सोलापूर : भीमा नदीच्या पात्रात मासेमारीसाठी गेलेल्या युवकाचा मासे पकडण्याच्या जाळीत पाय अडकून पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना अर्धनारी (ता.मोहोळ) खोरी परिसरात घडली.
सीताराम रामचंद्र भोई (४५) असे मृत्यू पावलेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली, एक मुलगा,विवाहित दोन भाऊ, एक बहीण असा परिवार आहे. या घटनेची नोंद कामती पोलिस ठाण्यात झाली आहे.
बाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, बेगमपूर (घोडेश्वर) येथील सिताराम भोई व त्यांचे कुटुंबिय भीमा नदीच्या पात्रात मासेमारी करून आपली उपजीविका भागवितात. गावातील भोई समाजातील बहुतांश मच्छीमार व्यावसायिक मासेमारीसाठी गावापासून काही अंतरावर असलेल्या अर्धनारी (खोरी परिसर), नळी येथे जातात. नेहमीप्रमाणे सीताराम व अन्य काहीजण सकाळी अर्धनारी भागातच मच्छीमारीसाठी गेले होते. यावेळी मासे पकडत असताना मासे पकडण्यासाठी आणलेल्या नॉयलॉनच्या जाळीत सीताराम याचा पाय अडकला व तो पाण्यात पडला. त्यातून सुटका करण्यासाठी त्याने प्रयत्न केला. परंतु नदीपात्रात खोल पाणी असल्याने तो त्यात बुडाला. यावेळी सोबतच्या सहकाऱ्यांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न करत असताना भ्रमणध्वनी वरून बेगमपूर येथील भोई समाजाच्या युवकांना या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच गावातील सुमारे पन्नासहून अधिक युवक घटनास्थळी धावले.
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा 'फॅण्ड्री' (Fandry Movie) हा…
जलतरण शिकतानाच ११ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू; क्रीडा संकुल व्यवस्थापनावर गुन्हा दाखल भायंदर : उन्हाळी…
व्हॅटिकन सिटी : श्वसनाच्या आजाराने त्रस्त असलेल्या पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले.…
पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…
महिलांना त्यांच्या पायांचे सौंदर्य वाढवण्यासाठी अँकलेट परिधान करायला फार आवडते. विवाहित महिलांसोबतच अविवाहित मुलींनाही अँकलेट…