Maharashtra Assembly Election: बारामतीत अजित पवार यांनी पत्नीसह केले मतदान

  34

पुणे: राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघासाठी(Maharashtra Assembly Election) आज एकाच टप्प्यात मतदान होत आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. राज्यातील अनेक नेत्यांची प्रतिष्ठा यंदाच्या निवडणुकीत पणाला लागली आहे. मतदानाच्या आधीच सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचार केला होता.


यंदाच्या निवडणुकीत सर्वाधिक मुद्दा रंगला होता तो बारामतीच्या अजित पवार यांचा. त्यामुळे बारामतीच्या या जागेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा शरद पवार यांच्याशिवाय अजित पवार हे निवडणूक लढवत आहे.


 

या निवडणुकीसाठी अजित पवार यांनी सकाळीच मतदान केंद्रावर जात मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी सुनेत्रा यांनीही मतदान केले. दरम्यान, ही निवडणूक आपल्याला विकासाच्या मुद्द्यावर लढायची होती. जे काही आरोप झाले त्यांची चौकशी केली जाईल असे यावेळी अजित पवार म्हणाले.


बारामतीमधून महायुतीमधून अजित पवार घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्याविरोधात शरद पवारांकडून युगेंद्र पवार यांना तिकीट देण्यात आली आहे. त्यामुळे बारामतीमधून अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत पाहायला मिळू शकते.

Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक