online : ऑनलाईन सुनावणीस सरन्यायाधीशांचा नकार

नवी दिल्ली : राजधानी दिल्ली आणि परिसरामध्ये हवा प्रदूषणाने गंभीरतेची पातळी ओलांडली आहे. प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयातील वकिलांनी दिल्लीतील न्यायालयांच्या सुनावण्या ऑनलाईन (online) घेण्याची विनंती सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्याकडे केली. त्यांनी ऑनलाईन सर्व सुनावण्या घेण्यास नकार दिला.


प्रदूषणाची पातळी पाहता त्यांनी वकिलांना दूरदृश्यप्रणालीद्वारे हजर राहण्याची परवानगी दिली आहे. सरन्यायधीश संजीव खन्ना यांनी वकिलांना सांगितले की, ज्या प्रकरणांमध्ये दूरदृश्यप्रणालीद्वारे सुनावणीची शक्यता आहे, त्यामध्ये घेतली जाईल. दिल्लीतील गंभीर प्रदूषणामुळे भारताचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता, ज्येष्ठ वकील व सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष कपिल सिब्बल, ज्येष्ठ वकील गोपाल शंकरनारायणन यांनी सरन्यायाधीशांकडे सर्व प्रकरणांच्या सुनावण्या ऑनलाईन घेण्याची विनंती केली होती.



शंकरनारायणन यांनी सरन्यायाधीशांना सांगितले की, दररोज १० हजार वकील त्यांच्या वाहनांतून प्रवास करतात. ऑनलाईन (online) सुनावण्यांमुळे यामध्ये बराच फरक पडू शकतो.

Comments
Add Comment

उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला, पाकिस्तानी दहशतवादी ठार

बारामुल्ला : भारतीय सैन्याने जम्मू काश्मीरमधील उरी सेक्टरमधील बुछारमधून घुसखोरी करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न

Air India Airlines : युद्धाच्या पार्श्वभूमीवर देखील एअर इंडियाची ७२ उड्डाणे सुरू; अतिरिक्त सेवांची तयारी

मध्य पूर्वेमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर रविवारी एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस या विमान कंपन्या

एलपीजी पुरवठ्याबाबत महत्त्वाचा बदल, 'या' कुटुंबांना घरगुती एलपीजी सिलिंडर दिले जाणार नाहीत

नवी दिल्ली: पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने घरगुती स्वयंपाकाच्या गॅस (एलपीजी) पुरवठ्याबाबत एक मोठा आणि

Google's doodle : गुगलचं विशेष ‘पाय डे’ डूडल; गणितातील प्रसिद्ध स्थिरांकाला गुगलकडून अनोखा सलाम

मुंबई : गुगलने जगभरातील गणितप्रेमींसाठी १४ मार्च २०२६ रोजी खास डूडल सादर करून ‘पाय डे’ साजरा केला. या विशेष

Operation White Hammer : आंध्र प्रदेशात ४७ कोटींचे अंमली पदार्थ जप्त; दोघांना अटक

सिंथेटिक ड्रग्जच्या बेकायदेशीर उत्पादनाविरोधात महत्त्वपूर्ण कारवाई करत, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय)

फास्टॅग वार्षिक पास १ एप्रिलपासून महाग होणार

नवी दिल्ली : पुढील महिन्यापासून म्हणजेच १ एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना थोडा