Assembly Election: विधानसभा निवडणुकीसाठी मध्य रेल्वे सोडणार विशेष गाड्या

मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकीचा(Assembly Election) जोरदार धुरळा उडवला जात आहे. सर्वच राजकीय पक्ष सभांवर सभा घेत आहेत. येत्या २० नोव्हेंबरला राज्यात विधानसभेसाठी एकाच टप्प्यात मतदान होत आहे. त्यामुळे सर्वच पक्ष प्रचारासाठी जोर लावत आहे.


राज्यातील मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी सरकारकडून सातत्याने प्रयत्न करत आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेकडून विशेष पाऊल उचलले जात आहे. निवडणुकीसाठी मध्य रेल्वेकडून रात्रीच्या विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण आणि पनवेल या दरम्यान धीम्या गतीवर २० नोव्हेंबरला पहाटे आणि मध्यरात्री उशिरा या लोकल गाड्या सोडल्या जाणार आहेत. यामुळे निवडणुकीचे कर्तव्य बजावणारे अधिकारी, कर्मचारी आणि सामान्य प्रवाशांना याचा फायदा होणार आहे.



असे असणार वेळापत्रक


२० नोव्हेंबरला पहाटे ३ वाजता गाड्या सुटतील


सीएसएमटी-कल्याण, सीएसएमटी-पनवेल(डाऊन मार्गावर)
कल्याण-सीएसएमटी, पनवेल - सीएसएमटी(अप मार्गावर)



डाऊन मार्ग


सीएसएमटी-कल्याण- १.१०, २.३०
सीएसएमटी - पनवेल - १.४०, २.५०



अप मार्ग


कल्याण-सीएसएमटी- १.००, २.००
पनवेल - सीएसएमटी - १.००, २.३०

Comments
Add Comment

मेट्रो ३ ने दाखवली ‘स्पीड’ची ताकद : पहिल्याच दिवशी ऐतिहासिक प्रतिसाद!

मुंबई : मुंबईकरांनी मेट्रो ३, म्हणजेच अ‍ॅक्वा लाईनला दिलेला प्रतिसाद पाहता हा प्रकल्प खऱ्या अर्थाने यशस्वी ठरत

ई-बस प्रवाशांसाठी एसटीकडून मासिक व त्रैमासिक पास योजना सुरु

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी महामंडळाने) प्रवाशांच्या सोयीसाठी आणि ई-बस सेवेला अधिक

डिजिटल क्रांतीद्वारे भारताची जागतिक महासत्तेकडे वाटचाल

मुंबई : डिजिटल क्रांतीच्या माध्यमातून भारत आत्मनिर्भरतेकडून जागतिक महासत्तेकडे वाटचाल करीत आहे. या

भारत-ब्रिटन भागीदारी जागतिक स्थैर्य आणि आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाचा आधार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे संयुक्त निवेदन व्यापार, तंत्रज्ञान, शिक्षण

RBI : RBIचा जबर धक्का! 'या' मोठ्या बँकेचा परवाना रद्द, ठेवीदारांना फटका!

सातारा : भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या भारतीय रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा बँकिंग नियमांचे उल्लंघन करणाऱ्या

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना धक्का! ‘ती’ अट ठरतेय अडचणीची; दिवाळीत पैसे मिळणार की नाही?

मुंबई : महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू असलेल्या 'लाडकी बहीण योजने'च्या लाभार्थ्यांसाठी आता एक मोठी अडचण निर्माण