काम रखडवण्यात महाविकास आघाडीची PHD; तर काँग्रेस ब्रेक लावण्यात तरबेज, PM मोदींचा हल्लाबोल

  89

चिमुर : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने मोठी तयारी केल्याचं दिसून येतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि अमित शाह यांच्या सभा एकदम दणक्यात सुरू आहेत. आज चिमुर येथे PM मोदी यांची सभा झाली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. आघाडी हा भ्रष्टाचाराचा सर्वात मोठा खेळाडू असल्याचं त्यांनी म्हंटल आहे. महाराष्ट्राच्या विकासात काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि शरद पवार यांचा पक्ष अडथळा आणत असल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केला आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, महाविकास आघाडीने विकास प्रकल्प रखडवणे, वळवणे यात PHD केली आहे. महाराष्ट्राचा झपाट्याने विकास हा फक्त आघाडीच्या लोकांच्या बोलण्याने नाही. फक्त ब्रेकिंगच्या कामात महाविकास आघाडीने PHD केली आहे. काम रखडवणं, दिरंगाई करणं आणि दुसरीकडे वळवणं. काँग्रेसवरही पंतप्रधान मोदींनी निशाणा साधलाय. दुप्पट पीएचडी काँग्रेसनेसुद्धा केली असल्याचं त्यांनी म्हंटल. विकासकामांना ब्रेक लावण्यात काँग्रेस तरबेज आहे. यात काँग्रेसी लोक निष्णात आहेत. प्रत्येक विकास प्रकल्प रोखण्याचा प्रयत्न वर्षानुवर्षे आघाडीचेच लोक भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे खेळाडू आहेत, असा घोर आरोपही मोदींनी केला.


सर्व उपस्थितांना पंतप्रधान मोदींनी विचारले की, चिमुरची जनता महाविकास आघाडीला शहराच्या विकासात अडथळा आणू देणार का? त्यांना पुन्हा लुटण्याचा परवाना देणार का? लूट करू देणार का, त्यांची तिजोरी भरू देणार का? महाविकास आघाडीला महाराष्ट्राच्या विकासात अडथळा आणू देणार का? हे आघाडी पक्ष प्रगतीच्या आड कसे आडवे येतात याचे चंद्रपूरची जनताच साक्षीदार असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी म्हंटल.



यावेळी मोदींनी विरोधी पक्षांच्या आघाडीवर चांगलाच खरपूस समाचार घेतला. मोदी म्हणाले, महायुतीचं सरकार कोणत्या गतीने काम करतं आणि हे आघाडी पक्ष काम कसे थांबवतात, हे चंद्रपूरच्या जनतेपेक्षा चांगलं कोण जाणू शकेल? अनेक दशकांपासून इथले लोक रेल्वे कनेक्टिव्हिटीची मागणी करत आहेत, पण काँग्रेस आणि आघाडीच्या लोकांनी कधीही त्यावर काम होऊ दिले नाही, असंही मोदी म्हणाले.


भाजपचा येणाऱ्या ५ वर्षात जाहीरनामा महाराष्ट्राच्या विकासाची हमी असेल, महायुतीबरोबरच केंद्रातील एनडीएचे सरकार म्हणजे महाराष्ट्रात दुहेरी इंजिनचे सरकार, म्हणजे विकासाचा दुप्पट वेग असणार आहे. महाराष्ट्र भाजपचे आज मला अभिनंदन करायचे आहे, ज्यांनी एक अद्भुत जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये आपल्या मुली, भगिनी, शेतकरी, देशाच्या व महाराष्ट्राच्या युवाशक्तीच्या विकासासाठी अनेक अप्रतिम संकल्प करण्यात आले आहेत, असंही मोदी (PM Narendra Modi) म्हणाले.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या