Maharashtra Assembly Election: बारामतीत अजित पवार यांनी पत्नीसह केले मतदान

पुणे: राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघासाठी(Maharashtra Assembly Election) आज एकाच टप्प्यात मतदान होत आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. राज्यातील अनेक नेत्यांची प्रतिष्ठा यंदाच्या निवडणुकीत पणाला लागली आहे. मतदानाच्या आधीच सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचार केला होता.


यंदाच्या निवडणुकीत सर्वाधिक मुद्दा रंगला होता तो बारामतीच्या अजित पवार यांचा. त्यामुळे बारामतीच्या या जागेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा शरद पवार यांच्याशिवाय अजित पवार हे निवडणूक लढवत आहे.


 

या निवडणुकीसाठी अजित पवार यांनी सकाळीच मतदान केंद्रावर जात मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी सुनेत्रा यांनीही मतदान केले. दरम्यान, ही निवडणूक आपल्याला विकासाच्या मुद्द्यावर लढायची होती. जे काही आरोप झाले त्यांची चौकशी केली जाईल असे यावेळी अजित पवार म्हणाले.


बारामतीमधून महायुतीमधून अजित पवार घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्याविरोधात शरद पवारांकडून युगेंद्र पवार यांना तिकीट देण्यात आली आहे. त्यामुळे बारामतीमधून अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत पाहायला मिळू शकते.

Comments
Add Comment

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी

कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या