सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट; २१ युझर्स सायबर गस्तीत अडकले

अमरावती: सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट, व्हिडीओ टाकू नये, याबाबत पोलिसांकडून वारंवार आवाहन केले जात आहे. मात्र, तरीही निवडणूक काळात काही युझर्सकडून आक्षेपार्ह पोस्ट, व्हिडीओ सोशल मिडीयावर टाकले जात आहेत. दरम्यान, अशा पोस्ट, व्हिडीओ निदर्शनास येताच त्या काढून टाकणे तसेच संबधितांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून २४ बाय ७ सायबर पेट्रोलींग सुरू आहे. मागील पंधरा दिवसांत शहर पोलिसांच्या सायबर शाखेने अशा २१ युझर्सना नोटीस बजावली असून एकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. विधानसभा निवडणूक अंतिम टप्प्यात पोहचली आहे. आहे. चोवीस तासावर मत्तदान आले आहे. या काळात समाज माध्यमांचा मोठ्या प्रमाणात वापर होणार आहे.



या वेळी काहींकडून आक्षेपार्ह, खोट्या, संभ्रम पसरवणाऱ्या किंवा अफवा पसरवणाऱ्या पोस्ट किंवा व्हिडीओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर टाकल्या जावू शकतात. अशा पोस्टमुळे सर्वसामान्यांमध्ये संभ्रम पसरुन काही घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सायबर पोलिसांकडून सातत्याने सायबर पेट्रोलींग सुरू आहे. यादरम्यान सायबर पोलिस विविध समाजमाध्यमावर वाँच ठेवून आहेत. पोलिसांच्या सायबर पेट्रोलींगमध्ये आक्षेपार्ह काही आढळल्यास पोलिस तत्काळ संबधित पोस्ट काढून टाकतात. तसेच पोस्ट टाकणाऱ्याला नोटीस देवून आयुक्तालयात हजर होण्याबाबत तंबी देतात. अशा प्रकरणात कोणी तक्रार दाखल केल्यास सायबर पोलिस संबंधिताविरुध्द गुन्हासुध्दा दाखल करणार आहेत, असे सायबर पोलिसांकडून सांगण्यात आले.

यासंदर्भात सायबर पोलिस ठाण्याचे अधिकारी अनिकेत कासार यांनी सांगितले की, सोशल मीडियावर कोणीही अफवा पसरवणाऱ्या पोस्ट किंवा व्हिडीओ व्हायरल करु नये. आम्ही चोवीस तास यावर लक्ष ठेवून आहोत. आमच्या तपासणीमध्ये आक्षेपार्ह आढळल्यास संबंधितांविरुध्द कारवाई होणार आहे. सर्व गृप अ‍ॅडमिनने विशेष खबरदारी घ्यावी. तसेच मॅसेज केवळ अ‍ॅडमिन पाठवेल, अशा पद्धतीने सेटींग करुन घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.

Comments
Add Comment

शनिवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वागळे प्रभाग समिती व लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत इंदिरानगर

निवडणूक आयोगाने वाढवला निवडणुकीतील खर्चाचा 'कोटा'

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता उमेदवाराने करावयाच्या

शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात काय म्हणाले मंत्री दादाजी भुसे?

मुंबई : शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शालेय शिक्षण विभाग सकारात्मक असून त्यांच्या

शेतकरी, पशुपालकांना वीज दरात सवलत मिळणार, पण 'या' अटींवर...

मुंबई : राज्य शासनाने पशुपालन व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता वीजदरात

धक्कादायक! एसटीचे ७ कर्मचारी दारू पिऊन ड्युटीवर!

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा कारवाईचा बडगा मुंबई : अचानक केलेल्या तपासणीत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन

Tamhini Ghat Accident : 'सनरूफ' ठरला जीवघेणा! ताम्हिणी घाटात दरड कोसळून थरार, सनरुफ तोडून दगड थेट कारमध्ये पडले; महिलेचा जागीच मृत्यू!

पुणे/रायगड : पुणे-मानगाव मार्गावरील ताम्हिणी घाटात (Tamhini Ghat) एक अतिशय दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी अपघाताची घटना