झाशी: जिल्हा रुग्णालयात भीषण आग, १० नवजात बाळांचा होरपळून मृत्यू

झाशी: उत्तर प्रदेशातील झाशीमध्ये शुक्रवारी रात्री मेडिकल कॉलेजच्या नवजात शिशु विभागात भीषण आग लागली. यात १० नवजात बाळांचा मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर सकाळी उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक झाशीच्या महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजमध्ये पोहोचले आणि घटनेची पाहणी केली.


या अपघाताप्रकरणी उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी तपासाचे आदेश दिले आहेत तसेच जखमींवर उपचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आर्थिक मदतीसाठी तयार असल्याचे ते म्हणाले. उपमुख्यमंत्री म्हणाले, नवजात बाळांच्या मृत्यूची घटना दुर्देवी आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत मिळून आम्ही बालकांच्या मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहोत.


रुग्णालयात ही आग कशामुळे लागली याचा तपास केला जाईल. यात जे दोषी आढळतील त्यांच्याविरोधात कडक कारवाई केली जाईल. तसेच कोणालाही यात माफ केले जाणार आहे. सरकार बाळांच्या कुटुंबियांसोबत आहे. २४ तासांच्या आत तपासाचा रिपोर्ट येईल. मृत मुलांमध्ये १० पैकी ७ जणांची ओळख पटली आहे. अद्याप ३ बाळांची ओळख पटणे बाकी आहे. गरज पडल्यास डीएनए टेस्ट केली जाईल.



एनआयसीयूमध्ये ५४ मुले दाखल होती


या घटनेबाबत माहिती देताना झांसी सीएमएस सचिन मेहर यांनी सांगितले, महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजच्या एनआयसीयू वॉर्डमध्ये ५४ मुले दाखल होती. यावेळी अचानक आग लागली. ही आग विझवण्याचा प्रयत्न झाला. मात्र अधिकतर मुले ऑक्सिजन सपोर्टवर होती.

Comments
Add Comment

Ram Mandir Case, : राम मंदिर प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर नवी एसआयटी स्थापन

नवी दिल्ली : अयोध्या येथील राम मंदिरातील देणगीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात

Supreme Court : शांततापूर्ण निदर्शने हा संविधानाने दिलेला अधिकार; सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी

नवी दिल्ली : नीट परीक्षा प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून देशभर तीव्र आंदोलन पुकारण्यात आले होते. 'कॉकरोच

Odessa Port Attack : ओडेसा बंदरातील हल्ल्यानंतर भारत सतर्क; परराष्ट्र मंत्रालयाने युक्रेनच्या राजदूताला बोलावले

नवी दिल्ली : काळ्या समुद्र (ब्लॅक सी) परिसरातील भारतीय खलाशांच्या सुरक्षेबाबत भारताने मोठे राजनैतिक पाऊल उचलले

Online Share Trading Fraud : ऑनलाईन शेअर ट्रेडिंग फसवणूक : प्रमुख बँकांना सुप्रीम कोर्टाची नोटीस

सर्वोच्च न्यायालयामुळे लाखो गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवित नवी दिल्ली : ऑनलाईन शेअर ट्रेडिंग आणि डिजिटल

Rashtriya Krishi Vikas Yojana : राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी पात्र ठरणारे महाराष्ट्र पहिले राज्य

नवी दिल्ली : ठरवून दिलेल्या वेळेत राष्ट्रीय कृषी विकास योजना निधीचा एकूण 75 टक्क्यांपेक्षा जास्त प्रभावी वापर

IndiGo Flight : धुराच्या इशाऱ्यानंतर दुबईहून मुंबईकडे येणाऱ्या इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये सुरक्षित लँडिंग

गांधीनगर : दुबईहून मुंबईकडे येत असलेल्या इंडिगोच्या विमानाचे आज अचानक आपत्कालीन लँडिंग करावे लागले. विमानाच्या