सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट; २१ युझर्स सायबर गस्तीत अडकले

  70

अमरावती: सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट, व्हिडीओ टाकू नये, याबाबत पोलिसांकडून वारंवार आवाहन केले जात आहे. मात्र, तरीही निवडणूक काळात काही युझर्सकडून आक्षेपार्ह पोस्ट, व्हिडीओ सोशल मिडीयावर टाकले जात आहेत. दरम्यान, अशा पोस्ट, व्हिडीओ निदर्शनास येताच त्या काढून टाकणे तसेच संबधितांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून २४ बाय ७ सायबर पेट्रोलींग सुरू आहे. मागील पंधरा दिवसांत शहर पोलिसांच्या सायबर शाखेने अशा २१ युझर्सना नोटीस बजावली असून एकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. विधानसभा निवडणूक अंतिम टप्प्यात पोहचली आहे. आहे. चोवीस तासावर मत्तदान आले आहे. या काळात समाज माध्यमांचा मोठ्या प्रमाणात वापर होणार आहे.



या वेळी काहींकडून आक्षेपार्ह, खोट्या, संभ्रम पसरवणाऱ्या किंवा अफवा पसरवणाऱ्या पोस्ट किंवा व्हिडीओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर टाकल्या जावू शकतात. अशा पोस्टमुळे सर्वसामान्यांमध्ये संभ्रम पसरुन काही घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सायबर पोलिसांकडून सातत्याने सायबर पेट्रोलींग सुरू आहे. यादरम्यान सायबर पोलिस विविध समाजमाध्यमावर वाँच ठेवून आहेत. पोलिसांच्या सायबर पेट्रोलींगमध्ये आक्षेपार्ह काही आढळल्यास पोलिस तत्काळ संबधित पोस्ट काढून टाकतात. तसेच पोस्ट टाकणाऱ्याला नोटीस देवून आयुक्तालयात हजर होण्याबाबत तंबी देतात. अशा प्रकरणात कोणी तक्रार दाखल केल्यास सायबर पोलिस संबंधिताविरुध्द गुन्हासुध्दा दाखल करणार आहेत, असे सायबर पोलिसांकडून सांगण्यात आले.

यासंदर्भात सायबर पोलिस ठाण्याचे अधिकारी अनिकेत कासार यांनी सांगितले की, सोशल मीडियावर कोणीही अफवा पसरवणाऱ्या पोस्ट किंवा व्हिडीओ व्हायरल करु नये. आम्ही चोवीस तास यावर लक्ष ठेवून आहोत. आमच्या तपासणीमध्ये आक्षेपार्ह आढळल्यास संबंधितांविरुध्द कारवाई होणार आहे. सर्व गृप अ‍ॅडमिनने विशेष खबरदारी घ्यावी. तसेच मॅसेज केवळ अ‍ॅडमिन पाठवेल, अशा पद्धतीने सेटींग करुन घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती

Eknath Shinde : लाडक्या बहिणीला 'डेडिकेटेड टू कॉमन मॅन'चा आधार! उपचारासाठी किडनीग्रस्त महिलेला एकनाथ शिंदेंनी केली मदत

जळगाव : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल मुक्ताईनगरला संत मुक्ताबाई पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित