नवी दिल्ली : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५चे (ICC Champions Trophy 2025) यजमानपद पाकिस्तानकडे (Pakistan) राखून ठेवले आहे. त्यानुसार भारतीय संघाला सामना खेळण्यासाठी पाकिस्तानात जावे लागणार आहे. मात्र यापूर्वी भारतीय संघाने (India Cricket Team) पाकिस्तानमध्ये जाणे टाळले होते, त्यामुळे आता भारतीय संघ हा सामना खेळण्यासाठी पाकिस्तानमध्ये जाणार का? असा प्रश्न उपस्थित होत असताना बीसीसीआयकडून याबाबतची मोठी अपडेट समोर आली आहे. (INd vs PCB)
बीसीसीआयने भारतीय संघ पाकिस्ताना जाणार नसल्याचे म्हटले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे. याबाबतचे चॅम्पियन्स ट्रॉफीचे संभाव्य वेळापत्रक समोर आले आहे. त्यानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना लाहोरमध्ये होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
त्याचबरोबर, पाकिस्तानने भारताची हायब्रीड मॉडेलची ऑफर स्वीकारली नाही तर संपूर्ण स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत खेळवली जाऊ शकते, असे अनेक अहवालांमध्ये म्हटले आहे. तसेच पाकिस्तानने भारताची विनंती मान्य केल्यास स्पर्धा हायब्रीड मॉडेलमध्ये आयोजित केली. तर टीम इंडिया आपले सामने दुबईत होणार, असाही अंदाज वर्तवण्यात येत आहे. (ICC Champions Trophy 2025)
मुंबई : इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने होते.…
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…