Assembly election: राज्यात २८८ विधानसभा जागांसाठी मतदानाला सुरूवात, झारखंडमध्येही दुसऱ्या टप्प्यात मतदान

मुंबई: महाराष्ट्रात विधानसभेच्या(Assembly election) २८८ जागांसाठी मतदानाला सुरूवात झाली आहे. राज्यातील अनेक दिग्गज नेते जसे शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दुसरीकडे झारखंडमध्येही दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली आहे. येथे सामना सत्तारूढ असलेल्या इंडिया ब्लॉक आणि एनडीए यांच्यात आहे. झारखंडमध्ये आज एकूण ८१ विधानसभेच्या जागांपैकी ३८वर मतदान होत आहे. निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबरला जाहीर होईल.



मोहन भागवत, राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांचे मतदान


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी नागपूरमध्ये मतदान केंद्रावर जात मतदान केले. तर राज्याचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी कुलाबा विधानसभा क्षेत्रातील मुंबईच्या राजभवन स्थित केंद्रावर आपले मतदान केले. येथून भाजपाकडून राहुल नार्वेकर यांना मैदानात उतरवण्यात आले आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेसने हीरा देवासी यांना उतरवले आहे.


 


राज्यात सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. राज्यातील २८८ जागांसाठी एकाच वेळी मतदान होत आहे. विधानसभेच्या २८८ जागांवर अपक्षांसह विविध पक्षांचे एकूण चार हजार १३६ उमेदवार रिंगणात आहेत. राज्यातील ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदार या उमेदवारांच्या भाग्याचा फैसला करणार आहेत.



मुंबईकर निवडणार ३६ आमदार


मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघांतील एकूण ४२० उमेदवारांमधून आपले ३६ आमदार निवडण्यासाठी आज बुधवारी शहर आणि उपनगरातील एक कोटी दोन लाख २९ हजार ७०८ मतदारांना लोकशाहीच्या उत्सवात सुवर्णसंधी चालून आलेली असताना १० हजार ११७ मतदान केंद्रांवर मतदार राजाचे स्वागत करण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.



२०१९ची निवडणूक


गेल्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती झाली होती. तेव्हा भाजपने १०५, तर शिवसेनेने ५६ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला ४४ तर राष्ट्रवादीला ५४ जागा मिळाल्या होत्या. भाजप-शिवसेना सहज सत्तेवर येऊ शकले असते, पण मुख्यमंत्रिपदावरुन युती तुटली.



झारखंडमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात


झारखंड विधानसभेच्या(Assembly election)  दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली आहे. या टप्प्यात मुख्यमंत्री हेमंत सोरेन, पत्नी कल्पना सोरेन, विरोधीपक्ष नेते अमर कुमार बाऊरी याशिवाय ५००हून अधिक उमेदवारांच्या नशिबाचा फैसला होणार आहे. १४,२१८ मतदान केंद्रांवर सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. संध्याकाळी ५ वाजेपर्यंतं मतदान सुरू राहील.

Comments
Add Comment

TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक बुरखा, दुपट्टा किंवा ओढणीला बंदी नाही- राज्य परीक्षा

Vilas Ghule : विलास घुले हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा सवाल; निष्पक्ष तपासाची मागणी

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले (Vilas Ghule) हत्या प्रकरणावरून (Murder) माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे

Monsoon Update : जून महिन्यात पाऊस पडणार नाही ; या तारखेपासून कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्र : महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. २३ आणि २५ जूनला मुंबईसह इतर शहरात मुसळधार

Ketan Agarwal Murder Case: "म्हणून मी त्याला लोहगडावरून खाली ढकललं..." सियाने पोलिसांसमोर सर्वचं सांगितलं

केतनच्या हत्येमागचं सर्वात भयंकर कारण आलं समोर Ketan Agarwal Murder Case : पुणे : पुण्यातील उद्योगपती केतन अग्रवाल (Ketan Agarwal Murder)

आषाढी वारीसाठी रेल्वेची खास भेट; पंढरपूरसाठी धावणार विशेष गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली

Maharashtra Infrastructure : मुंबई आणि नागपूरसाठी मोठा निर्णय; दोन महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी

राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा