जास्त रक्कम देण्याचे आमिष दाखवत फसवणूक करणारी महिला गजाआड

  119

अलिबाग : नागरिकांना रक्कम अधिक देण्याचे आमिष दाखवत नागावमधील एका महिलेने अनेकांची आर्थिक फसवणूक केल्याने आर्थिक गुन्हे शाखेत दाखल झालेल्या तक्रारीनंतर केलेल्या चौकशीत तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलिबाग पोलिसांनी तिला अटक केली असून, अलिबागच्या न्यायालयाने तिला १८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. फिर्यादी धिरेंद्र सिंग यांच्या तक्रारीनुसार अस्मिता पाटील असे या फसवणूक करणाऱ्या महिलेचे नाव आहे.



५० हजार रुपये गुंतवणूक केल्यास सहा दिवसात २५ टक्के नफा, एक लाख गुंतवणूक केल्यास १७ दिवसात ३० टक्के, सात लाख गुंतवणूक केल्यास २० दिवसांत ३० टक्के अशा वेगवेगळ्या सवलती देऊन कमी कालावधीत व्याजदरापेक्षा जास्त रक्कम परतावा देण्याचे आमिष तिने दाखवून लाखो रुपये गुंतविण्यास भाग पाडले. सुरुवातीला तिने विश्वास संपादन केला. तिच्या या आमिषाला बळी पडत सिंग यांनी लाखो रुपयांची गुंतवणूक त्यांच्याकडे केली; परंतू त्यानंतर तिच्याकडून सदर रक्कम परत देण्यास टाळाटाळ होऊ लागली. सात लाख ३७ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर सिंग यांनी आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार केली.
Comments
Add Comment

Red Soil Stories चे सुप्रसिद्ध यूट्यूबर शिरीष गवस यांचं निधन, वयाच्या ३३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कोकणातील खाद्यसंस्कृती यूट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणारे सुप्रसिद्ध Red Soil Stories चे युट्युबर

गणेशभक्तांचा रेल्वे प्रवास अधिक सुखकर करा!

खा. नारायण राणे यांनी रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन विशेष गाड्या,अधिकचे कोच जोडण्याची केली मागणी नवी दिल्ली :

सिंधुदुर्गमध्ये महाराष्ट्राचा पहिला काचेचा पूल सज्ज! नापणे धबधब्यावर पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण, कोकण पर्यटनाला नवी झळाळी

सिंधुदुर्ग: कोकणच्या निसर्गरम्य सिंधुदुर्ग जिल्ह्यात, पर्यटनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारे एक महत्त्वाचे

अभय योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा

आयुक्त मंगेश चितळे यांचे आवाहन पनवेल : मालमत्ता करांवरील शास्तीमध्ये सवलत देत पनवेल महापालिकेने दिनांक १८ जुलै

Reservation Chart : आता ट्रेन सुटण्याच्या ८ तास आधी पाहायला मिळणार आरक्षण चार्ट, 'या' दिवसापासून सेवा सुरूवात

मुंबई : रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना अधिक सोयीस्कर सेवा देण्यासाठी आणि त्यांचा प्रवास अधिक चांगल्या पद्धतीने

मुंबई-गोवा महामार्ग पंधरा वर्षे का रखडला? प्रवाशांना १ कोटीचा विमा आणि नुकसान भरपाईसाठी नितीन गडकरींना थेट पत्र

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दीर्घकाळ रखडलेल्या कामांमुळे त्रस्त झालेल्या कोकणवासीयांनी