Bharat Gogavale : राज्याच्या पाचही प्रांतावर राज्य करणारे नेते

महाड : आमदार भरत गोगावले (Bharat Gogavale) यांचे कौतुक करताना हभप कोकरे महाराज यांनी सांगितले की महाराष्ट्रात पाच प्रांत आहेत विदर्भात शास्त्रज्ञ, मराठवाड्यात संत, खानदेशात कवी, पश्चिम महाराष्ट्रात पुढारी तर कोकणात लेखक व क्रांतीकारक जन्माला येतात मात्र विदर्भ, मराठवाडा, खांदेश, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या पाचही प्रांतावर राज्य करणारे भरतशेठ हे एकमेव नेते आहेत. भरतशेठ हे केवळ महाडचे नेते नाही तर राज्यातील कानाकोपऱ्यातून येणारे दिन दलित, गोरगरीब, निराधार, अनाथ यांचे मंत्रालयातील काम फक्त भरतशेठ मुळे होते असे वारकरी सांप्रदाय कोकण प्रांताचे अध्यक्ष भगवान काकरे यांनी स्पष्ट केले.


राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व माजी मुख्यमंत्री उबाठा यांच्यावर टिकास्त्र सोडताना कोकरे यांनी महाराष्ट्राला खाईत लोटण्यासाठी शरद पवार व उबाठा यांनी जातीजातीत धर्मांधर्मात भांडणे लावून जातीय वाद निर्माण केला. कष्टकरी, मराठी माणसाची गळचेपी थांबवण्यासाठी शिवसेनेचा भगवा हाती घेतलेल्या बाळासाहेबांनी मोठ्या विश्वासाने उबाठा यांच्या खांद्यावर पक्षाची धुरा सोपवली मात्र स्वार्थ आणि खुर्चीसाठी त्यांनी सेनेचा भगवा काँग्रेसकडे गहाण ठेवला. मुख्यमंत्री पदाचे खुर्चीत बसल्यानंतर गड किल्ले, मराठी अस्मितेचा उद्धार होईल अशी स्वप्ने मराठी माणसांनी पाहिली मात्र उबाठा यांनी शिवसेना प्रमुखांचे विचार आणि पक्ष संपवून मराठी माणसाची स्वप्ने धुळीला मिळवली.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर गद्दारी केल्याचा उबाठा यांच्याकडून आरोप केला जातो त्याचा समाचार घेताना एकनाथ शिंदे यांनी शिवसेना प्रमुखांचे विचार आणि पक्ष वाचवण्यासाठी, गहाण ठेवलेला भगवा, धनुष्यबाण सोडवण्यासाठी उठाव केला असे कोकरे यांनी सांगितले. दिवाळीत ३ तारखेला सर्व लाडक्या बहिणींची भाऊबीज झाली. आता २० तारखेला आ. गोगावले यांना मताच्या रुपाने भाऊबीजेचा आहेर द्या. देश संकटात असेल तर मातृशक्ती जागी होत असते महिषासुर उन्मत झाला होता त्यावेळी कालीकामा प्रकटली, सुलतानीने नंगा नाच सुरु केला त्यावेळी जिजाऊ धावून आली आता महाविकास आघाडी देश गिळंकृत करायला बसली आहे तेव्हा मातृशक्तीने जागे व्हावे असे आवाहन कोकरे यांनी केले.


पन्हाळगडाला जेव्हा शत्रुंचा वेढा पडला होता त्यावेळी आपला राजा जोवर गडावर पोचत नाही तोपर्यंत बाजीप्रभु देशपांडे यांनी पावन खिंड लढवली होती त्याप्रमाणे आजपासून पुढील पाच दिवस शिवसैनिकांनी बाजीप्रभू प्रमाणे खिंड लढवून २० तारखेला शेवटचं मत मतपेटीत पडत नाही तोपर्यंत जागरूक राहावे असे आवाहन केले. यावेळी आ. गोगावले यांनी नाते गणासाठी २० कोटी तर नडगांव गणासाठी १८ कोटीचा निधी आणल्याचे सांगितले. नाते ते डोंगरोळी लोणेरे रस्ता, रवळनाथ सोमजाई देखणं मंदीर (१ कोटी मंजुरी ) जगदीश्वर मंदीर ३० लाख, निरंजन डावखरे यांच्या माध्यमातून पुल गारपाटला, सानेकोंड अशा दुर्गम भागातील रस्ते, पाणी योजना आपल्या आमदारकीच्या काळात झाल्याचे सांगत पुन्हा महायुतीची सत्ता येणार असून महाडकरांसाठी हा सुवर्णकाळ असणार आहे. त्यामुळे तुमच्या आमदाराला (Bharat Gogavale) भरघोस मतांनी विजयी करा, असे आवाहन केले.

Comments
Add Comment

Ambernath Crime : अंबरनाथमध्ये खळबळजनक घटना, ८ लाखांचे अमली पदार्थ जप्त

अंबरनाथ : भगतसिंग नगर परिसरात अंबरनाथ पोलिसांनी तब्बल ८ लाखांचे हेरॉईन (अमली पदार्थ) जप्त केल्याची घटना समोर आली

Maharashtra CM : स्फोटक उद्योग अधिक सुरक्षित करण्यासाठी केंद्र सरकारकडे सुधारणा प्रस्ताव!

 मुंबई :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज रामगिरी निवासस्थान, नागपूर येथे 'स्फोटके नियम 2008'

PATRAPATRI : ‘पत्रापत्री’ शब्दांची जादू आणि मैत्रीच्या आठवणींचा शंभर प्रयोगांचा यशस्वी प्रवास!

Vijay Kenkre and Dilip Prabhavalkar : सांस्कृतिक विश्वात गेल्या दोन वर्षांत ज्या एका प्रयोगाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले, तो

SMARTPHONE PHOTOGHRAPHY : स्मार्टफोन फोटोग्राफीची नवी क्रांती; लेन्स आणि सेन्सरपेक्षा 'AI' का ठरतेय भारी?

PHOTOGHRAPHY AND AI : गेल्या अनेक वर्षांपासून आपण स्मार्टफोन खरेदी करताना एकच प्रश्न विचारत आलो आहोत – "कॅमेरा किती

Satara Murder: कराडमध्ये शासकीय अभियंत्याची हत्या; सुपारी देऊन रचला कट, जवळच्या नातेवाईकांना अटक

सातारा : सातारा जिल्ह्यातील कराड (Karad) शहरात एका शासकीय अभियंत्याची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली. या

MUMBAI WEATHER : मुंबई हवामान अपडेट: मान्सूनची चाहूल, शहरात पावसाची शक्यता

MUMBAI : मान्सूनच्या आगमनासोबतच मुंबई आणि परिसरात हवामानात बदल जाणवू लागला आहे. आज, ७ जून रोजी शहरात आकाश अंशतः ढगाळ