Maharashtra Assembly Election: गंगापूर विधानसभेचे अपक्ष उमेदवार सुरेश सोनावणे यांच्या कारवर हल्ला

  70

मुंबई: छत्रपती संभाजीनगर येथील गंगापूर विधानसभा क्षेत्रातील अपक्ष उमेदवार सुरेश सोनावणे यांच्या कारवर दगडफेक झाली. सोमवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. वरिष्ठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संध्याकाळी साडेसात वाजता घडलेल्या या घटनेत सोनावणे यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे.


वाळूज परिसरात लांजी गावाजवळ सोनावणे यांच्या कारवर एक अज्ञात व्यक्तीने दगडफेक केली. त्यांना तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आली. आरोपींना पकडण्यासाठी तीन टीम तयार करण्यात आल्या आहेत.



माजी गृहमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला


याआधी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्या कारवही हल्ला करण्याची घटना समोर आली. कारवर केलेल्या दगडफेकीमुळे अनिल देशमुख जखमी झाले. त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. हा हल्ला कोणी केला याची कोणतीही माहिती मिळालेली नाही.


सोमवारी विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस होता. संध्याकाळी पाच वाजता प्रचार संपल्यानंतर गृहमंत्री अनिल काटोल नागपूर शहरात परतत होते. यावेळी अज्ञातांनी त्यांच्या ताफ्यावर हल्ला केला. अनिल देशमुख मागे बसले होते. यावेळी खिडकीची काच उघडी होती.यामुळे दगड त्यांच्या डोक्यावर लागला.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या