भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं गुजरात

गांधीनगर: गुजरातच्या मेहसाणामध्ये शुक्रवारी रात्री भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ४.२ इतकी नोंदवण्यात आली. या घटनेंतर स्थानिकांमध्ये प्रचंड घबराहटीचे वातावरण होते. तसेच २००१ च्या भूकंपाची आठवण झाल्यामुळे मेहसाणा येथे अनेकांनी रात्र जागवून काढली. दरम्यान या भूकंपामुळे कुठलीही जीवित किंवा वित्तहानी झाली नसल्याची माहिती प्रशासनाने आज, शनिवारी सकाळी दिली.




यासंदर्भातील माहितीनुसार गुजरातच्या मेहसाणा, पाटण, बनासकांठा, पालनपूर, साबरकांठा येथे शुक्रवारी रात्री भूकंपाचे धक्के जाणवले. लोकांच्या म्हणण्यानुसार, भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की त्यांना घराबाहेर पळावे लागले. लोक अजूनही घाबरलेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून हवेत गारठा निर्माण झाला आहे. परंतु, त्यानंतरही अनेक लोकांनी शुक्रवारची रात्र जागून काढली. भूकंपाच्या एका धक्क्यानंतर पहाटेच्या सुमाराला पुन्हा धक्के बसण्याची शक्यता असते. त्यामुळे घाबरलेल्या नागरिकांनी संपूर्ण रात्र जागून काढली. राज्यात २३ वर्षांपूर्वी झालेल्या विनाशकारी भूकंपाच्या आठवणी मनात ताज्या असल्यामुळे भूकंपाचे हादरे बसलेल्या परिसरात भीतीचे वातावरण होते. यापूर्वी २००१ मध्ये गुजरातच्या कच्छमध्ये भीषण भूकंप झाला होता, ज्यामध्ये १३ हजारांहून अधिक लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. गुजरात राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार, गेल्या २०० वर्षांत राज्यात ९ मोठे भूकंप झाले असून २००१ चा भूकंप सर्वाधिक प्राणघातक ठरला होता.

Comments
Add Comment

पंजाब सीमेवर दोन पाकिस्तानी ड्रोन बीएसएफकडून जप्त

पाकिस्तानमधून ड्रग्ज तस्करीसाठी ड्रोनचा वापर चंदीगड : सीमा सुरक्षा दलाने भारत-पाकिस्तान सीमेवर केलेल्या

ऑक्टोबरमध्ये तब्बल २१ दिवस बँका बंद

मुंबई : पुढील महिन्यातील ऑक्टोबरमध्ये देशभरातील वेगवेगळ्या बँका एकूण २१ दिवस बंद राहणार आहेत. आरबीआयच्या

करूर दुर्घटना: विजयकडून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २० लाख, जखमींना २ लाख मदत जाहीर

तामिळनाडूतील सभेतील चेंगराचेंगरीत ३९ जणांचा मृत्यू; राजकीय पक्षाच्या कार्यक्रमात इतक्या मोठ्या प्रमाणात

मध्य रेल्वे प्रशासनाची मोटरमनच्या मोबाईलवर करडी नजर

रेल्वेचे नियम, बंधनांविरोधात मोटरमनची नाराजी नवी दिल्ली : मोटरमन केबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या

लैंगिक छळाच्या आरोपाखाली फरार असलेल्या स्वामी चैतन्यांनदला आग्रा येथून अटक

नवी दिल्ली: दिल्लीतील एका व्यवस्थापन संस्थेतील विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखाली फरार असलेला

विजय यांच्या रॅलीत चेंगराचेंगरीमध्ये आतापर्यंत ३९ लोकांचा मृत्यू, ५० हून अधिक जखमी, मुख्यमंत्र्‍यांनी जाहीर केली मदत

करूर, तामिळनाडू: प्रसिद्ध अभिनेता आणि राजकारणी विजय यांच्या रॅलीत शनिवारी मोठी दुर्घटना घडली. करूरमध्ये आयोजित