भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं गुजरात

गांधीनगर: गुजरातच्या मेहसाणामध्ये शुक्रवारी रात्री भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ४.२ इतकी नोंदवण्यात आली. या घटनेंतर स्थानिकांमध्ये प्रचंड घबराहटीचे वातावरण होते. तसेच २००१ च्या भूकंपाची आठवण झाल्यामुळे मेहसाणा येथे अनेकांनी रात्र जागवून काढली. दरम्यान या भूकंपामुळे कुठलीही जीवित किंवा वित्तहानी झाली नसल्याची माहिती प्रशासनाने आज, शनिवारी सकाळी दिली.




यासंदर्भातील माहितीनुसार गुजरातच्या मेहसाणा, पाटण, बनासकांठा, पालनपूर, साबरकांठा येथे शुक्रवारी रात्री भूकंपाचे धक्के जाणवले. लोकांच्या म्हणण्यानुसार, भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की त्यांना घराबाहेर पळावे लागले. लोक अजूनही घाबरलेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून हवेत गारठा निर्माण झाला आहे. परंतु, त्यानंतरही अनेक लोकांनी शुक्रवारची रात्र जागून काढली. भूकंपाच्या एका धक्क्यानंतर पहाटेच्या सुमाराला पुन्हा धक्के बसण्याची शक्यता असते. त्यामुळे घाबरलेल्या नागरिकांनी संपूर्ण रात्र जागून काढली. राज्यात २३ वर्षांपूर्वी झालेल्या विनाशकारी भूकंपाच्या आठवणी मनात ताज्या असल्यामुळे भूकंपाचे हादरे बसलेल्या परिसरात भीतीचे वातावरण होते. यापूर्वी २००१ मध्ये गुजरातच्या कच्छमध्ये भीषण भूकंप झाला होता, ज्यामध्ये १३ हजारांहून अधिक लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. गुजरात राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार, गेल्या २०० वर्षांत राज्यात ९ मोठे भूकंप झाले असून २००१ चा भूकंप सर्वाधिक प्राणघातक ठरला होता.

Comments
Add Comment

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने