Maharashtra Assembly Election: गंगापूर विधानसभेचे अपक्ष उमेदवार सुरेश सोनावणे यांच्या कारवर हल्ला

मुंबई: छत्रपती संभाजीनगर येथील गंगापूर विधानसभा क्षेत्रातील अपक्ष उमेदवार सुरेश सोनावणे यांच्या कारवर दगडफेक झाली. सोमवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. वरिष्ठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संध्याकाळी साडेसात वाजता घडलेल्या या घटनेत सोनावणे यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे.


वाळूज परिसरात लांजी गावाजवळ सोनावणे यांच्या कारवर एक अज्ञात व्यक्तीने दगडफेक केली. त्यांना तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आली. आरोपींना पकडण्यासाठी तीन टीम तयार करण्यात आल्या आहेत.



माजी गृहमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला


याआधी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्या कारवही हल्ला करण्याची घटना समोर आली. कारवर केलेल्या दगडफेकीमुळे अनिल देशमुख जखमी झाले. त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. हा हल्ला कोणी केला याची कोणतीही माहिती मिळालेली नाही.


सोमवारी विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस होता. संध्याकाळी पाच वाजता प्रचार संपल्यानंतर गृहमंत्री अनिल काटोल नागपूर शहरात परतत होते. यावेळी अज्ञातांनी त्यांच्या ताफ्यावर हल्ला केला. अनिल देशमुख मागे बसले होते. यावेळी खिडकीची काच उघडी होती.यामुळे दगड त्यांच्या डोक्यावर लागला.

Comments
Add Comment

नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेला इन्क्यूबेशन सेंटर म्हणून मान्यता

मुंबई: विदर्भातील नवउद्योग (स्टार्टअप) परिसंस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत,

नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; कृषीमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून, नमो

‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक’ विधानपरिषदेत मंजूर

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून चर्चेत असलेले आणि अत्यंत कडक तरतुदी असलेले ‘महाराष्ट्र

सिंधुदुर्गच्या विकासाला बुस्टर; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १०० टक्के 'व्हिजीएफ'ला मंजुरी

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला आणि अर्थव्यवस्थेला मोठी गती देणारा निर्णय मंगळवारी राज्य

नंदूरबार,छत्रपती संभाजीनगरमधील गैरव्यवहारासाठी 'एसआयटी स्थापन; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधान परिषदेत घोषणा

​मुंबई: नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर येथील भूसंपादन गैरव्यवहार आणि छत्रपती संभाजीनगरमधील ब्रिजवाडी येथील ५४

रब्बी हंगामातील 'ई-पीक पाहणी'ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

- ४५ टक्के शेतकरी अजूनही प्रक्रियेबाहेर; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील रब्बी