Rahul Gandhi: राहुल गांधी हाजीर हो!

दोन डिसेंबरला न्यायालयात हजर रहाण्याचे न्यायालयाचे आदेश


पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी केल्याप्रकरणी सुरू असलेल्या खटल्यात राहुल गांधी यांनी येत्या दोन डिसेंबरला न्यायालयात हजर राहावे, अशा आदेश पुणे येथील प्रथमवर्ग न्यायाधीश अमोल शिंदे यांनी दिला आहे.



काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी लंडन येथील एका कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. याबाबत सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधींविरोधात न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला आहे. या प्रकरणात विशेष न्यायालयाने राहुल गांधी यांना १८ नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याबाबत समन्स बजावले होते. त्यामुळे सुनावणीसाठी राहुल गांधी उपस्थित राहणार का? याबाबत उत्सुकता होती.


या प्रकरणी सुनावणीदरम्यान गांधी यांना पोस्टाद्वारे पाठविलेले समन्स त्यांच्या दिल्लीतील पत्यावर मिळाल्याचे फिर्यादी सावरकर यांच्या वकिलांकडून न्यायालयात सांगण्यात आले. समन्स मिळूनही ते हजर झाले नाहीत. त्यामुळे त्यांना जामीनपात्र वॉरंट काढावे, असा अर्ज फिर्यादीच्या वकिलांनी न्यायालयात दाखल केला.

Comments
Add Comment

TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक बुरखा, दुपट्टा किंवा ओढणीला बंदी नाही- राज्य परीक्षा

Vilas Ghule : विलास घुले हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा सवाल; निष्पक्ष तपासाची मागणी

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले (Vilas Ghule) हत्या प्रकरणावरून (Murder) माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे

Monsoon Update : जून महिन्यात पाऊस पडणार नाही ; या तारखेपासून कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्र : महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. २३ आणि २५ जूनला मुंबईसह इतर शहरात मुसळधार

Ketan Agarwal Murder Case: "म्हणून मी त्याला लोहगडावरून खाली ढकललं..." सियाने पोलिसांसमोर सर्वचं सांगितलं

केतनच्या हत्येमागचं सर्वात भयंकर कारण आलं समोर Ketan Agarwal Murder Case : पुणे : पुण्यातील उद्योगपती केतन अग्रवाल (Ketan Agarwal Murder)

आषाढी वारीसाठी रेल्वेची खास भेट; पंढरपूरसाठी धावणार विशेष गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली

Maharashtra Infrastructure : मुंबई आणि नागपूरसाठी मोठा निर्णय; दोन महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी

राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा