जास्त रक्कम देण्याचे आमिष दाखवत फसवणूक करणारी महिला गजाआड

अलिबाग : नागरिकांना रक्कम अधिक देण्याचे आमिष दाखवत नागावमधील एका महिलेने अनेकांची आर्थिक फसवणूक केल्याने आर्थिक गुन्हे शाखेत दाखल झालेल्या तक्रारीनंतर केलेल्या चौकशीत तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलिबाग पोलिसांनी तिला अटक केली असून, अलिबागच्या न्यायालयाने तिला १८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. फिर्यादी धिरेंद्र सिंग यांच्या तक्रारीनुसार अस्मिता पाटील असे या फसवणूक करणाऱ्या महिलेचे नाव आहे.



५० हजार रुपये गुंतवणूक केल्यास सहा दिवसात २५ टक्के नफा, एक लाख गुंतवणूक केल्यास १७ दिवसात ३० टक्के, सात लाख गुंतवणूक केल्यास २० दिवसांत ३० टक्के अशा वेगवेगळ्या सवलती देऊन कमी कालावधीत व्याजदरापेक्षा जास्त रक्कम परतावा देण्याचे आमिष तिने दाखवून लाखो रुपये गुंतविण्यास भाग पाडले. सुरुवातीला तिने विश्वास संपादन केला. तिच्या या आमिषाला बळी पडत सिंग यांनी लाखो रुपयांची गुंतवणूक त्यांच्याकडे केली; परंतू त्यानंतर तिच्याकडून सदर रक्कम परत देण्यास टाळाटाळ होऊ लागली. सात लाख ३७ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर सिंग यांनी आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार केली.
Comments
Add Comment

कोकणाच्या विकासासाठी भाजपचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’; जयगड बंदर बनणार अर्थव्यवस्थेचं केंद्र

रत्नागिरी: मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते नितेश राणे

रत्नागिरी नाचणेत मुलाकडून आईचा खून, खून करून मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

गणेशोत्सवाच्या उत्साहात रत्नागिरी जिल्हा हादरला आहे. शहरातील नाचणे येथे पोटच्या मुलाने आपल्या आईचा निर्घृण

खेडमधील खवटी गावाजवळ खासगी बस आणि कारचा भीषण अपघात, तिघेजण गंभीर जखमी

खेडमधील खवटी गावाजवळ मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास खासगी बस आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. या

वैभव खेडेकरांची मनसेतून हकालपट्टी, वैभव खेडेकर भाजपाच्या वाटेवर, मनसेतून 4 जणांची हकालपट्टी

गेल्या काही दिवसांपासून वैभव खेडेकर यांच्या नावाची चर्चा सुरु होती, वैभव खेडेकर भाजपमध्ये जातील अशीही शक्यता

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत ‘आरटीओ’कडून दर सूची प्रसिद्ध

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी दरतक्ता प्रसिद्ध करण्यात आले आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात