Mhada Lottery : म्हाडा घराच्या अर्जासाठी मुदतवाढ; 'या' तारखेपर्यंत करु शकणार अर्ज!

  154

पुणे : मुंबई-पुणे सारख्या शहरात सर्वसामान्यांना हक्काचे घर घेणं परवडत नसल्यामुळे म्हाडाकडून निघणाऱ्या घरांच्या लॉटरीची (Mhada Lottery) वाट पाहावी लागते. अशातच म्हाडाने पुणे (Pune) गृहनिर्माण क्षेत्रविकास मंडळातर्फे ६२९४ घरांच्या सोडतीची घोषणा केली. तर आता यासाठी लागणाऱ्या अर्जाची देखील मुदतवाढ करण्यात आली आहे.


म्हाडा पुणे मंडळातर्फे (Mhada Pune Mandal) पुणे, पिंपरी-चिंचवड, पीएमआरडीसीएसह सोलापूर, कोल्हापूर आणि सांगलीमधीलएमेक घरांसाठी सोडत काढण्यात येणार आहे. विविध योजनांमधील घरांसाठी ही सोडत काढली जाणार आहे. १० ऑक्टोबरपासून या घरांसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती. यासाठी नागरिक आता १० डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज सादर करु शकणार आहेत. त्यानंतर १२ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन अनामत रक्कमेची स्वीकृती केली जाईल असून १३ डिसेंबर रोजी अनामत रकमेचा भरणा करता येणार आहे. नागरिकांची घरांसाठी वाढती मागणी पाहाता हा निर्णय घेण्यात आला आहे.



यामध्ये २,३४० घरांसाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. यामध्ये ९३ घरे म्हाडा योजनेअंतर्गत आहेत. तर ४१८ घरे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (PM Aawas Yojana) तयार करण्यात आली आहे. (Mhada Lottery)

Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक