जास्त रक्कम देण्याचे आमिष दाखवत फसवणूक करणारी महिला गजाआड

अलिबाग : नागरिकांना रक्कम अधिक देण्याचे आमिष दाखवत नागावमधील एका महिलेने अनेकांची आर्थिक फसवणूक केल्याने आर्थिक गुन्हे शाखेत दाखल झालेल्या तक्रारीनंतर केलेल्या चौकशीत तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलिबाग पोलिसांनी तिला अटक केली असून, अलिबागच्या न्यायालयाने तिला १८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. फिर्यादी धिरेंद्र सिंग यांच्या तक्रारीनुसार अस्मिता पाटील असे या फसवणूक करणाऱ्या महिलेचे नाव आहे.



५० हजार रुपये गुंतवणूक केल्यास सहा दिवसात २५ टक्के नफा, एक लाख गुंतवणूक केल्यास १७ दिवसात ३० टक्के, सात लाख गुंतवणूक केल्यास २० दिवसांत ३० टक्के अशा वेगवेगळ्या सवलती देऊन कमी कालावधीत व्याजदरापेक्षा जास्त रक्कम परतावा देण्याचे आमिष तिने दाखवून लाखो रुपये गुंतविण्यास भाग पाडले. सुरुवातीला तिने विश्वास संपादन केला. तिच्या या आमिषाला बळी पडत सिंग यांनी लाखो रुपयांची गुंतवणूक त्यांच्याकडे केली; परंतू त्यानंतर तिच्याकडून सदर रक्कम परत देण्यास टाळाटाळ होऊ लागली. सात लाख ३७ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर सिंग यांनी आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार केली.
Comments
Add Comment

‘वलसाड हापूस’ या नावाने स्वतंत्र मानांकनांसाठी गुजरात प्रयत्नशील

मुंबई : हापूस आंबा म्हटले की, कोकण किनारपट्टीवर उत्पादित होणारा गोड, चविष्ट आणि सुवासिक आंबा सर्वांच्या

Anganewadi Jatra 2026 : भराडी देवीचा 'कौल' मिळाला! लाखो भाविकांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; आंगणेवाडी जत्रेची तारीख अखेर ठरली!

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि कोकणातील सर्वात महत्त्वाची यात्रा समजल्या जाणाऱ्या मालवण

Eknath Shinde : शिंदेंकडून निलेश राणेंचं तोंडभरून कौतुक! "इलाका किसी का भी हो, धमाका निलेश राणेच करणार"; मालवण हा सेनेचाच बालेकिल्ला

मालवणमध्ये झालेल्या एका जाहीर सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदार निलेश राणे यांचे

मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव येथे धुक्यामुळे भीषण अपघात

शिवशाही बस, ट्रकमध्ये धडक; १ ठार, ११ जखमी प्रमोद जाधव माणगाव : मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे.

संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार; पहिल्या टप्प्यातील संकल्पचित्राचे सादरीकरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक

जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठी आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून मोठ्या प्रमाणात काजू निर्यात व्हावी यासाठी संबधित विभागांनी