काम रखडवण्यात महाविकास आघाडीची PHD; तर काँग्रेस ब्रेक लावण्यात तरबेज, PM मोदींचा हल्लाबोल

Share

चिमुर : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने मोठी तयारी केल्याचं दिसून येतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि अमित शाह यांच्या सभा एकदम दणक्यात सुरू आहेत. आज चिमुर येथे PM मोदी यांची सभा झाली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. आघाडी हा भ्रष्टाचाराचा सर्वात मोठा खेळाडू असल्याचं त्यांनी म्हंटल आहे. महाराष्ट्राच्या विकासात काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि शरद पवार यांचा पक्ष अडथळा आणत असल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, महाविकास आघाडीने विकास प्रकल्प रखडवणे, वळवणे यात PHD केली आहे. महाराष्ट्राचा झपाट्याने विकास हा फक्त आघाडीच्या लोकांच्या बोलण्याने नाही. फक्त ब्रेकिंगच्या कामात महाविकास आघाडीने PHD केली आहे. काम रखडवणं, दिरंगाई करणं आणि दुसरीकडे वळवणं. काँग्रेसवरही पंतप्रधान मोदींनी निशाणा साधलाय. दुप्पट पीएचडी काँग्रेसनेसुद्धा केली असल्याचं त्यांनी म्हंटल. विकासकामांना ब्रेक लावण्यात काँग्रेस तरबेज आहे. यात काँग्रेसी लोक निष्णात आहेत. प्रत्येक विकास प्रकल्प रोखण्याचा प्रयत्न वर्षानुवर्षे आघाडीचेच लोक भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे खेळाडू आहेत, असा घोर आरोपही मोदींनी केला.

सर्व उपस्थितांना पंतप्रधान मोदींनी विचारले की, चिमुरची जनता महाविकास आघाडीला शहराच्या विकासात अडथळा आणू देणार का? त्यांना पुन्हा लुटण्याचा परवाना देणार का? लूट करू देणार का, त्यांची तिजोरी भरू देणार का? महाविकास आघाडीला महाराष्ट्राच्या विकासात अडथळा आणू देणार का? हे आघाडी पक्ष प्रगतीच्या आड कसे आडवे येतात याचे चंद्रपूरची जनताच साक्षीदार असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी म्हंटल.

यावेळी मोदींनी विरोधी पक्षांच्या आघाडीवर चांगलाच खरपूस समाचार घेतला. मोदी म्हणाले, महायुतीचं सरकार कोणत्या गतीने काम करतं आणि हे आघाडी पक्ष काम कसे थांबवतात, हे चंद्रपूरच्या जनतेपेक्षा चांगलं कोण जाणू शकेल? अनेक दशकांपासून इथले लोक रेल्वे कनेक्टिव्हिटीची मागणी करत आहेत, पण काँग्रेस आणि आघाडीच्या लोकांनी कधीही त्यावर काम होऊ दिले नाही, असंही मोदी म्हणाले.

भाजपचा येणाऱ्या ५ वर्षात जाहीरनामा महाराष्ट्राच्या विकासाची हमी असेल, महायुतीबरोबरच केंद्रातील एनडीएचे सरकार म्हणजे महाराष्ट्रात दुहेरी इंजिनचे सरकार, म्हणजे विकासाचा दुप्पट वेग असणार आहे. महाराष्ट्र भाजपचे आज मला अभिनंदन करायचे आहे, ज्यांनी एक अद्भुत जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये आपल्या मुली, भगिनी, शेतकरी, देशाच्या व महाराष्ट्राच्या युवाशक्तीच्या विकासासाठी अनेक अप्रतिम संकल्प करण्यात आले आहेत, असंही मोदी (PM Narendra Modi) म्हणाले.

Recent Posts

Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला आपल्या राशीनुसार खरेदी करा या गोष्टी, मिळतील भरपूर लाभ

मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…

15 minutes ago

LSG vs DC, IPL 2025: ऋषभ पंत घरच्या मैदानावर दिल्लीला रोखणार?

मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…

36 minutes ago

Heat wave: उष्णतेच्या लाटेपासून असा करा बचाव…जाणून घ्या या टिप्स

मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…

1 hour ago

कोकण रेल्वेने प्रवास करण्याआधी हे जरूर वाचा…

कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…

2 hours ago

‘चला वाचू या! सुट्टीतील वाचनालय’, मुंबई महानगरपालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम

येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…

2 hours ago

चंद्रपूर: येत्या २४ एप्रिल पर्यंत उष्णतेचा ‘येलो अलर्ट’

चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…

3 hours ago