Assembly election: राज्यात २८८ विधानसभा जागांसाठी मतदानाला सुरूवात, झारखंडमध्येही दुसऱ्या टप्प्यात मतदान

  41

मुंबई: महाराष्ट्रात विधानसभेच्या(Assembly election) २८८ जागांसाठी मतदानाला सुरूवात झाली आहे. राज्यातील अनेक दिग्गज नेते जसे शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दुसरीकडे झारखंडमध्येही दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली आहे. येथे सामना सत्तारूढ असलेल्या इंडिया ब्लॉक आणि एनडीए यांच्यात आहे. झारखंडमध्ये आज एकूण ८१ विधानसभेच्या जागांपैकी ३८वर मतदान होत आहे. निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबरला जाहीर होईल.



मोहन भागवत, राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांचे मतदान


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी नागपूरमध्ये मतदान केंद्रावर जात मतदान केले. तर राज्याचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी कुलाबा विधानसभा क्षेत्रातील मुंबईच्या राजभवन स्थित केंद्रावर आपले मतदान केले. येथून भाजपाकडून राहुल नार्वेकर यांना मैदानात उतरवण्यात आले आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेसने हीरा देवासी यांना उतरवले आहे.


 


राज्यात सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. राज्यातील २८८ जागांसाठी एकाच वेळी मतदान होत आहे. विधानसभेच्या २८८ जागांवर अपक्षांसह विविध पक्षांचे एकूण चार हजार १३६ उमेदवार रिंगणात आहेत. राज्यातील ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदार या उमेदवारांच्या भाग्याचा फैसला करणार आहेत.



मुंबईकर निवडणार ३६ आमदार


मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघांतील एकूण ४२० उमेदवारांमधून आपले ३६ आमदार निवडण्यासाठी आज बुधवारी शहर आणि उपनगरातील एक कोटी दोन लाख २९ हजार ७०८ मतदारांना लोकशाहीच्या उत्सवात सुवर्णसंधी चालून आलेली असताना १० हजार ११७ मतदान केंद्रांवर मतदार राजाचे स्वागत करण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.



२०१९ची निवडणूक


गेल्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती झाली होती. तेव्हा भाजपने १०५, तर शिवसेनेने ५६ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला ४४ तर राष्ट्रवादीला ५४ जागा मिळाल्या होत्या. भाजप-शिवसेना सहज सत्तेवर येऊ शकले असते, पण मुख्यमंत्रिपदावरुन युती तुटली.



झारखंडमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात


झारखंड विधानसभेच्या(Assembly election)  दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली आहे. या टप्प्यात मुख्यमंत्री हेमंत सोरेन, पत्नी कल्पना सोरेन, विरोधीपक्ष नेते अमर कुमार बाऊरी याशिवाय ५००हून अधिक उमेदवारांच्या नशिबाचा फैसला होणार आहे. १४,२१८ मतदान केंद्रांवर सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. संध्याकाळी ५ वाजेपर्यंतं मतदान सुरू राहील.

Comments
Add Comment

ST : राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर (भंगार केंद्र) एसटीच्या जागेवर उभारले जाणार, एसटी साठी उत्पन्नाचा नवा स्त्रोत निर्माण करणार...

मुंबई : एसटी विभागीतल जुनी वाहने  स्क्रॅप करून त्याचे सुटे भाग पुन्हा वापरात येणार नाहीत, अशा पद्धतीने त्यांची

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना