Solapur: मासेमारीच्या जाळ्यात पाय अडकून भीमा नदीत तरुणाचा मृत्यू

  70

सोलापूर : भीमा नदीच्या पात्रात मासेमारीसाठी गेलेल्या युवकाचा मासे पकडण्याच्या जाळीत पाय अडकून पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना अर्धनारी (ता.मोहोळ) खोरी परिसरात घडली.

सीताराम रामचंद्र भोई (४५) असे मृत्यू पावलेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली, एक मुलगा,विवाहित दोन भाऊ, एक बहीण असा परिवार आहे. या घटनेची नोंद कामती पोलिस ठाण्यात झाली आहे.



बाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, बेगमपूर (घोडेश्वर) येथील सिताराम भोई व त्यांचे कुटुंबिय भीमा नदीच्या पात्रात मासेमारी करून आपली उपजीविका भागवितात. गावातील भोई समाजातील बहुतांश मच्छीमार व्यावसायिक मासेमारीसाठी गावापासून काही अंतरावर असलेल्या अर्धनारी (खोरी परिसर), नळी येथे जातात. नेहमीप्रमाणे सीताराम व अन्य काहीजण सकाळी अर्धनारी भागातच मच्छीमारीसाठी गेले होते. यावेळी मासे पकडत असताना मासे पकडण्यासाठी आणलेल्या नॉयलॉनच्या जाळीत सीताराम याचा पाय अडकला व तो पाण्यात पडला. त्यातून सुटका करण्यासाठी त्याने प्रयत्न केला. परंतु नदीपात्रात खोल पाणी असल्याने तो त्यात बुडाला. यावेळी सोबतच्या सहकाऱ्यांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न करत असताना भ्रमणध्वनी वरून बेगमपूर येथील भोई समाजाच्या युवकांना या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच गावातील सुमारे पन्नासहून अधिक युवक घटनास्थळी धावले.

Comments
Add Comment

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना

Pratap Sranaik : "वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पार्किंग व्यवस्थेत बदल करणार" प्रताप सरनाईक यांनी दिले आदेश...

मुंबई : रस्त्यावरील वाहतुकीला शिस्त लावून अनावश्यक वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महानगरामध्ये  पार्किंग व्यवस्था

Pandharpur Vitthal Mandir: आषाढी वारीनिमित्त विठुरायाचं आजपासून २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत

कुर्ला ते छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतचा प्रवास आता  वेगाने होणार...

मुंबई : मुंबईकरांची  वाहतूक कोंडी (TRAFFIC CONGESTION) सोडवण्यासाठी "एमएमआरडीए"ने नवीन प्रकल्प उभारण्याचं काम सुरु केले आहे. 

Pune Airport: प्रवाशांना घेऊन विमान पुण्यात तर आलं, पण सामान मागेच राहीलं!

स्पाइसजेटच्या दुबई-पुणे विमानाने इंधन भारामुळे प्रवाशांचे सामान न घेताच पुण्यात लँडिंग केले.  पुणे:  दुबईहून

जिओमध्ये गुंतवणूक ही माझ्या आयुष्यातली मोठी रिस्क : मुकेश अंबानी

रिलायन्स आता डीप-टेक, अ‍ॅडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी बनण्याच्या मार्गावर मुंबई  : टेलिकॉम क्षेत्रातील