Jalgaon Accident : मतदानाची ड्युटी शेवटची ठरली! इलेक्शन कामातून परतताना शिक्षकाचा मृत्यू

  136

जळगाव : काल राज्यभरात विधानसभा निवडणुकीचे (Assembly Election 2024) मतदान (Voting) पार पडले. अशावेळी प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षक इलेक्शन ड्यूटीमध्ये (Election Duty) व्यस्त असतात. मात्र त्याचदरम्यान जळगाव जिल्ह्यात (Jalgaon) एक दुर्दैवी घटना घडली आहे. जळगाव जिल्ह्यात मतदान कर्तव्यावर असलेल्या एका शिक्षकाचा इलेक्शन ड्यूटीहून परतताना भीषण अपघात (Jalgaon Accident) झाला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला असून परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मीकांत वासुदेव पाटील (४९) उपशिक्षक अनवर्दे बुधगांव हे इलेक्शन ड्यूटीवरुन त्यांच्या बभळाज तालुका शिरपूर मूळगावी जात होते. मात्र यादरम्यान सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास त्यांच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला. घटनेनंतर स्थानिकांनी त्यांना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.


दरम्यान, लक्ष्मीकांत पाटील यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून घटनेची माहिती मिळताच जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक