Maharashtra Assembly Election: बारामतीत अजित पवार यांनी पत्नीसह केले मतदान

पुणे: राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघासाठी(Maharashtra Assembly Election) आज एकाच टप्प्यात मतदान होत आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. राज्यातील अनेक नेत्यांची प्रतिष्ठा यंदाच्या निवडणुकीत पणाला लागली आहे. मतदानाच्या आधीच सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचार केला होता.


यंदाच्या निवडणुकीत सर्वाधिक मुद्दा रंगला होता तो बारामतीच्या अजित पवार यांचा. त्यामुळे बारामतीच्या या जागेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा शरद पवार यांच्याशिवाय अजित पवार हे निवडणूक लढवत आहे.


 

या निवडणुकीसाठी अजित पवार यांनी सकाळीच मतदान केंद्रावर जात मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी सुनेत्रा यांनीही मतदान केले. दरम्यान, ही निवडणूक आपल्याला विकासाच्या मुद्द्यावर लढायची होती. जे काही आरोप झाले त्यांची चौकशी केली जाईल असे यावेळी अजित पवार म्हणाले.


बारामतीमधून महायुतीमधून अजित पवार घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्याविरोधात शरद पवारांकडून युगेंद्र पवार यांना तिकीट देण्यात आली आहे. त्यामुळे बारामतीमधून अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत पाहायला मिळू शकते.

Comments
Add Comment

"शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचेपर्यंत आमचा प्रयत्न सुरूच राहील" : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दुष्काळमुक्तच नाही तर, हरित माणदेशाच्या दिशेने मार्गक्रमण! सातारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज फलटण,

पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रेला प्रारंभ, २४ तास दर्शनाची सुविधा!

पंढरपूर : पंढरपूरमध्ये विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भक्तीच्या

नातेवाईकांना भेटण्यासाठी गेलेले मराठवाड्याचे प्राध्यापक येताना पत्नीसह भीषण अपघात दगावले...

पुणे : छत्रपती संभाजीनगरातील पडेगाव परिसरात शनिवारी सायंकाळी घडलेल्या भीषण अपघातात विद्यापीठाचे निवृत्त

पिंपरीत भाजप स्वबळावर लढणार

भाजप-अजित पवार गट आमने-सामने पिंपरी : महायुती सरकारमध्ये सहभागी असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे

डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांचा फलटण दौरा

सातारा: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत दोन आरोपींना अटक झाली आहे.

रिद्धपूर येथे जागतिक कीर्तीचे विद्यापीठ साकारणार: फडणवीस

नाशिक : रिद्धपूर या तीर्थक्षेत्राने मराठी भाषा जीवंत ठेवण्याचे काम केले असून तेथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन