एक्सप्रेस' ताफ्यात आता आणखी ९

Ashish Jaiswal : आमदार आशिष जयस्वाल यांच्या पाठपुराव्याला यश; प्रकल्पबाधित तरुण दिनेश हावरे यांचा पोलीस सेवेतील मार्ग मोकळा!

सातारा : नियम आणि प्रशासकीय तांत्रिकतेच्या कचाट्यात अडकलेल्या एका होतकरू तरुणाच्या आयुष्यात अखेर आशेचा नवा