भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं गुजरात

गांधीनगर: गुजरातच्या मेहसाणामध्ये शुक्रवारी रात्री भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ४.२ इतकी नोंदवण्यात आली. या घटनेंतर स्थानिकांमध्ये प्रचंड घबराहटीचे वातावरण होते. तसेच २००१ च्या भूकंपाची आठवण झाल्यामुळे मेहसाणा येथे अनेकांनी रात्र जागवून काढली. दरम्यान या भूकंपामुळे कुठलीही जीवित किंवा वित्तहानी झाली नसल्याची माहिती प्रशासनाने आज, शनिवारी सकाळी दिली.




यासंदर्भातील माहितीनुसार गुजरातच्या मेहसाणा, पाटण, बनासकांठा, पालनपूर, साबरकांठा येथे शुक्रवारी रात्री भूकंपाचे धक्के जाणवले. लोकांच्या म्हणण्यानुसार, भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की त्यांना घराबाहेर पळावे लागले. लोक अजूनही घाबरलेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून हवेत गारठा निर्माण झाला आहे. परंतु, त्यानंतरही अनेक लोकांनी शुक्रवारची रात्र जागून काढली. भूकंपाच्या एका धक्क्यानंतर पहाटेच्या सुमाराला पुन्हा धक्के बसण्याची शक्यता असते. त्यामुळे घाबरलेल्या नागरिकांनी संपूर्ण रात्र जागून काढली. राज्यात २३ वर्षांपूर्वी झालेल्या विनाशकारी भूकंपाच्या आठवणी मनात ताज्या असल्यामुळे भूकंपाचे हादरे बसलेल्या परिसरात भीतीचे वातावरण होते. यापूर्वी २००१ मध्ये गुजरातच्या कच्छमध्ये भीषण भूकंप झाला होता, ज्यामध्ये १३ हजारांहून अधिक लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. गुजरात राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार, गेल्या २०० वर्षांत राज्यात ९ मोठे भूकंप झाले असून २००१ चा भूकंप सर्वाधिक प्राणघातक ठरला होता.

Comments
Add Comment

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी; १३ एप्रिलला बैठक, वेतन आणि निवृत्तीवेतनावर अंतिम निर्णय होणार

नवी दिल्ली: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेसंदर्भात लवकरच एक महत्त्वाची बैठक होणार आहे. राष्ट्रीय

TRP of News Channels : वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीवर केंद्राकडून पुन्हा लगाम! वृत्तवाहिन्यांवरील बंदी आणखी काही आठवड्यांसाठी वाढवली

केंद्र सरकारने टीव्ही वृत्तवाहिन्यांचे टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स (टीआरपी) आणखी चार आठवड्यांसाठी निलंबित

Anant Ambani: अनंत अंबानींनी दिली मोठी देणगी; केरळमधील दोन मंदिरांना ६ कोटी रुपये

मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी केरळमधील दोन प्रमुख धार्मिक

Manipur on edge : मणिपूरमध्ये रॉकेट हल्ल्यात दोन चिमुरड्यांचा मृत्यू; संतप्त जमावाचा सुरक्षा दलांवर हल्ला, बिष्णुपूरमध्ये तणाव

इंफाळ : मणिपूरमधील वांशिक हिंसाचाराने पुन्हा एकदा भीषण रूप धारण केले आहे. बिष्णुपूर जिल्ह्यात मंगळवारी पहाटे

Amaravati Capital : 'अमरावती' आता आंध्र प्रदेशची 'कायमस्वरूपी' राजधानी; केंद्राचे गॅझेट नोटिफिकेशन जारी!

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशच्या (Andhra Pradesh) राजधानीबाबत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर केंद्र सरकारने

Rajnath Singh : "पाकिस्तानने बंगालकडे वाईट नजरेने पाहिलं तर..."; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला सुनावले

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांच्या भडकाऊ वक्तव्याला जोरदार