Solapur: मासेमारीच्या जाळ्यात पाय अडकून भीमा नदीत तरुणाचा मृत्यू

सोलापूर : भीमा नदीच्या पात्रात मासेमारीसाठी गेलेल्या युवकाचा मासे पकडण्याच्या जाळीत पाय अडकून पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना अर्धनारी (ता.मोहोळ) खोरी परिसरात घडली.

सीताराम रामचंद्र भोई (४५) असे मृत्यू पावलेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली, एक मुलगा,विवाहित दोन भाऊ, एक बहीण असा परिवार आहे. या घटनेची नोंद कामती पोलिस ठाण्यात झाली आहे.



बाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, बेगमपूर (घोडेश्वर) येथील सिताराम भोई व त्यांचे कुटुंबिय भीमा नदीच्या पात्रात मासेमारी करून आपली उपजीविका भागवितात. गावातील भोई समाजातील बहुतांश मच्छीमार व्यावसायिक मासेमारीसाठी गावापासून काही अंतरावर असलेल्या अर्धनारी (खोरी परिसर), नळी येथे जातात. नेहमीप्रमाणे सीताराम व अन्य काहीजण सकाळी अर्धनारी भागातच मच्छीमारीसाठी गेले होते. यावेळी मासे पकडत असताना मासे पकडण्यासाठी आणलेल्या नॉयलॉनच्या जाळीत सीताराम याचा पाय अडकला व तो पाण्यात पडला. त्यातून सुटका करण्यासाठी त्याने प्रयत्न केला. परंतु नदीपात्रात खोल पाणी असल्याने तो त्यात बुडाला. यावेळी सोबतच्या सहकाऱ्यांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न करत असताना भ्रमणध्वनी वरून बेगमपूर येथील भोई समाजाच्या युवकांना या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच गावातील सुमारे पन्नासहून अधिक युवक घटनास्थळी धावले.

Comments
Add Comment

नेमक्या कोणत्या कारणामुळे पार्थ पवारांच्या अडचणी वाढल्या ?

पुणे : कोरेगाव पार्क परिसरातील महार वतनाच्या तब्बल ४० एकर जमिनीच्या नोंदणी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर

पुणेकरांनो नव्या घराचं स्वप्न होणार पूर्ण; म्हाडाच्या ४,१८६ घरांसाठी अर्ज करण्याची मुदत आता ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत वाढवली

पुणे : पुणे महानगर प्रदेशात घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी म्हाडाने (MHADA) मोठा दिलासा दिला आहे. विविध

मालेगावच्या बालिकेवर अत्याचार, सर्वत्र संताप; अभिनेत्री सुरभी भावेकडून कठोर शिक्षेची मागणी

मालेगाव : मालेगावजवळील डोंगराळे गावात घडलेल्या निर्घृण घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. साडेतीन

राज्यभरातील व्यापाऱ्यांचा ५ डिसेंबरला लाक्षणिक बंद

पुणे (प्रतिनिधी) : राज्यभरातील व्यापारी विविध मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ५ डिसेंबर २०२५ रोजी

धक्कादायक प्रकार, पुण्यात १६ जेष्ठ नागरिकांना उघड्यावर टाकले

पुणे : पुण्यातील सामाजिक सुरक्षेच्या यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी घटना समोर आली आहे. शहरातील १६

ताकझुरे अर्बन निधी लिमिटेड संस्थेत घोटाळा! सर्वसामान्यांच्या बचतीचा पदाधिकाऱ्यांनी घेतला फायदा

अकोला: अकोल्यातली ताकझुरे अर्बन निधी लिमिटेड या संस्थेमध्ये ठेवी केलेल्या नागरिकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक