Assembly Election: विधानसभा निवडणुकीसाठी मध्य रेल्वे सोडणार विशेष गाड्या

मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकीचा(Assembly Election) जोरदार धुरळा उडवला जात आहे. सर्वच राजकीय पक्ष सभांवर सभा घेत आहेत. येत्या २० नोव्हेंबरला राज्यात विधानसभेसाठी एकाच टप्प्यात मतदान होत आहे. त्यामुळे सर्वच पक्ष प्रचारासाठी जोर लावत आहे.


राज्यातील मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी सरकारकडून सातत्याने प्रयत्न करत आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेकडून विशेष पाऊल उचलले जात आहे. निवडणुकीसाठी मध्य रेल्वेकडून रात्रीच्या विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण आणि पनवेल या दरम्यान धीम्या गतीवर २० नोव्हेंबरला पहाटे आणि मध्यरात्री उशिरा या लोकल गाड्या सोडल्या जाणार आहेत. यामुळे निवडणुकीचे कर्तव्य बजावणारे अधिकारी, कर्मचारी आणि सामान्य प्रवाशांना याचा फायदा होणार आहे.



असे असणार वेळापत्रक


२० नोव्हेंबरला पहाटे ३ वाजता गाड्या सुटतील


सीएसएमटी-कल्याण, सीएसएमटी-पनवेल(डाऊन मार्गावर)
कल्याण-सीएसएमटी, पनवेल - सीएसएमटी(अप मार्गावर)



डाऊन मार्ग


सीएसएमटी-कल्याण- १.१०, २.३०
सीएसएमटी - पनवेल - १.४०, २.५०



अप मार्ग


कल्याण-सीएसएमटी- १.००, २.००
पनवेल - सीएसएमटी - १.००, २.३०

Comments
Add Comment

मराठी भाषेचे संवर्धन ही केवळ सरकारचीच नाही, तर प्रत्येकाची जबाबदारी - मंत्री उदय सामंत

मुंबई : "मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी शासन स्तरावर मराठी भाषा विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र,

Panvel Karjat Local Train: पनवेल-कर्जत लोकल ट्रेन सुरु होणार; प्रवाशांचा वेळ वाचणार

मुंबई: पनवेल आणि कर्जत या दोन्ही स्थानकांना जोडणारा प्रकल्प लवकरच पूर्ण होणार आहे. तसे पाहिले तर पनवेल आणि कर्जत

BMC Budget 2026 : मुंबईच्या शाश्वत विकासाची ग्वाही देणारा अर्थसंकल्प - महापौर रितू तावडे

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने वित्तीय वर्ष २०२६-२०२७ करिता सादर केलेले अर्थसंकल्पीय अंदाज हे

उंदीर फळे खातात म्हणून फळविक्रेत्याने फळांना चक्क 'रॅट किलर' औषध लावलं; दोघांना अटक

मुंबई: मुंबई शहरात जर तुम्ही रस्त्यावर फळ घेत असाल तर सावधान! कारण मालाड परिसरात फळ विक्रेताचा एक अतिशय धक्कादायक

Inspirational Story: दोन भावांची सोशल मीडियावर तुफान चर्चा, कमी वयात...

मुंबई: किशोर मंडल आणि त्याचा लहान भाऊ कृष मंडलची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. अतिशय कमी वयात या दोन्ही

तब्बल २ लाख ४४ हजार कोटींचे पायाभूत सुविधा प्रकल्प, राखीव निधी केवळ ३६ हजार कोटी

मुंबई: मुंबई महापालिच्यावतीने पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेण्यात आले असून आता या प्रकल्पांचा खर्च २ लाख ४४