UP Accident : उत्तर प्रदेशात ट्रक अन् खासगी बसची जोरदार धडक; अपघातात ५ जणांचा मृत्यू, १५ जण जखमी!

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील (UP News) अलीगढमध्ये यमुना एक्सप्रेस वेवर भीषण अपघात (UP Accident) घडल्याची बातमी समोर आली आहे. एका खासगी डबल डेकर बस आणि ट्रकची जोरदार धडक झाल्याने भीषण अपघात घडला. यामध्ये ५ जणांचा जागीच मृत्यू झाला असून १५ जण जखमी झाले आहेत.



मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील अलीगढमध्ये यमुना एक्सप्रेस वेवर (Yamuna Express Way) मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. दिल्लीहून आजमगढला जाणाऱ्या एका डबल डेकर बसने ट्रकला मागून धडक दिली. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची शक्यत वर्तवण्यात येत आहे. तर प्रवाशांनी चालक नशेत होता असेही म्हटले आहे. मात्र त्यावर जखमी कंडक्टरने चालक नशेत नव्हता असा दावा केला आहे.



जखमींची माहिती


अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये पाच महिन्याचे बाळ, एक महिला आणि तीन पुरुष यांचा समावेश आहे. तर जखमींमध्ये ११ महिन्यांची चिमुकली, एक लहान मुलगी, पाच वर्षांचा मुलगा, तीन महिला आणि ९ पुरुष आहेत. दरम्यान, स्थानिक पोलिसांनी रेस्क्यू करत सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं.



मुख्यमंत्री योगींनी दिल्या सूचना


अलिगढ दुर्घटनेची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी दखल घेतली असून शोक व्यक्त केला आहे. तसेच जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर योग्य उपचार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यासोबतच जखमींच्या लवकरात लवकर बरे व्हावी अशा आशा व्यक्त केली आहे. (UP Accident)

Comments
Add Comment

Supreme Court : चालण्याचा हक्क हा मूलभूत अधिकार- सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने एका ऐतिहासिक निर्णयात चालण्याचा हक्क हा संविधानातील मूलभूत अधिकार असल्याचे

Ban on Telegram : टेलिग्रामवरील बंदी २२ जूनपर्यंत कायम

नवी दिल्ली: इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म 'टेलिग्राम'ला दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. केंद्र

Swiss Bank : स्विस बँकांमधील भारतीयांचा निधी घटला, वैयक्तिक खात्यांतील ठेवींमध्ये वाढ

नवी दिल्ली : स्विस बँकांमध्ये भारतीयांनी ठेवलेल्या कथित काळ्या धनाबाबत सातत्याने चर्चा होत असताना,

Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या हस्ते PMVBRY लाभ वितरण कार्यक्रम; २,४०० कोटी रुपयांचे लाभ वितरित

नवी दिल्ली : रोजगार निर्मितीला चालना देणे आणि सामाजिक सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने केंद्र

Narendra Modi : दहशतवाद आणि सिंधू जल करार एकत्र शक्य नाही, भारताने पाकिस्तानला सुनावले

नवी दिल्ली : भारताने संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत (यूएनएचआरसी) पाकिस्तानला जोरदार फटकारले आहे. भारताने

EPFO : आता एटीएम आणि यूपीआयद्वारे काढता येणार पीएफचे पैसे; लवकरच सुविधा होणार सुरू

Navi Delhi : नोकरदारांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. आता पीएफ (PF) खात्यातील पैसे काढण्यासाठी