Jalgaon Accident : मतदानाची ड्युटी शेवटची ठरली! इलेक्शन कामातून परतताना शिक्षकाचा मृत्यू

जळगाव : काल राज्यभरात विधानसभा निवडणुकीचे (Assembly Election 2024) मतदान (Voting) पार पडले. अशावेळी प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षक इलेक्शन ड्यूटीमध्ये (Election Duty) व्यस्त असतात. मात्र त्याचदरम्यान जळगाव जिल्ह्यात (Jalgaon) एक दुर्दैवी घटना घडली आहे. जळगाव जिल्ह्यात मतदान कर्तव्यावर असलेल्या एका शिक्षकाचा इलेक्शन ड्यूटीहून परतताना भीषण अपघात (Jalgaon Accident) झाला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला असून परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मीकांत वासुदेव पाटील (४९) उपशिक्षक अनवर्दे बुधगांव हे इलेक्शन ड्यूटीवरुन त्यांच्या बभळाज तालुका शिरपूर मूळगावी जात होते. मात्र यादरम्यान सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास त्यांच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला. घटनेनंतर स्थानिकांनी त्यांना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.


दरम्यान, लक्ष्मीकांत पाटील यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून घटनेची माहिती मिळताच जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

Weather Update : हवामानाचा ‘डबल अटॅक’! मुंबईत उकाड्याचा कहर तर विदर्भात वादळी पावसाचा इशारा

मुंबई : राज्यात हवामानाने अचानक कोंडी केली असून एका बाजूला मुंबई (Mumbai) मध्ये उकाड्याने अक्षरशः घामाच्या धारा सुरू

Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणाला वेग; एसआयटीकडून पुन्हा कार्यालयाची झडती

नाशिक : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात तपास यंत्रणांनी पुन्हा एकदा हालचालींना वेग दिला आहे. शुक्रवारी (२७ मार्च)

CM Devendra Fadnavis : राज्यात पीएनजीला वेग, खतसाठ्यावर सतत नजर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : जागतिक संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताने संतुलित आणि प्रभावी धोरण अवलंबले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी

कुंभपूर्व विकास कामांना गती; मंत्री गिरीश महाजन यांची अचानक पाहणी

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात सुरू असलेल्या विकास कामांना गती देण्यात आली

सिंहस्थापूर्वी कुशावर्त कुंडासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प

नाशिक : त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त कुंड येथे सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर

राज्यात लॉकडाऊन अजिबात लागणार नाही - मुख्यमंत्री फडणवीस

- अफवा पसरवणाऱ्यांना फौजदारी कारवाईला सामोरं जावं लागेल युद्धाच्या पार्श्वभूमीवर राज्यात इंधन आणि गॅसचा